*उदगीर येथे 27 जानेवारीपासून* *दोन दिवसीय पशु व कुक्कुट पक्षी प्रदर्शन* *उदगीर :* उदगीर येथे श्री सदगुरु हावगीस्वामी महाराज यात्रेनिमित्त 27 व 28 जानेवारी 2024 रोजी जातिवंत पशुधनाचे पशु व कुक्कुट पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. उदगीर येथील नवीन बुद्ध विहार समोरील क्रीडा मैदानावर होणाऱ्या या प्रदर्शनात पशुपालकांनी आपले पशु व कुक्कुट पक्षी यांची नोंदणी करण्याचे आवाहन उदगीर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी यांनी केले आहे. देवणी जातीचे नर व मादी, लालकंधारी जातीचे नर व मादी, संकरीत जातीचे मादी, उस्मानाबादी जातीचे तीन पिल्ले व त्यावरील पिल्ले देणारी मादी, अश्व गट नर व मादी आणि कुक्कुट गटात जातीवंत कुक्कुटपक्षी यांचा या पशु व पक्षी प्रदर्शनात समावेश आहे. पशुप्रदर्शनात सहभागी होताना गोवर्गीय पशुधनास लंपी चर्मरोगाचे लसीकरण केल्याचे पशुसंवर्धन विभागाचे लस दिल्याचे प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. लंपी चर्मरोगग्रस्त असलेले व यापूर्वी लंपीचे लागण झालेले गोवर्गीय पशुधन या पशुप्रदर्शनात सहभागी करता येणार नाही. पशुपालकांचे आधारकार्ड, बँक पासबुकची स्पष्ट दिसणारी छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. तसेच लातूर जिल्ह्याबाहेरील पशुपालकांनी पशुप्रदर्शनात सहभागी होत असताना त्यांच्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधन वाहतूक प्रमाणपत्र सोबत घेवून प्रवास करणे व ते पशुप्रदर्शनात आणने अनिवार्य आहे. या पशु प्रदर्शनासाठी पशुनोंदणी 27 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजेपासून 28 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत करण्यात येईल. यानंतर पशुप्रदर्शनाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यानंतर पशुनिवड प्रक्रिया राबवण्यात येईल, असे पशुधन विकास अधिकारी यांनी कळविले आहे. *****
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image