शामार्य कन्या विद्यालयातील प्रभारी मुख्याध्यापिकेस बडतर्फ करण्याची मागणी. 


 


उदगीर :- उदगीर येथील शामार्य कन्या विद्यालयातील शालेय पोषण आहार चोरी प्रकरणी प्रभारी मुख्याध्यापिकेस बडतर्फ करून संबंधित मुख्याध्यापिकेची पाठराखण करणाऱ्या जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी लातूरचे जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत यांना दि. २९ ऑक्टोंबर रोजी भेटून दिले आहे.


उदगीर येथील शामार्य कन्या विद्यालयातील प्रभारी मुख्याध्यापिकेने एक ते दीड क्विंटल शालेय पोषण आहार चोरून घरी घेऊन जात असले बाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांना व्यंकटराव पनाळे यांनी दिली आहे.  


उदगीर शहरातील बहुचर्चित आणि नामांकित कन्या विद्यालया मधील प्रभारी मुख्याध्यापिका यांनी शालेय पोषण आहार शाळेतून चोरून घेऊन घराकडे अँटोरिक्षा मधून जात असताना काही लोकांनी प्रत्यक्ष पाहिले व शालेय पोषण आहार घेऊन जात असलेल्या ॲटोरिक्षाचे फोटोही काढून घेतले. आणि सदरची माहिती उदगीर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयास कळवली. त्यानंतर उदगीरच्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयातून शालेय पोषण आहार चोरून घेऊन जात असलेल्या मुख्याध्यापिका बाईला फोनवरून एका अधिकारी बाईने ऑटोरिक्षाचा पोलीस पाठलाग करत असल्याचे कळवल्यामुळे या प्रभारी मुख्याध्यापिका बाईने घाबरून जाऊन ऑटोरिक्षा शाळेकडे परत नेऊन चोरून घेऊन जात असलेला एक ते दीड क्विंटल शालेय पोषण आहार परत शाळेत आणून शाळेचा सेवक हनुमंत मरे कडून उतरवून घेतला. याही वेळेस अनेक लोकांनी ज्या ॲटोतून शालेय पोषण आहार प्रभारी मुख्याध्यापिका घेऊन गेल्या होत्या तोच परत येऊन शाळेत उतरवत असतानाही लोकांनी पाहिले. आणि वार्ता शहरात पसरताच शाळेजवळच बघ्यांची गर्दी झाली. दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन या प्रकरणात उदगीरचे गट शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी चौकशी केली आहे. तसेच पंचनामा केला आहे, मात्र पुढे काय झाले हे अजून गुलदस्त्यातच आहे ? 


गटशिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांना फोनवरून चौकशी केली असता हा विषय गोपनीय असल्यामुळे सांगता येत नाही असे उडवाउडवीची उत्तरे दिली ? शालेय पोषण आहाराची चोरी प्रकरण यात गोपनीयता असण्याचे नेमके कारण काय ? हे प्रकरण मलिदा खाऊन मिटवले जाणार अशी शंका येते ! 


कारण प्रभारी मुख्याध्यापिका बाईची बेकायदेशीरपणे व नियमबाह्य मुख्याध्यापक पदाची कायमची ऑर्डर काढण्यासाठी


माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांनी पैसे घेऊन प्रभारी मुख्याध्यापिका बाईंची कायम मुख्याध्यापिका अशी ऑर्डर लिहून स्वाक्षरी करून सुद्धा ठेवली आहे. बाकी व्यवहार पूर्ण होताच ती ऑर्डर त्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे अशी बेकायदेशीर व नियमबाह्य ऑर्डर देणाऱ्या शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांच्यावरही कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे असे बेकायदेशीर काम करणारे शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे त्यांच्याकडून या शालेय पोषण आहार चोरी प्रकरणात कांही कार्यवाही होईल असे वाटत नाही. गटशिक्षणाधिकारी फुलारी आणी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे कांही कार्यवाही करतील अशी अपेक्षा सुद्धा बाळगू नका ! असे खाजगीत जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याने व एका जिल्हा परिषदेच्या सन्माननीय सदस्यांनी त्यांच्या पूर्व अनुभवावरून सांगितले असल्याचा हि उल्लेख या निवेदनात केलेला आहे. मात्र उदगीर शहरातील तमाम जनतेचे आणि प्रभारी मुख्याध्यापिका बाई शालेय पोषण आहार चोरून घेऊन जात असताना व परत शाळेत आणून ठेवत असताना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे या प्रकरणाकडे विशेष लक्ष आहे. विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार हडप करणाऱ्या या प्रवृत्तीवर वेळीच कार्यवाही होणे गरजेचे आहे अन्यथा शालेय पोषण आहार चोरी प्रकरणात वाढ होत राहील. जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे शालेय पोषण आहार चोरीचे प्रकार घडत आहेत आणि ते प्रकार होत राहतील. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी शालेय पोषण आहार चोरणाऱ्या मुख्याध्यापिकेस बडतर्फ करून पाठराखण करणारे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांच्यावरही कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे, संभाजीराव आयनिले, सादिक शेख, वीरणाथ अंबुलगे, दयानंद चव्हाण यांनी केली आहे.


