जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहीर झालेली विशेष सहायक सरकारी अभियोक्ताची निवड प्रक्रीया वादाच्या भोवर्‍यात, जाहिरातीत नमूद नसलेल्या कागद पत्रा आधारे अनेक उमेदवार केले अपात्र, अपात्र उमेदवाराची दाद न फिर्याद! 👉 23 तारीख बुधवारी घोषीत होणारी छाननी यादी 24 तारखेला अंतिम होऊन देखील शुक्रवारी 25 ला कार्यालयीन वेळ संपल्यावर घोषित, पुढे शनिवार, रविवार सुट्टी लगेचच सोमवारी सकाळी पात्र उमेदवाराची मुलाखत, गौडबंगाल काय? 👉 जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत जाहीर प्रगटन, सरकारी अभियोक्ता ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवड होणारं ते संकाये मॅडम म्हणतात तक्रार जिल्हाधिकारी यांच्या कडे करा, जिल्हाधिकारी म्हणतात तो विभाग आमचा नाहीं,मग तक्रार करायची कोठे जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांची भूमिका वेगळी कशी, तक्रार दाराची तक्रार घेऊन त्या विभागास पाठवणे क्रमप्राप्त असताना यानी केले हाथ का वर ? 👉 अटी मधे उमेदवार भारतीय नागरीक असावा पण कोठेच त्याचा पुरावा द्या हा उल्लेख नसताना अनेक उमेदवार अपात्र 👉यातील काही उमेदवार हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सरकारी अभियोक्ता या पदासाठी वयाच्या अटीनुसार मागासवर्गातून पात्र असतानाही उमेदवारांना खुला प्रवर्गात दाखवून त्यांना अपात्र ठरविण्यात आलेले आहे तर काहींना कास्ट प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देऊन देखील राष्ट्रीयत्व नसल्याबाबत दाखवून अपात्र ठरविण्यात आलेले आहे याबाबत जाहिरात मध्ये कुठेही राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र दाखल करण्याचे नमूद केलेले नव्हते 👉 अपात्र घोषित उमेदवाराचे म्हणणे कोण ऐकावे, दाद कोणाकडे मागावे,पण जांच्या कडे अपेक्षा त्यांनीच याना सोडले वाऱ्यावर ? उदगीर:- लातूर जिल्हा दंडाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत दि.14/08/2023 रोजी जाहीर प्रगटना द्वारे विशेष सहायक सरकारी अभियोक्ता 5, प्रतीक्षा यादी वर 5 असे एकूण 10 सरकारी अभियोक्ता साठी अर्ज मागविण्यात आले त्यात पहिली अट होती की उमेदवार भारतीय नागरीक असावा (पुरावा द्यावे असे कुठेच नमूद केलेले नाही), या सह अनेक मुद्दे होते,खुल्या प्रवर्गासाठी वयाची अट 38 वर्ष तर राखीव साठी 43 वर्ष अशी होती,व अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे,जन्म तारखेचे प्रमाणपत्र,जात प्रमाणपत्र,बार कौन्सिलचे प्रमाणपत्र व अनुभव प्रमाणपत्र देण्यास सांगितले होते त्यानुसार 62 विधीतज्ञांनी अर्ज दाखल केले यांची छाननी यादी 23/8/23 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाहीर होणार होती सदर यादी 24/08/2023 रोजी अंतिम यादी तयार होऊन देखील ती शुक्रवार 25/08/23 रोजी कार्यालयीन वेळ संपल्यावर जाहीर करण्यात आली झाली. त्यात अनेक उमेदवारास जाहिरातीत नमूद नसलेल्या कागद पत्रा आधारे 49 उमेदवारास अपात्र घोषित करण्यात आले अणि फक्त 13 उमेदवार पात्र दाखऊन लगेच त्याची सोमवारी सकाळीं 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मुलाखत ठेवण्यात आली, यादी प्रसिद्धी नंतर उमेदवारांना कैफियत दाखल करण्यासाठी अथवा कागदपत्रे दाखल करण्यासाठी कुठलीही संधी देण्यात आली नाही. शनिवार रविवार आल्याने अपात्र ठरविण्यात आलेल्या उमेदवारांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकारी यांच्या समोर कैफियत मांडली पण जिल्हाधिकारी यानी पाच