उद्या पासून हैदराबाद औरंगाबाद विशेष रेल्वे धावणार..... सणासुदीला विशेष गाडी

उद्या पासून हैदराबाद औरंगाबाद विशेष रेल्वे धावणार..... सणासुदीला विशेष गाडी : उदगीर :- रेल्वे प्रशासनाने हैदराबाद ते औरंगाबाद व्हाया उदगीर विशेष रेल्वे उद्या पासून सूरु केली आहे. दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने गुरुवारी एक माहिती पत्रक काढून ही विशेष रेल्वे गाडी क्र 07049/050 शुक्रवारी (आजपासून) सुरू करणार असल्याचे कळविले. या गाडीमुळे हैदराबाद, बेगमपेठ, विकाराबाद, जहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, कुमठा, अंबिका रोहिना, नागेशवाडी, लातूर रोड, वडवळ, कारेपुर, मूर्ती, परळी, गंगाखेड, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, रांजनी, जालना,बदनापूर, मुकुंदवाडी व औरंगाबाद ही स्थानक जोडली जाणार असून सणासुदीला प्रवाश्यांना याचा लाभ होणार आहे. हैदराबाद ते औरंगाबाद 23 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर तर औरंगाबाद ते हैदराबाद 24 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान ही गाडी दररोज धावणार आहे. या साठी रेल्वे संघर्ष समिती चा पाठपुरावा तसेच अनेक वृत्तपत्रातून आलेल्या बातम्यांची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली, 


येणाऱ्या सणासुदी चा विचार करून प्रवाशांच्या सुविधे करिता दक्षिण मध्य रेल्वे दिनांक २० ऑक्टोबर पासून तीन फेस्टिवल विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. 


तसेच उद्या दिनांक २३ ऑक्टोबर पासून आणखी पाच उत्सव विशेष गाड्या सुरु करण्यात येत आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत . या चारही रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत . अनारक्षित प्रवाशांना या गाडी मध्ये प्रवेश मिळणार नाही. या गाडीच्या वेळा पुढील प्रमाणे असतील --


क्र. गाडी संख्या कुठून कुठे वेळ दिनांक


1) . ०७६१४ नांदेड पनवेल १७.३० वाजता २३.१०.२०२० ते २९.११.२०२० 


2 ) ०७६१३ पनवेल नांदेड १६.०० वाजता २४.१०.२०२० ते 


३०.११.२०२० 


3.) ०७६८८ धर्माबाद मनमाड ०४.०० वाजता २४.१०.२०२० ते ३०.११.२०२०  


4 ) ०७६८७ मनमाड धर्माबाद १५.०० वाजता २४.१०.२०२० ते ३०.११.२०२० 


`5) ०७६३९ दर सोमवारी काचीगुडा अकोला ०७.१० वाजता २६.१०.२०२० ते २३.११.२०२० 


6) ०७६४० दर मंगळवारी अकोला काचीगुडा ०९.३० वाजता २७.१०.२०२० ते 


     


     २४.११.२०२० 


     


७) ०७६४१ 


(आठ्वड्यातुन सहा दिवस ) काचीगुडा नारख़ेड ०७.१० वाजता २३.१०.२०२० ते २९.११.२०२० 


८) ०७६४२ (आठ्वड्यातुन सहा दिवस ) नारख़ेड काचीगुडा ०४.३० वाजता २४.१०.२०२० ते ३०.११.२०२० 


९) ०७०४९ मार्गे परळी हैदराबाद औरंगाबाद २२.४५ वाजता २३.१०.२०२० ते २९.११.२०२० 


१०) ०७०५० मार्गे परळी औरंगाबाद हैदराबाद 16.15 वाजता २४.१०.२०२० ते ३०.११.२०२० 


 


या पाच उत्सव विशेष गाड्यांचे वेळापत्रक सोबत जोडले आहेत.


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image