Popular posts
वारीत महिलांचे दागिने चोरी करणारे उदगीरचे चोरटे अटकेत उदगीर=संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्‌गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात दागिने चोरणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून २३ तोळे सोन्याचे दागिणे, १४ मोबाईल असा एकूण २३ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चांदणी शक्ती कांबळे (३२), रिटा उर्फ गंगा नामदेव कांबळे (३५), बबिता सूरज उपाध्ये (२७), पूजा धीरज कांबळे (३५, सर्व रा. उदगीर, जि. लातूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील आरोपी हे रेकॉर्डवरील आहेत.अशी माहिती पोलिसांनी दिली आहे
उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे:- श्री बस्वराज पाटील नागराळकर अध्यक्ष महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी उदगीर उदगीर:- उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे असून आज ज्या काही संस्था कार्यरत आहेत त्या व्यापाऱ्याच्या सहयोगामुळे असून उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असल्याचे महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर यांनी अडत व्यापारी वेलफेअर असोसिएशन वतीने आयोजित महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभास उत्तर देताना म्हणाले अडत वेलफेअर असोसिएशन वतीने आज रोजी अडत मार्केट मध्ये महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभ आयोजित केला होता,यात सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर,उपाध्यक्ष प्रकाश तोंडारे,सचिव डॉ रामप्रसाद लखोटिया,सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य शिवाजीराव हुडे,अजय दंडवते,आडेप्पा अंजुरे,शिवराज वल्लापुरे ,भाग्यश्री चाकुरकर,बस्वराज पाटील,नाथराव बंडे ,प्रशांत पेन्सलवार,अरविंद पाटील, दिलीप चौधरी,रमाकांत अंकुलगे,भिमाशंकर मुद्दा,मल्लिकार्जुन मानकरी, रामचंद तिरूके,डॉ. श्रीकांत मध्वरे , मन्मथ बिरादार यांचा सत्कार आयोजित केला होता,या वेळेस सत्काराला उत्तर देताना श्री बस्वराज पाटील नागराळकर म्हणाले की महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी ही संस्था व्यापाऱ्यांनी,शेतकारयानी आपल्या कस्टाटुन उभी केली असुन,उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असून व्यापाऱ्याच्या योगदानामुळे उदगीर चा विकास झाला ,आमचे ध्येय एकच आदर्श विद्यार्थी घडविणे हेच आमचे स्वप्न आहे असेही ते म्हणाले,आज आम्ही जे आहोत ते व्यापाऱ्यामुळे या वेळेस अडत वेलफेअर असोसिएशन वतीने उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांना लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचा महेश गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल बस्वराज पाटील नागराळकर,शिवाजीराव हूडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य जगदीश बाहेती,रवींद्र कोरे अडत वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष श्रीधर बिरादार,नागेश आंबेगाव,साईनाथ कोरे,उमाकांत पांढरे,मल्लिकार्जुन काळगापूरे, श्याम बिरादार, मनोहर बिरादार,शिवाजी पेठे, शिवशंकर बिरादार,मधुकर पाटील, पी. पी.पाटील,साईनाथ कल्याणे,प्रमोद पाटील, कमलाकर भंडे, शांतवीर मुळे,मारुती कडेवार,दिलीप पाटील,दिगंबर गोटमुकले, सुरेश लांडगे,गौतम पिंपरे,विश्वनाथ यलवंतगे, भरत दंडीमे,अरविंद जिरगे,गंगाधर बिरादार,लक्ष्मणराव मोमले, राम बिरादार, संकेत बिरादार,कोंडीराम काळोजी,भिमाशंकर गठोडे सह अडत व्यापारी,सर्व गुमस्था,हमाल उपस्थित होते
Image