मिनिटांनी बोलावते म्हणून पात्र ठरविण्यात आलेल्या 13 उमेदवारांचे मुलाखत घेऊन ते महीला आयोगाच्या अध्यक्षाच्या कार्यक्रमास गेल्या. कैफियत घेतलेल्या उमेदवारांना कार्यालयात अनेक तास थांबऊन ठेवले पण जिल्हाधिकारी मॅडम काही कार्यालयात आल्याचं नाहीत, उमेदवारांनी निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्याकडे आमची तक्रार घ्या म्हणून अनेक वेळेस विनंती केली की पण त्यांनी ही अधिकाऱ्याचा रुबाब दाखवत त्यांना खेळवत ठेवले यात पात्र उमेदवाराची मुलाखत ही झाली पण या अपात्र घोषित उमेदवाराची तक्रार ऐकण्यास ना जिल्हाधिकारी याना किँवा संबंधित सरकारी अभियोक्ता याना वेळ नसल्याने शेवटी कंटाळून या अपात्र उमेदवारानी अवक जावक विभागांत तक्रार द्यावे असे ठरले आवक जावाक विभागाने ही अधिकाऱ्याच्या शेरे शिवाय तक्रार घेणार नाही म्हणत त्यांची हेळसांड चालु केली, शेरा देण्यास न जिल्हाधिकारी उपलब्ध, नाहीं निवासी उपजिल्हाधिकारी शेरा देण्यास तयार, कार्यालय बंद करण्याच्या वेळेस शेवटी तक्रार घेतली ती बगर शेरे शिवाय तेही आवक जावक् विभागाने, 9 अपात्र उमेदवारानी आपल्या तक्रारीत म्हणाले की जाहीर प्रगटणात नमूद नसलेले कागद पत्रा आधारे आम्हास अपात्र घोषित केले असून भरती प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी केली असून या निवेदनावर ॲड.वैभव धुमाळ, ॲड.मनिष्या कलमे, ॲड.संतोष म्हेत्रे, ॲड.सविता राठोड, ॲड.सचीन माने, ॲड.अतुल डोंगरे, ॲड.गोविंदा सोनी, ॲड.एम देशमुख यांच्या सह्या असून , येथे जर यांची फिर्याद ऐकली नाहीं तर आम्हास संबंधित मा.न्यायालयात जाऊन दाद मागावी लागेल असे ही त्यांनी सांगितले आहे, आता या अपात्र उमेदवारास न्याय कोण देईल हे पाहावे लागेल
Popular posts
शंकर माध्यमिक आश्रम शाळेतील प्रभारी मुख्याधिपीका सात हजार रुपयाची लाच घेताना अडकली जाळ्यात उदगीर - बोरताळा पाटी, देगलुर रोड, उदगीर येथील शंकर माध्यमिक आश्रम शाळेतील प्रभारी मुख्याधिपीका यांना सात हजार रुपयाची लाच घेताना लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसाकडुन मिळालेली माहीती आशी की, तक्रारदार यांनी काही खाजगी अडचणीमुळे ईयत्ता ९ वी मध्ये शिक्षण अर्धवट सोडले होते. त्यानंतर तक्रारदार याना पुढील नौकरीसाठी व व्यवसायासाठी १० वी व त्यापुढील शिक्षण घेणे गरजेचे असल्याने, ता. ६ ऑगस्ट रोजी शंकर माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका त्रिविणी शेरे यांना भेटले. त्यावेळी मुख्याध्यापिका शेरे त्रिविणी यांनी १० वी वर्गात प्रवेश देण्यासाठी दहा हजार रूपयाची लाचेची मागणी केलेबाबत तक्रारदार यांची लाचलुचपत प्रतिबंधक लेखी तक्रार दिली. यावरुन सापळा रचुन आरोपी श्रीमती त्रिवेनि बबुराव शेरे, (वय ४१) प्रभारी मुख्याधापिका शंकर माध्यमीक अश्रमशाळा बोरताळा पाटी, देगलुर रोड उदगीर यांनी तक्रारदार यांचेकडून सात हजार रुपये लाचेची रक्कम त्यांचे कार्यालयामध्ये पंच साक्षीदारा समक्ष स्वतः स्वीकारली असता त्यांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडण्यात आले आहे. उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधीत अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूरचे पोलीस उपअधिक्षक संतोष बर्गे पोलिस निरीक्षक जगदीश राऊत, पोलीस कॉस्टेबल किरण गंभीरे, मंगेश कोंडरे, हवलदार श्री.अलुरे, महिला पोलीस कर्मचारी पठाण यांच्या पथकाने सापळा रचुन कार्यवाही करण्यात आली आहे. या घटने वरून एक लक्षात येते की आता शिक्षण विभाग ही लाच घेण्यात मागे नाही
