कोणत्याही बँकांनी कर्जदारांकडून  कर्जाची वसुली सक्ती करु नये -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत 

कोणत्याही बँकांनी कर्जदारांकडून 


कर्जाची वसुली सक्ती करु नये -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत 


उदगीर :- महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच लातूर जिल्हयामध्ये मार्च, 2020 पासून कोरोना (कोविड-19) आजाराचा प्रार्दुभाव झालेला आहे. त्यामुळे भारत सरकारने व महाराष्ट्र शासनाने दिनांक 23 मार्च,2020 पासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊन जाहीर केलेला होता. सदरच्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शेती व जोडधंदे, छोटे व मोठे उद्योगधंदे, व्यावसाय , दळणवळण, आर्थिक व्यवहार बंद होते अद्यापही बरेच व्यवसाय व उद्योगधंदे बंद अवस्थेत आहेत केंद्र व राज्य सरकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये जिल्हा बंदी, विविध व्यवसायावरील निर्बंध इत्यादींचा समावेश आहे. 


कोरोना (कोविड-19) प्रार्दुभावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे व्यवसायामध्ये व अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या मंदीमुळे तरुणांची रोजगार गेले आहे, तसेच व्यवसाय उद्योगधंदे बंद असल्यामुळे छोटे उद्योजकही संकटात सापडले आहे. शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडले आहे.


या सर्व परिस्थिती विचारात घेऊन भारत सरकार, रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी बँकांना व वित्तीय संस्थांना या कालावधीतील कर्जदारांच्या कर्जावर व कर्जवसुलीपासून या लॉकडाऊन कालावधीतीसाठी हप्ते वसुलीपासून सूट दिलेली होती. कर्जवसुलीच्या हप्त्यांना स्थगिती देऊन सदर हप्त्यांचे अधिस्थगन केला आहे, जेणेकरुन काही कालावधीसाठी कर्जदारांना नव्याने स्वत:चा उद्योग / व्यवसाय सुरु करुन कर्जाचे हप्ते परतफेडीसाठी पुरेसा अवधी मिळेल या बाबत रिझर्व बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना या अनुषंगाने अलाहिदा निर्देश दिलेले आहे.


या परिस्थितीमध्ये बऱ्याच नागरिकांना कर्जदारांना नौकरी गमावल्यामुळे किंवा व्यवसाय, उद्योग शेती व पूरक उद्योगधंदे अडचणीत आल्यामुळे आपल्या कर्जाचे मासिक हप्ते भरण्यामध्ये आर्थिक अडचणी येत आहेत. बँका व वित्तीय संस्थांनी, त्यांनी वितरीत केलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणे हे विधीसंमत आहे. उपरोक्त सर्व अभूतपूर्व आर्थिक परिस्थिती विचारात घेता कर्ज वसुलीसाठी सक्तीच्या उपाययोजना करणे वसुलीसाठी तगादा लावणे, बळाचा वापर करणे, कर्जदाराला धमकावणे अशा प्रकारच्या वसुलीचा मार्ग काही बँका व वित्तीय संस्था उपयोगात आणताना दिसत आहेत व अशा प्रकारच्या तक्रारी येत असल्याचे काही लोकप्रतिनिधींनी माझे निदर्शनास आणून दिले आहेत. कर्जवसूलीसाठी सक्त दमनकारी उपाययोजना (Coercive Measures) करणाऱ्या कर्जदारांना धमक्या देणाऱ्या ,बळाचा वापर करणाऱ्या ,कर्जदारांची मानसिक,शारीरिक छळ करणाऱ्या बँकावर / वित्तीय संस्थांवर आवश्यक ते निर्बंध आणण्याची बाब जिल्हा प्राधिकरणाच्या विचारधीन होती.


जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिककरण, अध्यक्ष जी.श्रीकांत यांनी राष्ट्रीय, वाणिज्य, सहकारी बँका व वित्तीय संस्था, जिल्हा अग्रणी बँका यांचे कडून सक्त दमनकारी उपाययोजना, कर्जदारांना धमक्या, देणाऱ्या, कर्जदारांच्या मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या घटना घडणार नाहीत याबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात जिल्हयातील सर्व बँकांच्या सर्व शाखांना , वित्तीय संस्थांना याबाबत सुस्पष्ट निर्देश निर्गमित करणेबाबत याव्दारे आदेशित करीत आहे. ज्यामुळे कर्जदारांना सद्यपरिस्थितीमध्ये वसुली एजंट नेमून कर्जदाराची मानसिक / शारीरिक पिळवणूक करुन किंवा धाकधपटशा दाखवून अवैध स्वरुपाचा / मार्गाचा अवलंब करुन वसुली करण्यात येणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असेही आदेशात नमुद केले आहे.


