उदगीरच्या पडीत ट्रामा केअरच्या बांधकामासाठी २७६ लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता:- संजय बनसोडे


 


 उदगीर :-उदगीर येथील ट्रामा केअर सेंटर च्या दुसर्‍या टप्प्याच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाने 276 लक्ष निधी साठीची प्रशासकीय मान्यता दिली आहे. सदर ट्रामा केअर सेंटर चे बांधकाम सन २०१३ मध्ये सुरू करण्यात आले होते. 


परंतु सदर ट्रामा केअर सेंटरचे बांधकाम निधीअभावी अर्धवट स्थितीमध्ये होते त्यामुळे ट्रामा केअर सेंटरची इमारत वापरात नव्हती. अनेक वर्षे धुळखात पडलेल्या ट्रामा केअर सेंटर चालु करण्याबाबत व निधीसाठी ना. संजय बनसोडे यांनी विशेष लक्ष घातले होते व त्यासाठी पालकमंत्री मा. ना. श्री. अमित देशमुख साहेब यांच्या मान्यतेने आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांनी २७६.६० लक्ष इतक्या रकमेचा बांधकामाचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. 


सध्या स्थितीत लातूर जिल्ह्यामध्ये covid-19 रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे त्यासाठी अपूर्ण असलेल्या ट्रामा केअर सेंटरचे काम पूर्ण होणे अत्यंत आवश्यक होते जेणेकरून या इमारतीमध्ये DEDICATED COVID HOSPITAL ( DCH ) सुरू करून रुग्ण सेवा देणे गरजेचे होते. वाढती रुग्ण संख्या पाहता हे काम तात्काळ होणे गरजेचे होते. यासाठी राज्य शासनाने ट्रामा केअर सेंटर च्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामांसाठी २.७६ लाख रू. निधीसाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे.


यासाठी मागील ५ महिन्यापासून मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेब,वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. अमित विलासराव देशमुख साहेब, मा. ना. श्री. राजेश टोपे साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सदरील निधी मंजूर करून घेतला आहे,त्यामुळे अनेक वर्षे धूळ खात पडलेला ट्रामा केअर सेंटर चा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे ,त्यामुळे उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या आरोग्य सुविधेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ट्रामा केअर सेंटर प्रकल्प पूर्णत्वाला जाऊन सर्व सामान्य नागरिकाच्या आरोग्य सेवेसाठी तयार होणार आहे.


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image