स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही, गुत्तेदारांनी वीज ग्राहकांना विनाकारण त्रास देऊ नये - स्वप्निल जाधव उदगीर = सध्या लातूर जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू झाली आहे. वास्तविक पाहता वीज कायदा 2003 च्या कलम 55 प्रमाणे स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही. असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे विदर्भ प्रदेशाचे अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी सर्व वीज ग्राहकांना कळविले आहे. याची नोंद वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही आवाहन युवा नेते स्वप्निल जाधव यांनी केले आहे. वीज मीटर बदलण्यासाठी येणारे ठेकेदार आहेत. ती एक नोडल एजन्सी आहे. या नोडल एजन्सीला आपण वीज मीटर लावू नका, असे स्पष्ट सांगावे असेही विधीज्ञ दर्यापूरकर यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात कोणत्याही कायद्यानुसार सरकारी कामात अडचण आणणे ही केस आपल्यावर या बाबतीत लागू होऊ शकत नाही. स्मार्ट मीटर लावायला आलेल्या लोकांना हे मीटर लावणे आवश्यक असल्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या आदेशाची, परिपत्रकाची प्रत मागावी. जी ते तुम्हाला देऊ शकत नाहीत. असेही वीज ग्राहक संघटनेने म्हटले आहे. हे मीटर लावणे सर्वांनी ताबडतोब बंद करावे. कारण या मीटरच्या वेगवान फिरल्याने विज बिल भरता भरता आपल्याला अतोनात त्रास होणार आहे. एकदा का जर हे मीटर आपण लावले तर त्याला पुन्हा कोणीही परत काढू शकणार नाही. याची सर्वांनी जाणीव ठेवावी, असेही महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने म्हटल्याचे स्वप्निल जाधव यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना स्वप्निल जाधव यांनी मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालाचाही हवाला दिला आहे. मध्यप्रदेश हायकोर्टने वीज ग्राहकांना स्पष्ट केले आहे की स्मार्ट मीटर लावणे हे अनिवार्य नाही. थाई स्वरूपातील मिटर घेत असतील तर त्यांच्यासाठी ते अनिवार्य आहे मात्र नियमित ग्राहकांसाठी ते अनिवार्य नाही. संदर्भात विधिज्ञ शरद जोशी यांच्या म्हणण्यानुसार वीज ग्राहकांच्या लेखी परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवणे हे कायद्याने अपराध ठरू शकेल जबरदस्ती करून मीटर जर कोणी बसवत असेल तर तो उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ठरेल अशा पद्धतीच्या महत्त्वपूर्ण न्यायालयीन कारवाई बद्दल सीहोर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निशांत वर्मा यांनी आभार मानले आहेत, स्मार्ट मीटर बसवणे हे खाजगी कंपनीने कंत्राट घेऊन शासनाच्या काही लोकांना हाताशी धरून हे काम चालू केले आहे. भविष्यात हे मीटर रिचार्ज सिस्टीम चे होणार आहेत. त्यामुळे राज्यात त्याचा विरोध सुरू असताना तुमच्या घरी येऊन जबरदस्तीने मीटर बसवण्याचे काम वीज वितरण कंपनी करत असेल तर त्यांना ताबडतोब विरोध करावा. जीनियस या कंपनीचे मीटर ज्यांच्या घरी बसवले आहे, त्यांना आता दुप्पट बिल येऊ लागले आहेत. याकडे महाराष्ट्र विज ग्राहक संघटनेने लक्ष वेधले आहे. भविष्यात आपली लुबडणूक होणार नाही यासाठी जनतेने स्मार्ट मीटरला तीव्र विरोध करावा या संदर्भामध्ये काही स्वयंसेवी संस्था स्वतंत्रपणे अर्जाचा नमुना तयार करत आहेत तशा पद्धतीचा अर्ज ग्राहकाने महावितरणला देऊन त्याची पोचपावती घ्यावी त्यासाठी सर्वांनी सावध राहावे असेही आवाहन जाधव यांनी केले आहे.
