कोणत्याही बँकांनी कर्जदारांकडून  कर्जाची वसुली सक्ती करु नये -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत 

कोणत्याही बँकांनी कर्जदारांकडून 


कर्जाची वसुली सक्ती करु नये -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत 


उदगीर :- महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच लातूर जिल्हयामध्ये मार्च, 2020 पासून कोरोना (कोविड-19) आजाराचा प्रार्दुभाव झालेला आहे. त्यामुळे भारत सरकारने व महाराष्ट्र शासनाने दिनांक 23 मार्च,2020 पासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊन जाहीर केलेला होता. सदरच्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शेती व जोडधंदे, छोटे व मोठे उद्योगधंदे, व्यावसाय , दळणवळण, आर्थिक व्यवहार बंद होते अद्यापही बरेच व्यवसाय व उद्योगधंदे बंद अवस्थेत आहेत केंद्र व राज्य सरकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये जिल्हा बंदी, विविध व्यवसायावरील निर्बंध इत्यादींचा समावेश आहे. 


कोरोना (कोविड-19) प्रार्दुभावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे व्यवसायामध्ये व अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या मंदीमुळे तरुणांची रोजगार गेले आहे, तसेच व्यवसाय उद्योगधंदे बंद असल्यामुळे छोटे उद्योजकही संकटात सापडले आहे. शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडले आहे.


या सर्व परिस्थिती विचारात घेऊन भारत सरकार, रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी बँकांना व वित्तीय संस्थांना या कालावधीतील कर्जदारांच्या कर्जावर व कर्जवसुलीपासून या लॉकडाऊन कालावधीतीसाठी हप्ते वसुलीपासून सूट दिलेली होती. कर्जवसुलीच्या हप्त्यांना स्थगिती देऊन सदर हप्त्यांचे अधिस्थगन केला आहे, जेणेकरुन काही कालावधीसाठी कर्जदारांना नव्याने स्वत:चा उद्योग / व्यवसाय सुरु करुन कर्जाचे हप्ते परतफेडीसाठी पुरेसा अवधी मिळेल या बाबत रिझर्व बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना या अनुषंगाने अलाहिदा निर्देश दिलेले आहे.


या परिस्थितीमध्ये बऱ्याच नागरिकांना कर्जदारांना नौकरी गमावल्यामुळे किंवा व्यवसाय, उद्योग शेती व पूरक उद्योगधंदे अडचणीत आल्यामुळे आपल्या कर्जाचे मासिक हप्ते भरण्यामध्ये आर्थिक अडचणी येत आहेत. बँका व वित्तीय संस्थांनी, त्यांनी वितरीत केलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणे हे विधीसंमत आहे. उपरोक्त सर्व अभूतपूर्व आर्थिक परिस्थिती विचारात घेता कर्ज वसुलीसाठी सक्तीच्या उपाययोजना करणे वसुलीसाठी तगादा लावणे, बळाचा वापर करणे, कर्जदाराला धमकावणे अशा प्रकारच्या वसुलीचा मार्ग काही बँका व वित्तीय संस्था उपयोगात आणताना दिसत आहेत व अशा प्रकारच्या तक्रारी येत असल्याचे काही लोकप्रतिनिधींनी माझे निदर्शनास आणून दिले आहेत. कर्जवसूलीसाठी सक्त दमनकारी उपाययोजना (Coercive Measures) करणाऱ्या कर्जदारांना धमक्या देणाऱ्या ,बळाचा वापर करणाऱ्या ,कर्जदारांची मानसिक,शारीरिक छळ करणाऱ्या बँकावर / वित्तीय संस्थांवर आवश्यक ते निर्बंध आणण्याची बाब जिल्हा प्राधिकरणाच्या विचारधीन होती.


जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिककरण, अध्यक्ष जी.श्रीकांत यांनी राष्ट्रीय, वाणिज्य, सहकारी बँका व वित्तीय संस्था, जिल्हा अग्रणी बँका यांचे कडून सक्त दमनकारी उपाययोजना, कर्जदारांना धमक्या, देणाऱ्या, कर्जदारांच्या मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या घटना घडणार नाहीत याबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात जिल्हयातील सर्व बँकांच्या सर्व शाखांना , वित्तीय संस्थांना याबाबत सुस्पष्ट निर्देश निर्गमित करणेबाबत याव्दारे आदेशित करीत आहे. ज्यामुळे कर्जदारांना सद्यपरिस्थितीमध्ये वसुली एजंट नेमून कर्जदाराची मानसिक / शारीरिक पिळवणूक करुन किंवा धाकधपटशा दाखवून अवैध स्वरुपाचा / मार्गाचा अवलंब करुन वसुली करण्यात येणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असेही आदेशात नमुद केले आहे.


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image