उदगीर येथील 3 रुग्ण पॉझिटीव्ह

उदगीर येथील 3 रुग्ण पॉझिटीव्ह


1 रुग्ण भाजी मंडई, दूसरी अंबेसंगे गल्ली येथील तर तिसरा सराफ लाइन येथील 


:-उदगीर येथील 5 पैकी 3 निगेटिव, 2 पॉझिटिव्ह 


:-लातुर 56 पैकी 41 निगेटीव्ह 06 पॉझिटीव्ह 07 प्रलंबित ०२ Inconclusive


उदगीर :- लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 10.06.2020 रोजी लातुर जिल्हयातील एकुण 56 व्यकतींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील एकुण 23 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 16 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन ०३ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित असुन ०४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यापैकी 02 व्यक्ती लातुर शहरातील असुन एक व्यक्ती उस्मानपुर येथील आहे व दुसरी व्यक्ती हत्ते नगर येथील आहे. 


एक व्यक्ती उदगीर येथील सराफ लाईन येथील आहे व दुसरी व्यक्ती अंधोरा, औसा येथील आहे. 


उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन ०५ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ०३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन ०२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. औसा येथुन २4 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 22 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन ०२ व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत. कोविड केअर सेंटर, लातुर येथुन ०४ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. 


असे एकुण ५६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ४१ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन ०६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह, ०२ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह, ०७ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


 


विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील एका रुग्णांचा दिनांक 10.06.2020 रोजी (मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान) मृत्यु झालेला असुन हा रुग्ण दिनांक 02.06.2020 रोजी ८ दिवसांपुर्वी सोलापुर येथुन प्रवास करुन आल्यामुळे त्यांना भुक लागत नव्हती, अशक्तपणा येत होता त्यामुळे रुग्णालयात दाखल झाला होता. हा रुगण औसा येथील कादरी नगर येथील असुन त्यांना पुर्वीपासुनच किडनीचा आजार, उच्च् रक्तदाब व मधुमेह होता, त्यांचे दोन वेळा डायलिसीस करण्यात आले होते. सदर रुग्ण दाखल झाल्यापासुन ऑक्सीजन सर्पोर्टवर होता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झालेला आहे. 


 


तसेच आज दिनांक 10.06.2020 रोजी एका रुग्णाचा मृत्यु झालेला आहे. हा रुग्ण दिनांक 28.06.2020 रोजी या संस्थेच्या रुग्णालयात दाखल झाला होता. हा रुग्ण मोती नगर, लातुर येथील असुन कुटूंबातील पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोना (कोविड 19) ची लागण झाली होती. त्यांना रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच उच्च् रक्तदाबाचा त्रास होता, रुग्णालयात दाखल झाल्यापासुन ते ऑक्सीजन सर्पोर्टवर होते, दिनांक 04.06.2020 रोजी पासुन ते व्हेंटीलेटर सपोर्टवर होते. कोरोना मुळे त्यांना निमोनिया झाला होता व अगोदरपासुनच उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान मृत्यु झालेला आहे अशी माहिती डॉ. राजेश बोबडे सहाय्यक प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र विभाग व डॉ. मारुती कराळे कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख यांनी दिली.


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image