उदगिरात लोकशाही चा बोजवारा ,नौकरशाही चा बोलबाला? 👉 नेता गप्प ,गायब विरोधक,सामान्य जनता परेशान उदगीर:-उदगीर तालुका एक ऐतिहासिक ,शैक्षणिक,लोकशाही जपणारा तालुका असताना आता या तालुक्यातून लोकशाही चा अस्त होऊन नोकरशाही चा उदय झाल्याचे चित्र सध्या अनेक शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्याच्या वर्तनावरून दिसत असल्याचे लोक बोलत आहेत उदगीर तालुक्यात सध्या लोकशाही अस्तित्वात आहे का नाही हा प्रश्न अनेक मान्यवरराणा पडत असून कुठल्याही शासकीय कार्यालयात जावा तेथील अधिकाऱ्याचे वागणे हे नोकरशाही अवतरली की काय हा प्रश्न उपस्थित होतो,पहले तर अधिकारी भेटत नाहीत,कर्मचाऱ्याचे एकच उत्तर साहेब दौऱ्यावर,दुसरी बाब कुठलीही तक्रार करा यांना माहीत असते की यांच्यात आपला कर्मचारी,अधिकारी अडकणार असल्याने तक्रारदारास साधे दोन ओळीचे उत्तर ही देणे योग्य समजत नाहीत,सध्या अशी परिस्थिती दिसते की अधिकारी,कर्मचारी आपला खिसा कसा गरम होईल हे पाहत आहेत,दुसरीकडे दलालांनी कार्यालयाचा ताबा घेतला की काय हा प्रश्न उपस्थित होतो आहे,कारण की दलालाशिवाय काम होणे अश्यक,अनेक कार्यालयातील अधिकारी कार्यालयात कमी घरी जास्त फाईल हाताळत असल्याची चर्चा असून,मागील काळात नेत्याचा दबदबा अधिकाऱ्यावर असायचा,विरोधी पक्ष सक्षम असायचा पण सध्या नेत्याचा दबदबा दिसत नाही तर विरोधी पक्षच शिल्लक नसल्याने अधिकाऱ्याचे फावत असून तालुक्यात लोकशाही चा बोजवारा,नोकरशाही चा बोलबाला चे चित्र दिसत असल्याने जनता मात्र त्रस्त दिसत आहे
*उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात ०९ जुलै रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा* उदगीर : जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर मॉडेल करिअर सेंटर व उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ९ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता उदगीर येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय येथे हा रोजगार मेळावा होणार असून या मेळाव्यात रोजगार देणारे एकूण १० पेक्षा जास्त आस्थापना, उद्योजक यांनी ३३५ रिक्तपदे अधिसूचित केली आहेत. हैदराबाद येथील अमॅझॉन (केएल ग्रुप) मध्ये वेअरहाऊस असोशिएटच्या ७५ जागा भरण्यात येणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता दहावी, बारावी, कोणतीही पदवी, आयटीआय, डिप्लोमा राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील साई मॅनपावर सर्व्हिसेसमध्ये ट्रेनीच्या ५० जागा भरण्यात येणार असून यासाठी बीएस्सी ॲग्री, बी.ई., बी.टेक, आयटीआय, ॲग्री डिप्लोमा अशी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील युनिक मॅनेजमेंट सर्व्हिसेसमध्ये ट्रेनीच्या ५० जागा भरल्या जाणार असून यासाठी आयटीआय (फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, टर्नर, टिडीएम) ही पात्रता निश्चित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील क्लॅड मेटल इंडिया प्रा.लि. व संगकज इंडस्ट्री प्रा.लि.मध्ये ट्रेनीच्या ४५ जागा भरल्या जाणार असून यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशन, इलेक्ट्रॉनिक, आरएसी, टि.डी.एम अशी राहणार आहे. लातूर येथील इक्वीनॉक्स टेक्नोलॉजीमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह, सर्व्हिस टेक्नीशिअन, वेल्डरच्या १५ जागा भरल्या जाणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता दहावी, बारावी, कोणतीही पदवी, आयटीआय, डिप्लोमा (वेल्डर) अशी राहील. तसेच पुणे येथील तिरूमला फॅसिलिटी येथे ट्रेनीच्या ५० जागा भरल्या जाणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता आयटीआय अशी राहणार आहे. मुथुट मायक्रोफिन प्रा.लि.मध्ये फिल्ड ऑफिसरच्या २० जागा भरण्यात येणार असून यासाठीची शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी, कोणतीही पदवी, आयटीआय राहील. लातूर येथील लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या उदगीर शाखेत बिमा सल्लागारच्या १० जागा भरण्यात येणार असून यासाठी इयत्ता दहावी, बारावी, कोणतीही पदवी अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. उदगीर येथील एसबीआय लाईफ इन्शुरन्समध्ये डेव्हलपमेंट मॅनेजर, लाईफ मित्राच्या १० जागा भरल्या जाणार असून यासाठी इयत्ता दहावी, बारावी, कोणतीही पदवी अशी शैक्षणिक पात्रता राहील. लातूर येथील क्रेडिट ॲक्सीस ग्रामिण लि.मध्ये रिलेशनशिप ऑफिसरच्या १० जागा भरण्यात येणार असून पदवीधारक उमेदवार यासाठी पात्र राहतील. रिक्तपदे निहाय इच्छुक उमेदवारांनी ९ जुलै, २०२५ रोजी सकाळी १० वाजता उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय येथे स्वखर्चाने मुलाखतीसाठी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, स्वत:चा रिझ्युम, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यादीच्या पाच प्रतीसह उपस्थित रहावे. या संधीचा लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या ०२३८२- २९९४६२ दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
