उदगीरात श्री विसर्जनाला आजोबा गणपतीच्या महाआरती ने सुरुवात

उदगीरात श्री विसर्जनाला आजोबा गणपतीच्या महाआरती ने सुरुवात


:- पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, अतरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपजिल्हाधिकारी डॉ. प्रविण मेंगशेट्टी, नपा मुख्याधिकारी भारत राठोड, तहसीलदार वेंकटेश मुंडे, पूर्व नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांच्या हस्ते महाआरती करून विसर्जनाला सुरुवात


उदगीर :- उदगीर येथे प्रति वर्षा प्रमाणे या वर्षी आज शुक्रवार 28 ऑगस्टला सकाळी 11 वाजता पारकट्टी गल्लीतील आजोबा गणपतीच्या महाआरती ने श्री विसर्जनाला सुरुवात झाली, कोरोंना मुळे कुठलीही मिरवणूक काढण्यात येणार नसून नगरपालिका तर्फे गणेश मंडळा च्या जागेवर जाऊन पर्यावरण पूरक टाकीत श्री विसर्जन करण्यात येत आहे


उदगीर येथे आज 7 व्या दिवशी श्री विसर्जनाला पारकट्टी गल्ली येथील आजोबा गणपतीची आरती पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, अतरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपजिल्हाधिकारी डॉ. प्रविण मेंगशेट्टी, नपा मुख्याधिकारी भारत राठोड, तहसीलदार वेंकटेश मुंडे, पूर्व नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांनी करून सकाळी 11 वाजता सुरुवात केली, नगर परिषद तर्फे शहरातील गणेश विसर्जनासाठी 18 ट्रॅक्टर सजउन प्रतेक ट्रॅक्टर मध्ये पर्यावरण पूरक पाणी टाकी ठेऊन ते वाहन प्रतेक गणेश मंडळाच्या ठिकाणी जाऊन त्या टाकीत श्री विसर्जन करण्यात येत आहे या साठी नपा मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतेक ट्रॅक्टर वर 1 निरीक्षक, 5 कर्मचारी, 1 पुजारी व 1 चालकाची वेवस्था केली असून यातच श्री विसर्जन करण्यात येत आहे. कोरोंना मुळे या वर्षी प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करत श्री विसर्जनाला सुरुवात झाली आहे, उदगीर चे उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत चव्हाण यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image