आज च्या दिवसाची सुवर्ण अक्षरात नोंद अयोध्या येथे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री राम मंदिराचे भूमिपूजन संपन्न


:-उदगीर मध्ये रामभक्तानी फटाके फोडून केला आनंदोत्सव साजरा 


:-हनुमान गढ़ी येथे श्री हनुमानजी चे दर्शन घेऊन पंतप्रधान श्री रामलल्ला ला साष्टांग दंडवत घालत घेतले श्री रामलल्ला चे दर्शन पश्च्यात 12 वाजून 44 मिनिट 8 सेकंड शुभ मुहूर्तावर भूमिपूजन संपन्न


उदगीर :- सकल विश्वा चे श्रद्धां स्थान, भारतीयांचे अराध्य दैवत प्रभू श्री राम यांच्या जन्मभूमि अयोध्या येथे आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री राम मंदिराचे भूमिपूजन मोठ्या थाटात वेद मंत्रांच्या जयघोषात 12 वाजून 44 मिनिट 8 सेकंड या शुभ मुहूर्तावर 9 शिळा चे पूजन करून संपन्न झाले


आज चा दिवस प्रभू श्री राम भक्ता च्या आयुष्यातील एक अविस्मरणीय असा राहिला, आज अयोध्या येथे प्रभु श्री रामजी यांच्या भव्य मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 वाजुन 44 मिनिट 8 सेकंड या शुभ मुहूर्तावर संपन्न झाले, श्री राम मंदिर निर्माण साठी अयोध्या येथे 2 लाख 75 हजार शीला राम भक्तानी पाठवल्या होत्या त्या पैकी 9 शीला चे पूजन करून भूमिपूजन करण्यात आले या वेळेस उत्तर प्रदेश राज्यपाल आनंदीबेन पटेल, आर एस एस प्रमुख मोहन भागवत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सोबत मंदिर ट्रस्ट पदाधिकारी व अनेक साधू संत उपस्थित होते, पुढील तीन वर्षात येथे भव्य दिव्य मंदिर निर्माण होऊन त्यात श्री रामलल्ला विराजमान होतील, आज चा दिवस रामभक्ता च्या जीवणातील अविस्मरणीय क्षण राहिला तर उदगीर येथील या क्षणी फटाके फोडून रामभक्तानी आनंदोत्सव ही साजरा केला


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image