वारीत महिलांचे दागिने चोरी करणारे उदगीरचे चोरटे अटकेत उदगीर=संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्‌गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात दागिने चोरणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून २३ तोळे सोन्याचे दागिणे, १४ मोबाईल असा एकूण २३ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चांदणी शक्ती कांबळे (३२), रिटा उर्फ गंगा नामदेव कांबळे (३५), बबिता सूरज उपाध्ये (२७), पूजा धीरज कांबळे (३५, सर्व रा. उदगीर, जि. लातूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील आरोपी हे रेकॉर्डवरील आहेत.अशी माहिती पोलिसांनी दिली आहे
उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे:- श्री बस्वराज पाटील नागराळकर अध्यक्ष महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी उदगीर उदगीर:- उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे असून आज ज्या काही संस्था कार्यरत आहेत त्या व्यापाऱ्याच्या सहयोगामुळे असून उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असल्याचे महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर यांनी अडत व्यापारी वेलफेअर असोसिएशन वतीने आयोजित महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभास उत्तर देताना म्हणाले अडत वेलफेअर असोसिएशन वतीने आज रोजी अडत मार्केट मध्ये महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभ आयोजित केला होता,यात सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर,उपाध्यक्ष प्रकाश तोंडारे,सचिव डॉ रामप्रसाद लखोटिया,सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य शिवाजीराव हुडे,अजय दंडवते,आडेप्पा अंजुरे,शिवराज वल्लापुरे ,भाग्यश्री चाकुरकर,बस्वराज पाटील,नाथराव बंडे ,प्रशांत पेन्सलवार,अरविंद पाटील, दिलीप चौधरी,रमाकांत अंकुलगे,भिमाशंकर मुद्दा,मल्लिकार्जुन मानकरी, रामचंद तिरूके,डॉ. श्रीकांत मध्वरे , मन्मथ बिरादार यांचा सत्कार आयोजित केला होता,या वेळेस सत्काराला उत्तर देताना श्री बस्वराज पाटील नागराळकर म्हणाले की महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी ही संस्था व्यापाऱ्यांनी,शेतकारयानी आपल्या कस्टाटुन उभी केली असुन,उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असून व्यापाऱ्याच्या योगदानामुळे उदगीर चा विकास झाला ,आमचे ध्येय एकच आदर्श विद्यार्थी घडविणे हेच आमचे स्वप्न आहे असेही ते म्हणाले,आज आम्ही जे आहोत ते व्यापाऱ्यामुळे या वेळेस अडत वेलफेअर असोसिएशन वतीने उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांना लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचा महेश गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल बस्वराज पाटील नागराळकर,शिवाजीराव हूडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य जगदीश बाहेती,रवींद्र कोरे अडत वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष श्रीधर बिरादार,नागेश आंबेगाव,साईनाथ कोरे,उमाकांत पांढरे,मल्लिकार्जुन काळगापूरे, श्याम बिरादार, मनोहर बिरादार,शिवाजी पेठे, शिवशंकर बिरादार,मधुकर पाटील, पी. पी.पाटील,साईनाथ कल्याणे,प्रमोद पाटील, कमलाकर भंडे, शांतवीर मुळे,मारुती कडेवार,दिलीप पाटील,दिगंबर गोटमुकले, सुरेश लांडगे,गौतम पिंपरे,विश्वनाथ यलवंतगे, भरत दंडीमे,अरविंद जिरगे,गंगाधर बिरादार,लक्ष्मणराव मोमले, राम बिरादार, संकेत बिरादार,कोंडीराम काळोजी,भिमाशंकर गठोडे सह अडत व्यापारी,सर्व गुमस्था,हमाल उपस्थित होते
Image
