लातूर,निलंगा मार्गावर धावणाऱ्या शिवशाही बसेस बंद करून , बसस्थानाकाचेही काम तात्काळ पूर्ण करावे उदगीरच्या प्रवाशी संघटनेची मागणी उदगीर---या आगारातून लातूर व निलंगा मार्गावर सुरू असलेल्या भंगार बसेस तात्काळ बंद करून येथील गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेले उदगीर बसस्थानाकाचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी प्रवाशी संघटनेने केली आहे. उदगीर बस आगारातून लातूर व निलंगा मार्गावर भंगार झालेल्या बसेस सुरू आहेत.या बसेसना दीडपट तिकीट आकारले जात आहे. भंगार बसेसमुळे मोठी हानी होण्याचा संभव आहे.सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. या बसेसमधील वातानुकूलित सेवा पूर्ण बंद पडली आहे. पावसाळ्यात या बसेसला भेगा पडल्या असल्यामुळे पावसाळ्यात अक्षरशः प्रवाशांनी बसमध्ये छत्र्या लावून प्रवास केला आहे. या भंगार झालेल्या बसेस भंगार झाल्यामुळे या बसेस तात्काळ बंद करून या दोन्ही मार्गावर लालपऱ्या सुरू करण्याची मागणी या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच उदगीर बस स्थानकाचे काम गेल्या नऊ वर्षांपासून मंद गतीने सुरू आहे.पावसाळ्यात चिखल व उन्हाळ्यात धुराळ्याने प्रवाशी त्रस्त होत आहेत.या बंद पडलेल्या बस स्थानकाचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणीही प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास सोनी व सचिव व्ही. एस. कुलकर्णी यांनी आगार प्रमुख,विभाग नियंत्रक, प्रादेशिक व्यवस्थापक व परिवहन मंत्र्यांकडे केली आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