Image
उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे:- श्री बस्वराज पाटील नागराळकर अध्यक्ष महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी उदगीर उदगीर:- उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे असून आज ज्या काही संस्था कार्यरत आहेत त्या व्यापाऱ्याच्या सहयोगामुळे असून उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असल्याचे महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर यांनी अडत व्यापारी वेलफेअर असोसिएशन वतीने आयोजित महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभास उत्तर देताना म्हणाले अडत वेलफेअर असोसिएशन वतीने आज रोजी अडत मार्केट मध्ये महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभ आयोजित केला होता,यात सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर,उपाध्यक्ष प्रकाश तोंडारे,सचिव डॉ रामप्रसाद लखोटिया,सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य शिवाजीराव हुडे,अजय दंडवते,आडेप्पा अंजुरे,शिवराज वल्लापुरे ,भाग्यश्री चाकुरकर,बस्वराज पाटील,नाथराव बंडे ,प्रशांत पेन्सलवार,अरविंद पाटील, दिलीप चौधरी,रमाकांत अंकुलगे,भिमाशंकर मुद्दा,मल्लिकार्जुन मानकरी, रामचंद तिरूके,डॉ. श्रीकांत मध्वरे , मन्मथ बिरादार यांचा सत्कार आयोजित केला होता,या वेळेस सत्काराला उत्तर देताना श्री बस्वराज पाटील नागराळकर म्हणाले की महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी ही संस्था व्यापाऱ्यांनी,शेतकारयानी आपल्या कस्टाटुन उभी केली असुन,उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असून व्यापाऱ्याच्या योगदानामुळे उदगीर चा विकास झाला ,आमचे ध्येय एकच आदर्श विद्यार्थी घडविणे हेच आमचे स्वप्न आहे असेही ते म्हणाले,आज आम्ही जे आहोत ते व्यापाऱ्यामुळे या वेळेस अडत वेलफेअर असोसिएशन वतीने उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांना लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचा महेश गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल बस्वराज पाटील नागराळकर,शिवाजीराव हूडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य जगदीश बाहेती,रवींद्र कोरे अडत वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष श्रीधर बिरादार,नागेश आंबेगाव,साईनाथ कोरे,उमाकांत पांढरे,मल्लिकार्जुन काळगापूरे, श्याम बिरादार, मनोहर बिरादार,शिवाजी पेठे, शिवशंकर बिरादार,मधुकर पाटील, पी. पी.पाटील,साईनाथ कल्याणे,प्रमोद पाटील, कमलाकर भंडे, शांतवीर मुळे,मारुती कडेवार,दिलीप पाटील,दिगंबर गोटमुकले, सुरेश लांडगे,गौतम पिंपरे,विश्वनाथ यलवंतगे, भरत दंडीमे,अरविंद जिरगे,गंगाधर बिरादार,लक्ष्मणराव मोमले, राम बिरादार, संकेत बिरादार,कोंडीराम काळोजी,भिमाशंकर गठोडे सह अडत व्यापारी,सर्व गुमस्था,हमाल उपस्थित होते
Image
उदगीर नगर पालिका अधिकाऱ्याचा उंटावर बसून शेळ्या राखण्याचा प्रकार ? 👉 गेलेले मुख्याधिकारीच चांगले म्हणण्याची नौबत उदगीरकरावर 👉 मुख्याधिकाऱ्यांना भेटणे म्हणजे नशिबच,जेव्हा जावा तेव्हा साहेब बाहेर ,फोन ही घेत नाहीत 👉 आवक जावक विभाग प्रमुख तर स्वतःला राजा महाराजा समजतो? उदगीर:- स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्याने मागील अनेक वर्षांपासून उदगीर नगर पालिकेवर अधिकारी राज्य असून या अधिकाऱ्यांना शासनाने जनतेचे सेवक म्हणून ठेवले असताना हे अधिकारी उन्मत्त होऊन स्वतःला राजा महाराजा सारखे वागत असल्याचे चित्र सध्या उदगीर नगरपालिकेत पहावयास येत असल्याने सामान्य जनता त्रस्त दिसत आहे,मदमस्त कर्मचाऱ्याची तक्रार मुख्याधिकारी यांच्या कडे करावे म्हटले तर मुख्याधिकारी कोठे राहतात हे त्यांनाच माहिती,जेव्हा केंव्हा जावा मुख्याधिकारी कार्यालयात भेटत नाहीत, जाणाऱ्यांना गेलेलाच अधिकारी चांगला होता म्हणण्याची वेळ आली असून ,येथील आवक जावक ला जो कर्मचारी ठेवला आहे तो इतका उर्मट बोलतो की तो राजा महाराजा लाही मागे टाकत असून प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन जनतेच्या हितासाठी त्वरित अधिकारी बदलावेत अशी मागणी जनता करत आहे
*अवैध सावकारीबाबत तक्रारी दाखल करण्याचे आवाहन* उदगीर : जिल्ह्यातील अवैध सावकरीविरुद्ध प्राप्त तक्रारींवर सावकारांचे निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत कार्यवाही केली जात आहे. वर्षभरात जिल्ह्यातील तालुकास्तरीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे ५५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याबाबत तातडीने कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. अवैध सावकारीविरुद्ध कोणत्याही नागरिकाची तक्रार असल्यास त्यांनी संबंधित तालुकास्तरावर सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे किंवा जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर या कार्यालयाकडे तक्रार सादर करावी. तक्रारींच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक सहकरी संस्था एस.व्ही. बदनाळे यांनी कळविले आहे