अट्रोसिटी च्या गुन्ह्यात एकूण बारा आरोपीना उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन. 👉 कोणाळी येथील आरोपींना ॲड अजिंक्य रेड्डी यांच्याकडून न्याय देण्याचा प्रयत्न उदगीर: फिर्यादी ने दाखल केलेल्या तक्रारींचे अवलोकन केले असता प्रथम दर्शनी गुन्हा केला असे सिद्द होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले असता, मा. उच्च न्यायालयाचे मा. न्या. किशोर संत यांनी अट्रोसिटी कायद्याचा उद्देश अन्याया विरोधात होणे अपेक्षित असून सदर कायद्यांतर्गत प्रथम दर्शनी गुन्हा सिद्ध होत नसल्यास अशा प्रकारांना मध्ये उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत याचिका कर्त्यांना संरक्षण देणे न्यायोचित आहे असे निरीक्षण नोंदवले. प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादी महेंद्र रमेश काळे राहणार कोनाळी ता देवणी यांनी अशोक बिरादार व इतर ११ यांचे विरुद्ध कलम ३(१) r,s,t,y अट्रोसिटी कायदा, 1989 अंतर्गत जातीवाचक शिवीगाळ केले बाबत, पवित्र पंचशील ध्वज याचा अवमान केला, हौदाची तोडफोड केली. सदर गुन्हयात अशोक बिरादार यांचा ट्रॅकटर आणि अंकुश चामले यांचा जे सी बी वापरला असे आरोप करत पोलीस ठाणे देवणी येथे फिर्याद दिली. आरोपीनी मा. सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिन केला असता मा. सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. सदर नाराजीने त्यांनी मा. उच्च न्यायालयात ॲड.अजिंक्य रेड्डी यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन करीत याचिका दाखल केली. फिर्यादी हा राजकीय पार्श्वभूमी असलेला व्यक्ती असून सदर फिर्यादी मध्ये एकूण १२ आरोपी विरोधात ढोबळ आरोप करून जास्तीत जास्त आरोपीवर ऍट्रॉसिटी कायदा लागू करण्याबाबत फिर्यादी प्रयत्नशील आहे. फिर्यादीचे सूक्ष्म अवलोकन केले असता ऍट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदी लागू होत नसल्याचे निदर्शनास येते. सदर बाब पाहता प्रथम दर्शनी आरोपीवर खोटा गुन्हा दाखल केल्याची शक्यता नाकारता येत नाही अश्या आशयाचा युक्तिवाद केला. मा. उच्च न्यायालयाने सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या कार्यपद्धती बाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आरोपी यांना खोट्या गुन्ह्यात गोवल्या जाण्याची दाट शक्यता आहे असे निरीक्षण नोंदवून सर्व आरोपींना अंतरीमअटकपूर्व जमीन दिला. सदर प्रकरणी सात आरोपी यांचे तर्फे ॲड.अजिंक्य रेड्डी यानी बाजू मांडली त्यांना ॲड. हबीब शेखॲड. विष्णू कंदे यांनी सहकार्य केले.
पत्रकार भवन कृती समिती निमंत्रक पदी अर्जुन जाधव 👉 कृती समितीच्या 59 पैकी 37 सदस्यांनी केली बिनविरोध निवड उदगीर= येथील पत्रकार भवन दर्जेदार व्हावे या साठी पत्रकारांनी कृती समिती स्थापन केली होती , त्या पत्रकार भवन चे काम निकृष्ट होत असल्याने पत्रकारांनी वेळोवेळी अनेक निवेदन दिली पण निकृष्ट काम करणाऱ्यास प्रशासकीय अधिकारी पाठीशी घालत असल्याने आज कृती समितीच्या 59 पत्रकारांपैकी 37 पत्रकारांनी या बाबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृती समिती निमंत्रक म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे उदगीर तालुका पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती प्रमुख अर्जुन दत्तात्रय जाधव यांची नियुक्ती केली असून त्यांच्या नेतृत्वाखाली आज पत्रकारांनी उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर बोंब मारो आंदोलन करून उपजिल्हाधिकारी श्री सुशांत शिंदे यांना निवेदन दिले असून उपजिल्हाधिकारी यांनी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर त्वरित कार्यवाही करून पुढील काम त्वरित चालू करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या
Image
हर्षदा सामासे चे नीट परीक्षेत उत्तुंग यश 👉कोणत्याही खाजगी क्लासेस न लावता हर्षदा सामाले चे नीट परीक्षेत घवघवीत यश उदगीर= येथील रहिवाशी हर्षदा बबिता अर्जुनराव सामाले वडिलांचे एक छत्र हरवलेले असताना देखील नीट परीक्षेत कोणत्याही खाजगी क्लासेस विना 720 पैकी 618 गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल हर्षदाची आई बबिता अर्जुनराव सामाले यांनी मुलगा मुलगी भेद न करता हर्षदाचे वडील अर्जुनराव सामाले यांनी हर्षदा अगदी लहान असताना देवाज्ञा झाली तरी धीर न सोडता बबिता सामाले यांनी आपली मुलगीच आपला मुलगा आहे असे समजून हर्षदाला चांगले शिक्षण व संस्कार देऊन तिला घडवले असून त्याचाच परिपाक म्हणजे आज हर्षदाने आईने केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून कोणत्याही खाजगी क्लास विना तब्बल 618 गुण घेऊन आईच्या कष्टाची चीझ केली आहे. या यशाबद्दल हर्षदाचे आजोबा अशोकराव देशमुख, आजी सुमनबाई देशमुख, मामा गजानन देशमुख, राहुल देशमुख, श्रीकांत देशमुख यांनी आनंद व्यक्त करून हर्षदाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Image