अट्रोसिटी च्या गुन्ह्यात एकूण बारा आरोपीना उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन. 👉 कोणाळी येथील आरोपींना ॲड अजिंक्य रेड्डी यांच्याकडून न्याय देण्याचा प्रयत्न उदगीर: फिर्यादी ने दाखल केलेल्या तक्रारींचे अवलोकन केले असता प्रथम दर्शनी गुन्हा केला असे सिद्द होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले असता, मा. उच्च न्यायालयाचे मा. न्या. किशोर संत यांनी अट्रोसिटी कायद्याचा उद्देश अन्याया विरोधात होणे अपेक्षित असून सदर कायद्यांतर्गत प्रथम दर्शनी गुन्हा सिद्ध होत नसल्यास अशा प्रकारांना मध्ये उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत याचिका कर्त्यांना संरक्षण देणे न्यायोचित आहे असे निरीक्षण नोंदवले. प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादी महेंद्र रमेश काळे राहणार कोनाळी ता देवणी यांनी अशोक बिरादार व इतर ११ यांचे विरुद्ध कलम ३(१) r,s,t,y अट्रोसिटी कायदा, 1989 अंतर्गत जातीवाचक शिवीगाळ केले बाबत, पवित्र पंचशील ध्वज याचा अवमान केला, हौदाची तोडफोड केली. सदर गुन्हयात अशोक बिरादार यांचा ट्रॅकटर आणि अंकुश चामले यांचा जे सी बी वापरला असे आरोप करत पोलीस ठाणे देवणी येथे फिर्याद दिली. आरोपीनी मा. सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिन केला असता मा. सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. सदर नाराजीने त्यांनी मा. उच्च न्यायालयात ॲड.अजिंक्य रेड्डी यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन करीत याचिका दाखल केली. फिर्यादी हा राजकीय पार्श्वभूमी असलेला व्यक्ती असून सदर फिर्यादी मध्ये एकूण १२ आरोपी विरोधात ढोबळ आरोप करून जास्तीत जास्त आरोपीवर ऍट्रॉसिटी कायदा लागू करण्याबाबत फिर्यादी प्रयत्नशील आहे. फिर्यादीचे सूक्ष्म अवलोकन केले असता ऍट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदी लागू होत नसल्याचे निदर्शनास येते. सदर बाब पाहता प्रथम दर्शनी आरोपीवर खोटा गुन्हा दाखल केल्याची शक्यता नाकारता येत नाही अश्या आशयाचा युक्तिवाद केला. मा. उच्च न्यायालयाने सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या कार्यपद्धती बाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आरोपी यांना खोट्या गुन्ह्यात गोवल्या जाण्याची दाट शक्यता आहे असे निरीक्षण नोंदवून सर्व आरोपींना अंतरीमअटकपूर्व जमीन दिला. सदर प्रकरणी सात आरोपी यांचे तर्फे ॲड.अजिंक्य रेड्डी यानी बाजू मांडली त्यांना ॲड. हबीब शेखॲड. विष्णू कंदे यांनी सहकार्य केले.
पत्रकार भवन कृती समिती निमंत्रक पदी अर्जुन जाधव 👉 कृती समितीच्या 59 पैकी 37 सदस्यांनी केली बिनविरोध निवड उदगीर= येथील पत्रकार भवन दर्जेदार व्हावे या साठी पत्रकारांनी कृती समिती स्थापन केली होती , त्या पत्रकार भवन चे काम निकृष्ट होत असल्याने पत्रकारांनी वेळोवेळी अनेक निवेदन दिली पण निकृष्ट काम करणाऱ्यास प्रशासकीय अधिकारी पाठीशी घालत असल्याने आज कृती समितीच्या 59 पत्रकारांपैकी 37 पत्रकारांनी या बाबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृती समिती निमंत्रक म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे उदगीर तालुका पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती प्रमुख अर्जुन दत्तात्रय जाधव यांची नियुक्ती केली असून त्यांच्या नेतृत्वाखाली आज पत्रकारांनी उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर बोंब मारो आंदोलन करून उपजिल्हाधिकारी श्री सुशांत शिंदे यांना निवेदन दिले असून उपजिल्हाधिकारी यांनी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर त्वरित कार्यवाही करून पुढील काम त्वरित चालू करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या
