उदगीर 3 पैकी 1 पॉझिटिव्ह, 2 निगेटिव  :-नूर कॉलनी, शेलाळ रोड उदगीर येथील 1 रुग्ण पॉझिटीव्ह 

उदगीर 3 पैकी 1 पॉझिटिव्ह, 2 निगेटिव 


:-नूर कॉलनी, शेलाळ रोड उदगीर येथील 1 रुग्ण पॉझिटीव्ह 


:-लातूर जिल्ह्यातील 60 पैकी 51 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह, 5 अहवाल पॉझिटिव्ह तर चार अनिर्णीत


:-जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 53, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 130 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 8.                                                     उदगीर :- लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 14 जून 2020 रोजी एकूण 60 व्यक्तींचे स्वाब तपासणीसाठी आलेले होते. त्यातील 51 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले असून 5 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 4 व्यक्तींचे आवाहल अनिर्णीत आहेत, अशी माहिती संस्थेचे अधिष्ठता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.


    विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 31 व्यक्तीच्या स्वबची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 03 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. यातील 1 रुग्ण मोती नगर, 1 रुग्ण भुसार लाईन येथील पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे व सरस्वती कॉलनी औसा रोड लातूर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. लातूर शहरातील एकूण 03 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.


     उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून तीन व्यक्तीचे स्वाब तपासणीसाठी आलेले होते त्यातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून ती व्यक्ती नूर पटेल कॉलनी उदगीर येथील आहे तर निलंगा येथून दोन स्वाब तपासणीसाठी आलेले होते त्यातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह असून ती व्यक्ती चांदोरी तालुका निलंगा येथील असून उर्वरित एक अहवाल अनिर्णित आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी दिली आहे.


    बाभळगाव येथील पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 21 व्यक्तीचे स्वाब कोविड केअर सेंटर एम. आय. डी. सी. लातूर येथुन तापसणीसाठी आले होते त्यापैकी 20 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल अनिर्णित आला आहे.


    जिल्ह्यात आज रोजी पर्यंत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 53, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 130 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 8 असून आज पर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 191 इतकी आहे.


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image