शामार्य कन्या विद्यालयातील प्रभारी मुख्याध्यापिकेस बडतर्फ करण्याची मागणी. 


 


उदगीर :- उदगीर येथील शामार्य कन्या विद्यालयातील शालेय पोषण आहार चोरी प्रकरणी प्रभारी मुख्याध्यापिकेस बडतर्फ करून संबंधित मुख्याध्यापिकेची पाठराखण करणाऱ्या जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी लातूरचे जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत यांना दि. २९ ऑक्टोंबर रोजी भेटून दिले आहे.


उदगीर येथील शामार्य कन्या विद्यालयातील प्रभारी मुख्याध्यापिकेने एक ते दीड क्विंटल शालेय पोषण आहार चोरून घरी घेऊन जात असले बाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांना व्यंकटराव पनाळे यांनी दिली आहे.  


उदगीर शहरातील बहुचर्चित आणि नामांकित कन्या विद्यालया मधील प्रभारी मुख्याध्यापिका यांनी शालेय पोषण आहार शाळेतून चोरून घेऊन घराकडे अँटोरिक्षा मधून जात असताना काही लोकांनी प्रत्यक्ष पाहिले व शालेय पोषण आहार घेऊन जात असलेल्या ॲटोरिक्षाचे फोटोही काढून घेतले. आणि सदरची माहिती उदगीर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयास कळवली. त्यानंतर उदगीरच्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयातून शालेय पोषण आहार चोरून घेऊन जात असलेल्या मुख्याध्यापिका बाईला फोनवरून एका अधिकारी बाईने ऑटोरिक्षाचा पोलीस पाठलाग करत असल्याचे कळवल्यामुळे या प्रभारी मुख्याध्यापिका बाईने घाबरून जाऊन ऑटोरिक्षा शाळेकडे परत नेऊन चोरून घेऊन जात असलेला एक ते दीड क्विंटल शालेय पोषण आहार परत शाळेत आणून शाळेचा सेवक हनुमंत मरे कडून उतरवून घेतला. याही वेळेस अनेक लोकांनी ज्या ॲटोतून शालेय पोषण आहार प्रभारी मुख्याध्यापिका घेऊन गेल्या होत्या तोच परत येऊन शाळेत उतरवत असतानाही लोकांनी पाहिले. आणि वार्ता शहरात पसरताच शाळेजवळच बघ्यांची गर्दी झाली. दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन या प्रकरणात उदगीरचे गट शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी चौकशी केली आहे. तसेच पंचनामा केला आहे, मात्र पुढे काय झाले हे अजून गुलदस्त्यातच आहे ? 


गटशिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांना फोनवरून चौकशी केली असता हा विषय गोपनीय असल्यामुळे सांगता येत नाही असे उडवाउडवीची उत्तरे दिली ? शालेय पोषण आहाराची चोरी प्रकरण यात गोपनीयता असण्याचे नेमके कारण काय ? हे प्रकरण मलिदा खाऊन मिटवले जाणार अशी शंका येते ! 


कारण प्रभारी मुख्याध्यापिका बाईची बेकायदेशीरपणे व नियमबाह्य मुख्याध्यापक पदाची कायमची ऑर्डर काढण्यासाठी


माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांनी पैसे घेऊन प्रभारी मुख्याध्यापिका बाईंची कायम मुख्याध्यापिका अशी ऑर्डर लिहून स्वाक्षरी करून सुद्धा ठेवली आहे. बाकी व्यवहार पूर्ण होताच ती ऑर्डर त्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे अशी बेकायदेशीर व नियमबाह्य ऑर्डर देणाऱ्या शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांच्यावरही कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे असे बेकायदेशीर काम करणारे शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे त्यांच्याकडून या शालेय पोषण आहार चोरी प्रकरणात कांही कार्यवाही होईल असे वाटत नाही. गटशिक्षणाधिकारी फुलारी आणी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे कांही कार्यवाही करतील अशी अपेक्षा सुद्धा बाळगू नका ! असे खाजगीत जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याने व एका जिल्हा परिषदेच्या सन्माननीय सदस्यांनी त्यांच्या पूर्व अनुभवावरून सांगितले असल्याचा हि उल्लेख या निवेदनात केलेला आहे. मात्र उदगीर शहरातील तमाम जनतेचे आणि प्रभारी मुख्याध्यापिका बाई शालेय पोषण आहार चोरून घेऊन जात असताना व परत शाळेत आणून ठेवत असताना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे या प्रकरणाकडे विशेष लक्ष आहे. विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार हडप करणाऱ्या या प्रवृत्तीवर वेळीच कार्यवाही होणे गरजेचे आहे अन्यथा शालेय पोषण आहार चोरी प्रकरणात वाढ होत राहील. जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे शालेय पोषण आहार चोरीचे प्रकार घडत आहेत आणि ते प्रकार होत राहतील. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी शालेय पोषण आहार चोरणाऱ्या मुख्याध्यापिकेस बडतर्फ करून पाठराखण करणारे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांच्यावरही कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे, संभाजीराव आयनिले, सादिक शेख, वीरणाथ अंबुलगे, दयानंद चव्हाण यांनी केली आहे.


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image