Image
मंडळधिकारी,तलाठी यांच्या बदल्या उदगीर :- महसूल विभागातील बहु चर्चित, नामांकित अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या , करोडो ची मालमत्ता जमविलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांची महसूल विभागाने बदल्या केल्या आहेत,यात अनेकांच्या तक्रारी प्रशासनाकडे प्रलंबित असल्याची चर्चा असून उदगीर तालुक्यातील सतरा तलाठी व चार मंडळ अधिकाऱ्यांना तालुक्या बाहेर बदली करण्यात आली आहे तर बाहेरून उदगीरला वीस तलाठी व दोन मंडळाधिकारी यांची नियुक्ती केल्याचे बदली आदेश जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने लातुरचे निवासी उपजिल्हाधिकारी केशव नटवे यांनी गुरुवारी (ता.२९) रोजी सायंकाळी काढले आहेत. उदगीर तालुक्यातील गावनिहाय बदली झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे (कंसात बदलीचे ठिकाण) अमोल रामशेट्टे निडेबन (अंबुलगा ता. निलंगा), बाबासाहेब कांबळे कौळखेड (मदनसुरी ता. निलंगा), सतीश लोहार रावणगाव (हलगरा, ता. निलंगा) बालाजी नागरगोजे वाढवणा ममदापूर (ता. निलंगा), विनिता पाटील (मोघा ता. अहमदपूर) संगीता माटरोल नळगीर कोनाळी (ता.देवणी), परशुराम जामतीने किनी याल्लादेवी (मंगळूर ता. जळकोट) दत्तात्रय मोरे दावणगाव डोंग्रर (ता.चाकूर) मेघशाम होळंबे टाकळी (बोरगाव (ता. चाकूर), आर एस गुंडरे लोणी (ताडमुळी ता. चाकुर) कुलदीप गायकवाड हाळी (आर्वी ता.लातूर), शिवानंद गुंडरे गुडसूर चाकूर-१. संतोष पाटील तोंडचिर कन्हेरी (ता. लातूर) ए.जी. वडर लोहारा शेळगाव (ता. चाकूर) श्रीमती ए व्ही शिंदे धोंडीहीप्परगा माकणी (ता. अहमदपूर) सोनाली पकाले नागलगाव (मोठेगाव ता. रेणापुर) सुषमा भंडारे शेकापूर (थोडगा ता.अहमदपूर) यांची बदली करण्यात आली आहे. उदगीर तालुक्यातील गावनिहाय बदली झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे (कंसात बदलीचे ठिकाण) अमोल रामशेट्टे निडेबन (अंबुलगा ता. निलंगा), बाबासाहेब कांबळे कौळखेड (मदनसुरी ता. निलंगा), सतीश लोहार रावणगाव (हलगरा, ता. निलंगा) बालाजी नागरगोजे वाढवणा ममदापूर (ता. निलंगा), विनिता पाटील (मोघा ता. अहमदपूर) संगीता माटरोल नळगीर कोनाळी (ता.देवणी), परशुराम जामतीने किनी याल्लादेवी (मंगळूर ता. जळकोट) दत्तात्रय मोरे दावणगाव डोंग्रर (ता.चाकूर) मेघशाम होळंबे टाकळी (बोरगाव (ता. चाकूर), आर एस गुंडरे लोणी (ताडमुळी ता. चाकुर) कुलदीप गायकवाड हाळी (आर्वी ता.लातूर), शिवानंद गुंडरे गुडसूर चाकूर-१. संतोष पाटील तोंडचिर कन्हेरी (ता. लातूर) ए.जी. वडर लोहारा शेळगाव (ता. चाकूर) श्रीमती ए व्ही शिंदे धोंडीहीप्परगा माकणी (ता. अहमदपूर) सोनाली पकाले नागलगाव (मोठेगाव ता. रेणापुर) सुषमा भंडारे शेकापूर (थोडगा ता.अहमदपूर) यांची बदली करण्यात आली आहे. उदगीर तालुक्यात रिक्त झालेल्या वीस गावात जिल्हाभरातून नियुक्ती करण्यात आलेल्यां तलाठयांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. प्रमोद मादळे- येणकी, माधव केंद्र- तोंडार, महेश गुपीले-निडेबन, प्रियंका पवार-किनी चल्ल्लादेवी, माधव जवळगे-भाकसखेडा, गणेश राठोड-कौळखेड, टी. एस. उसनाळे - टाकळी, डी. टी. जाधव -नागलगाव, जी. जी. माने रावणगाव, पी. बी. तेरकर-लोणी, माधव कवडेकर-गुडसूर, संदीप गवारे लोहारा, एम. आर. सुर्यवंशी-तोंडचिर समीरखान पठाण - नळगीर, प्रशांत बिराजदार -हाळी, एम. एम. शेख- वाढवणा, पी. डी. वंगवाड-मोघा, मजहरअली शेख -शेकापूर, शिवराज कांबळे डोंगरशेळकी, गजानन मुळे कुमठा.