उदगीरात शिवजयंती मोठया उत्सहात, थाटात साजरी होणार= अजित पाटील तोंडचिरकर उदगीर= उदगीरात शिवजयंती मोठया थाटात, साजरी करणार असल्याचे सार्वजनिक जयंती समिति चे अधक्ष अजित पाटील तोंडचीरकर यानी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले उदगीरात शिवजयंती निमित्त 13 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत शिवजयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाचे उद्घाटन सोमवार ता.13 रोजी सकाळी 8 वाजता विद्यावर्धीनी शाळेत होणार आहे,या वेळेस डॉ मस्के सर यांचे छ. शिवरायाचे प्रशासन या विषयावर व्याख्यान होणार आहे,14 तारीख मंगळवारी शिव व्याख्याते प्रदीप ढगे यांचे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर सकाळीं 8 वाजता विध्यावर्धनी येथे व्याख्यान तर सायंकाळी शिवशाहीर संतोष साळुंके यांचा नप प्रांगणात पोवाडा कार्यक्रम होणारं आहे,15 बुधवारी रयतेचे राजे छ. शिवाजी महाराज या विषयावर सिध्देश्वर लांडगे यांचे व्याख्यान विध्यावर्धिनी वर ,16 गुरुवार रोजी 5 वी ते 7 वी,8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्या साठी भाषण स्पर्धा,17 शुक्रवारी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या विषयावर बाल शिव व्याख्याती कु. आकांक्षा विश्वनाथे चे व्याख्यानं सकाळीं 8 वाजता ,11.30 वाजातर 4 थी ते 9 वी च्या विद्यार्थ्या साठी टॅलेंट सर्च परीक्षा,18 शनिवार रोजी सकाळीं 8 ते सायंकाळी 6 पर्यन्त वृक्षारोपण,मशाल रॅली,19 फेब्रुवारी रविवारी रोजी सकाळीं 7.30 वाहतात बाळ शिवबा पाळणे, उदगीर शहरातून भव्य मिरवणूक निघणार असून या मिरवणुकीत सामील पथकास प्रथम 11001, द्वितीय 7001, तृतीय 5001बक्षीस देन्यात येणार आहे , या वर्षाची शिवजयंती ही भव्य दिव्य स्वरूपात साजरी करण्यात येणार असून या सर्व कार्यक्रमात, मिरवणुकीत सर्वानी शमील व्हावे असे आवाहन ही अजित पाटील तोंडचीरकर यानी केलें असून या वेळेस प्रास्ताविक प्रा. गोपालकृष्ण घोडके यांनी केले तर आभार प्रदर्शन नवनाथ गायकवाड यांनी मानले,या वेळेस संतोष बिरादार, निवृत्ती सुकाने सह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image