उदगीर मधील 10 रुग्ण पॉजिटिव 

उदगीर मधील 10 रुग्ण पॉजिटिव 


*उदगीर येथुन एकुण 17 व्यक्तींचे स्वॅबपैकी  10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह, 4 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह असून 3 व्यक्तीची पुनर्तपासणी होणार*


*उस्मानाबाद येथील 61 व्यक्तीच्या स्वॅबपैकी 58 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह असून 2 व्यक्तीच्या स्वबची पुनर्तपासणी होणार*


*बीड येथील 10 व्यक्तींचे स्वॅबपैकी 8 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह असुन 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह*


*विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आजपर्यंत एकुण 8391 व्यक्तींची तपासणी*



लातूर, दि.16:- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 96 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी या संस्थेतील 7 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते व तेे सर्वच 7 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 4 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत व 3 व्यक्तीचे अहवाल ( Inconclusive) आले असल्यामुळे  त्यांची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. रेणापूर येथील 1 व्यक्तीच्या  स्वॅबची तापसणी करण्यात आली असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
       उस्मानाबाद येथील 61 व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी  58 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 2 व्यक्तीचे अहवाल ( Inconclusive) आले असल्यामुळे  त्यांची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे व एका व्यक्तीचा स्वॅब परिपुर्ण न आल्यामुळे Reject करण्यात आला आहे व बीड येथील 10 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 8 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत असे एकूण 12 पॉझिटिव्ह, 78 निगेटिव्ह, 5 (Inconclusive) व 1 Reject अहवाल आहे अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. 


     विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 16.05.2020 रोजी सकाळी 8.00 ते दु 4.00 पर्यंत कोरोना (कोविड-19) बाहयरुग्ण विभागात एकुण 190व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आजपर्यंत एकुण 8391 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असुन आजपर्यंत एकुण 313 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे.  त्यापैकी 304 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले असुन यापूर्वीच दिनांक 04.04.2020 रोजी 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले होते ते रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना या रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे व एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित आहे.   आजपर्यंत 222 व्यक्तींचा Home Quarantine  कालावधी समाप्त झाला असुन एकुण 82 व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत Home Quarantine मध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र विभाग डॉ. मारुती कराळे यांनी दिली.


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image