जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहीर झालेली विशेष सहायक सरकारी अभियोक्ताची निवड प्रक्रीया वादाच्या भोवर्‍यात, जाहिरातीत नमूद नसलेल्या कागद पत्रा आधारे अनेक उमेदवार केले अपात्र, अपात्र उमेदवाराची दाद न फिर्याद! 👉 23 तारीख बुधवारी घोषीत होणारी छाननी यादी 24 तारखेला अंतिम होऊन देखील शुक्रवारी 25 ला कार्यालयीन वेळ संपल्यावर घोषित, पुढे शनिवार, रविवार सुट्टी लगेचच सोमवारी सकाळी पात्र उमेदवाराची मुलाखत, गौडबंगाल काय? 👉 जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत जाहीर प्रगटन, सरकारी अभियोक्ता ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवड होणारं ते संकाये मॅडम म्हणतात तक्रार जिल्हाधिकारी यांच्या कडे करा, जिल्हाधिकारी म्हणतात तो विभाग आमचा नाहीं,मग तक्रार करायची कोठे जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांची भूमिका वेगळी कशी, तक्रार दाराची तक्रार घेऊन त्या विभागास पाठवणे क्रमप्राप्त असताना यानी केले हाथ का वर ? 👉 अटी मधे उमेदवार भारतीय नागरीक असावा पण कोठेच त्याचा पुरावा द्या हा उल्लेख नसताना अनेक उमेदवार अपात्र 👉यातील काही उमेदवार हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सरकारी अभियोक्ता या पदासाठी वयाच्या अटीनुसार मागासवर्गातून पात्र असतानाही उमेदवारांना खुला प्रवर्गात दाखवून त्यांना अपात्र ठरविण्यात आलेले आहे तर काहींना कास्ट प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देऊन देखील राष्ट्रीयत्व नसल्याबाबत दाखवून अपात्र ठरविण्यात आलेले आहे याबाबत जाहिरात मध्ये कुठेही राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र दाखल करण्याचे नमूद केलेले नव्हते 👉 अपात्र घोषित उमेदवाराचे म्हणणे कोण ऐकावे, दाद कोणाकडे मागावे,पण जांच्या कडे अपेक्षा त्यांनीच याना सोडले वाऱ्यावर ? उदगीर:- लातूर जिल्हा दंडाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत दि.14/08/2023 रोजी जाहीर प्रगटना द्वारे विशेष सहायक सरकारी अभियोक्ता 5, प्रतीक्षा यादी वर 5 असे एकूण 10 सरकारी अभियोक्ता साठी अर्ज मागविण्यात आले त्यात पहिली अट होती की उमेदवार भारतीय नागरीक असावा (पुरावा द्यावे असे कुठेच नमूद केलेले नाही), या सह अनेक मुद्दे होते,खुल्या प्रवर्गासाठी वयाची अट 38 वर्ष तर राखीव साठी 43 वर्ष अशी होती,व अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे,जन्म तारखेचे प्रमाणपत्र,जात प्रमाणपत्र,बार कौन्सिलचे प्रमाणपत्र व अनुभव प्रमाणपत्र देण्यास सांगितले होते त्यानुसार 62 विधीतज्ञांनी अर्ज दाखल केले यांची छाननी यादी 23/8/23 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाहीर होणार होती सदर यादी 24/08/2023 रोजी अंतिम यादी तयार होऊन देखील ती शुक्रवार 25/08/23 रोजी कार्यालयीन वेळ संपल्यावर जाहीर करण्यात आली झाली. त्यात अनेक उमेदवारास जाहिरातीत नमूद नसलेल्या कागद पत्रा आधारे 49 उमेदवारास अपात्र घोषित करण्यात आले अणि फक्त 13 उमेदवार पात्र दाखऊन लगेच त्याची सोमवारी सकाळीं 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मुलाखत ठेवण्यात आली, यादी प्रसिद्धी नंतर उमेदवारांना कैफियत दाखल करण्यासाठी अथवा कागदपत्रे दाखल करण्यासाठी कुठलीही संधी देण्यात आली नाही. शनिवार रविवार