कृष्णा रामेश्वरजी भराडीया ची सहायक गट विकास अधिकारी पदी निवड


उदगीर :- लातूर येथील प्रतिष्ठित व्यापारी रामेश्वरजी भराडीया चे सूपुत्र कृष्णा यांची राज्यसेवा मार्फत सहायक गट विकास अधिकारी पदी नियुक्ति झाली आहे 


कृष्णा रामेश्वरजी भराडीया ने 2018 मध्ये झालेल्या राज्य सेवा परीक्षेत 125 वा नंबर घेतला असून त्यास 529 गुण मिळाले आहेत , शुक्रवारी आलेल्या निकालात त्याची सहायक गट विकास अधिकारी पदी निवड झाली आहे , त्याच्या कुटुंबात कोणी ही अधिकारी नाही, सर्व व्यापारात असतानाही त्याने हे यश प्राप्त केले आहे, लहानपणापासून हुशार असलेल्या कृष्णा चे प्राथमिक शिक्षण पुरणमल लाहोटी स्कूल लातूर, तर माध्यमिक शिक्षण वेंकटेश माध्यमिक विद्यालय लातूर येथे झाले , शाहू महाविद्यालयातून विज्ञान विभागातून शिक्षण घेऊन तो कॉलेज ऑफ पूना येथुन सिविल (सापत्य) अभियंत्याची पदवी प्राप्त केली पण त्याची अधिकारी बनण्याची इछ्या असल्याने त्याने राज्य सेवा व लोकसेवे ची तयारी सुरू केली त्याने दुसर्‍याच प्रयत्नात राज्य सेवेचे यश प्राप्त केले आहे , त्यास आय. ए. एस. बनायचे असून त्याने केंद्रीय लोकसेवा आयोग चीही परीक्षा दिली असून त्याचा निकाल येणे बाकी आहे, त्याच्या या निवडी वर लातूर जिल्हा माहेश्वरी सभे चे अध्यक्ष राजकुमार पलोड, सचिव फूलचंद काबरा, ओमप्रकाश सारडा, ओमप्रकाश बजाज, उदगीर तालुका माहेश्वरी सभेचे मार्गदर्शक डॉ रामप्रसाद लखोटीया, ईश्वरप्रसाद बाहेती, अध्यक्ष विनोदकुमार टवानी, सचिव श्रीनिवास सोनी यांनी त्याचे व त्याच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले असून त्याच्या पुढील वाटचालीसाठी ही त्यास शुभेच्छा दिल्या आहेत


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image