त्या शाळेवर आज होणार गुन्हा दाखल, मनाई असतानाही भरली शाळा! 

त्या शाळेवर आज होणार गुन्हा दाखल, मनाई असतानाही भरली शाळा! 


उदगीर-


केंद्र व राज्य सरकारने शाळा सुरु करण्यास अद्यापही परवानगी दिलेली नाही. मात्र शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत उदगीरात एका शाळेत नियम तोडून विद्यार्थ्यांचे वर्ग भरवल्याची घटना उघडकीस आली आहे.


याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात येईल,असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले होते, आज संबंधित शाळेवर गुन्हा दाखल होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे 


उदगीर येथील नळेगाव रोडवर असलेल्या अक्षरनंदन मराठी शाळेत गेल्या चार दिवसापासून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत


याबाबत शिक्षण विभाग व प्रशासन अनभिज्ञ होते. येथील काही माध्यम प्रतिनिधींनी याची माहिती समजल्यानंतर त्यांनी सोमवारी दि.२२ या शाळेवर जाऊन पाहणी केली असता विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू असल्याचेे निदर्शनास आले होते 


पत्रकारांनी शाळेत वर्ग सुरु असल्याचे फोटो आणि व्हिडिओ फुटेज घेऊन ते प्रशासनास पाठवले होते संबंधित शाळेवर आता कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. दि.१५ जून पासून शाळा सुरू होणे अपेक्षित होते 


परंतु कोरोना विषाणूूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच जात आहे. त्यामुळे शासनाने तूर्तास शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतलेला आहे


तरीही शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत येथील अक्षरनंदन शाळेत बिनदिक्कतपणे विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


याची जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वसन त्यांनी दिले होते, आज मंगळवारी लातूर चे उपशिक्षणाधिकारी मोरे यांनी संबंधित शाळेची चौकशी केली व अहवाल लातूर येथील माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना देण्यास ते लातूर येथे गेले असून, प्रथम दर्शनी शाळा दोषी दिसत असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तहसीलदार यानी आज सायंकाळ पर्यंत सम्बन्धित शाळे विरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image