आल्याने अपात्र ठरविण्यात आलेल्या उमेदवारांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकारी यांच्या समोर कैफियत मांडली पण जिल्हाधिकारी यानी पाच मिनिटांनी बोलावते म्हणून पात्र ठरविण्यात आलेल्या 13 उमेदवारांचे मुलाखत घेऊन ते महीला आयोगाच्या अध्यक्षाच्या कार्यक्रमास गेल्या. कैफियत घेतलेल्या उमेदवारांना कार्यालयात अनेक तास थांबऊन ठेवले पण जिल्हाधिकारी मॅडम काही कार्यालयात आल्याचं नाहीत, उमेदवारांनी निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्याकडे आमची तक्रार घ्या म्हणून अनेक वेळेस विनंती केली की पण त्यांनी ही अधिकाऱ्याचा रुबाब दाखवत त्यांना खेळवत ठेवले यात पात्र उमेदवाराची मुलाखत ही झाली पण या अपात्र घोषित उमेदवाराची तक्रार ऐकण्यास ना जिल्हाधिकारी याना किँवा संबंधित सरकारी अभियोक्ता याना वेळ नसल्याने शेवटी कंटाळून या अपात्र उमेदवारानी अवक जावक विभागांत तक्रार द्यावे असे ठरले आवक जावाक विभागाने ही अधिकाऱ्याच्या शेरे शिवाय तक्रार घेणार नाही म्हणत त्यांची हेळसांड चालु केली, शेरा देण्यास न जिल्हाधिकारी उपलब्ध, नाहीं निवासी उपजिल्हाधिकारी शेरा देण्यास तयार, कार्यालय बंद करण्याच्या वेळेस शेवटी तक्रार घेतली ती बगर शेरे शिवाय तेही आवक जावक् विभागाने, 9 अपात्र उमेदवारानी आपल्या तक्रारीत म्हणाले की जाहीर प्रगटणात नमूद नसलेले कागद पत्रा आधारे आम्हास अपात्र घोषित केले असून भरती प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी केली असून या निवेदनावर ॲड.वैभव धुमाळ, ॲड.मनिष्या कलमे, ॲड.संतोष म्हेत्रे, ॲड.सविता राठोड, ॲड.सचीन माने, ॲड.अतुल डोंगरे, ॲड.गोविंदा सोनी, ॲड.एम देशमुख यांच्या सह्या असून , येथे जर यांची फिर्याद ऐकली नाहीं तर आम्हास संबंधित मा.न्यायालयात जाऊन दाद मागावी लागेल असे ही त्यांनी सांगितले आहे, आता या अपात्र उमेदवारास न्याय कोण देईल हे पाहावे लागेल
Popular posts
शिवसेना उदगीर नगरपालिका स्वबळावर लढणार= मा. आमदार सुधाकर भालेराव 👉 नगरविकास खाते एकनाथ शिंदे कडे असल्याने शिवसेना उदगीर चा विकास भूतो न भविष्यती करू 👉 नगरपालिका हद्दीतील भ्रष्टाचार मिटवणार 👉 मुस्लिम समाजाला सोबत घेऊन विकास करू 👉 मागील काळातील विकास माझ्या कार्यकाळातील 👉 केलेल्या कामाची प्रसिद्धी न केल्याचे खंत 👉उदगीरकराच्या हितासाठी,सर्वांगीण विकासासाठी मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलो असून मी आता गप्प बसणार नाही 👉 उदगीर, अहमदपूर नगरपालिका निवडणूक शिवसेना स्वतंत्र लढवणार असून जनतेनी आम्हाला पूर्ण पाठिंबा देऊन सहकार्य करतील असे सुधाकर भालेराव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे
Image
कृषी उत्पन्न बाजार समितीस सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर ,बाजार समितीच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी - शिवाजीराव हुडे उदगीर = उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांची होणारी सोयाबीन खरेदी विक्रीच्या संदर्भातली अडचण विचारात घेऊन, सोयाबीन खरेदी केंद्र आपल्याकडे मिळावे. अशी मागणी पणन महामंडळाकडे केली होती. लोक कल्याणकारी योजनेचा भाग म्हणून पणन महामंडळाकडून उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून सोयाबीन खरेदी केंद्राला मंजुरी दिली आहे. मंजुरीचे अधिकृत पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राप्त झाले असून त्या पत्रानुसार सोयाबीन खरेदी केंद्र उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या सोयाबीनच्या नोंदी करून घ्याव्यात. जेणेकरून शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीला सक्रिय होऊन काम करता येईल
उदगीर नगरपालिकेवर युतिचा झेंडा फडकेल = बस्वराज पाटील मुरूमकर 👉 आत्ताच विरोधकांची झोप उडाली उदगीर= उदगीर नगरपालिकेवर युतीचा झेंडा फडकणार असल्याने विरोधकांची झोप उडाली असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष बस्वराज पाटील मुरूमकर यांनी उदगीर समाचार ला बोलताना सांगितले आहे उदगीर येथे युतीच्या उमेदवारा ची माहिती देण्यास बोलावलेल्या पत्रकार परिषदे नंतर उदगीर समाचार सोबत बोलताना पाटील म्हणाले की उदगीर नगर पालिके वर युती चा झेंडा फडकणार असून विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,आज विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नाहीत, देशात भाजप्,राज्यात युती चे सरकार असून आम्ही जो विकास केला आहे ते जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, उदगीर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदा वर स्वाती सचिन हुडे व आमचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार या न भूतो न भविष्ती अशा मतांनी विजयी होतील यात आम्हाला शंका नाही असेही ते म्हणाले या वेळेस आ संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. संजय बनसोडे, मा. आ.गोविंद केंद्रे सह अनेक मान्यवर उपस्थित होते
Image
उदगीर नगरपालिकेत सत्ता पालट ? 👉 अनेक माजी नगरसेवकाची नाराजी भोवणार ! उदगीर:- उदगीर नगरपालिकेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर असून आता नामांकन दाखल करण्यासाठी सर्वच पक्षाकडून मोर्चे बांधणी चालू असून काही पक्ष हवेत आहेत की आम्ही जो उमेदवार दिला तो निवडून येईल हे त्यांचे भ्रम दिसत असून जश्या निवडणूक निरीक्षकांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या तश्या प्रभागात जाऊन तेथील मतदाराच्या ही प्रतिक्रिया घेतल्या असत्या तर चांगले झाले असते असे मतदार बोलत आहेत या वरून ज्या माजी नगरसेवका बद्दल रोष आहेत त्याचा फटका अनेक पक्षाला बसण्याची शक्यता दिसत आहे,शहरात होत असलेल्या गुप्त बैठकीचा सारांश घेतला तर ज्या पक्षाचा नगराध्यक्षाचा उमेदवार सक्षम असेल त्याचा झेंडा नगरपालिकेवर फडकेल असे दिसत असून पुढील दोन दिवसात हे स्पष्ट होईल
ठरलं भाजप राष्ट्रवादी ? नगराध्यक्ष भाजप, भाजप 18 राष्ट्रवादी 19 अन्य 3 फॉर्म्युला? उदगीर:- उदगीर नगरपालिका निवडणुकीत आता भाजप राष्ट्रवादी (अजित पवार) गट यांची युती संदर्भात फायनल बैठक झाल्याची चर्चा असून या निवडणुकीत नगराध्यक्ष पद भाजप ला तर त्या बद्दल राष्ट्रवादी ला एक नगरसेवक जास्त असल्याची चर्चा सूत्र करत आहेत तर राष्ट्रवादी ला प्रभाग 1,2,3,4,5,6,10,11,12 आणि 13 तर भाजप ला प्रभाग 7,8,9,14,15,16,17,19,20 मिळेल अशी चर्चा आहे,तर 18 मधून 2, 20 मधून 1 ही जागा अन्य देण्यात येईल अशी ही सूत्रांची माहिती असून हा अंदाज आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे , होऊ शकते उदगीर समाचार चा अंदाज खरा ठरतो किंवा खोटा हे लवकरच समजेल