Popular posts
शिवसेना उदगीर नगरपालिका स्वबळावर लढणार= मा. आमदार सुधाकर भालेराव 👉 नगरविकास खाते एकनाथ शिंदे कडे असल्याने शिवसेना उदगीर चा विकास भूतो न भविष्यती करू 👉 नगरपालिका हद्दीतील भ्रष्टाचार मिटवणार 👉 मुस्लिम समाजाला सोबत घेऊन विकास करू 👉 मागील काळातील विकास माझ्या कार्यकाळातील 👉 केलेल्या कामाची प्रसिद्धी न केल्याचे खंत 👉उदगीरकराच्या हितासाठी,सर्वांगीण विकासासाठी मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलो असून मी आता गप्प बसणार नाही 👉 उदगीर, अहमदपूर नगरपालिका निवडणूक शिवसेना स्वतंत्र लढवणार असून जनतेनी आम्हाला पूर्ण पाठिंबा देऊन सहकार्य करतील असे सुधाकर भालेराव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे
Image
कृषी उत्पन्न बाजार समितीस सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर ,बाजार समितीच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी - शिवाजीराव हुडे उदगीर = उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांची होणारी सोयाबीन खरेदी विक्रीच्या संदर्भातली अडचण विचारात घेऊन, सोयाबीन खरेदी केंद्र आपल्याकडे मिळावे. अशी मागणी पणन महामंडळाकडे केली होती. लोक कल्याणकारी योजनेचा भाग म्हणून पणन महामंडळाकडून उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून सोयाबीन खरेदी केंद्राला मंजुरी दिली आहे. मंजुरीचे अधिकृत पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राप्त झाले असून त्या पत्रानुसार सोयाबीन खरेदी केंद्र उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या सोयाबीनच्या नोंदी करून घ्याव्यात. जेणेकरून शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीला सक्रिय होऊन काम करता येईल
उदगीर नगरपालिकेवर युतिचा झेंडा फडकेल = बस्वराज पाटील मुरूमकर 👉 आत्ताच विरोधकांची झोप उडाली उदगीर= उदगीर नगरपालिकेवर युतीचा झेंडा फडकणार असल्याने विरोधकांची झोप उडाली असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष बस्वराज पाटील मुरूमकर यांनी उदगीर समाचार ला बोलताना सांगितले आहे उदगीर येथे युतीच्या उमेदवारा ची माहिती देण्यास बोलावलेल्या पत्रकार परिषदे नंतर उदगीर समाचार सोबत बोलताना पाटील म्हणाले की उदगीर नगर पालिके वर युती चा झेंडा फडकणार असून विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,आज विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नाहीत, देशात भाजप्,राज्यात युती चे सरकार असून आम्ही जो विकास केला आहे ते जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, उदगीर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदा वर स्वाती सचिन हुडे व आमचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार या न भूतो न भविष्ती अशा मतांनी विजयी होतील यात आम्हाला शंका नाही असेही ते म्हणाले या वेळेस आ संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. संजय बनसोडे, मा. आ.गोविंद केंद्रे सह अनेक मान्यवर उपस्थित होते
Image
उदगीर नगरपालिकेत सत्ता पालट ? 👉 अनेक माजी नगरसेवकाची नाराजी भोवणार ! उदगीर:- उदगीर नगरपालिकेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर असून आता नामांकन दाखल करण्यासाठी सर्वच पक्षाकडून मोर्चे बांधणी चालू असून काही पक्ष हवेत आहेत की आम्ही जो उमेदवार दिला तो निवडून येईल हे त्यांचे भ्रम दिसत असून जश्या निवडणूक निरीक्षकांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या तश्या प्रभागात जाऊन तेथील मतदाराच्या ही प्रतिक्रिया घेतल्या असत्या तर चांगले झाले असते असे मतदार बोलत आहेत या वरून ज्या माजी नगरसेवका बद्दल रोष आहेत त्याचा फटका अनेक पक्षाला बसण्याची शक्यता दिसत आहे,शहरात होत असलेल्या गुप्त बैठकीचा सारांश घेतला तर ज्या पक्षाचा नगराध्यक्षाचा उमेदवार सक्षम असेल त्याचा झेंडा नगरपालिकेवर फडकेल असे दिसत असून पुढील दोन दिवसात हे स्पष्ट होईल
ठरलं भाजप राष्ट्रवादी ? नगराध्यक्ष भाजप, भाजप 18 राष्ट्रवादी 19 अन्य 3 फॉर्म्युला? उदगीर:- उदगीर नगरपालिका निवडणुकीत आता भाजप राष्ट्रवादी (अजित पवार) गट यांची युती संदर्भात फायनल बैठक झाल्याची चर्चा असून या निवडणुकीत नगराध्यक्ष पद भाजप ला तर त्या बद्दल राष्ट्रवादी ला एक नगरसेवक जास्त असल्याची चर्चा सूत्र करत आहेत तर राष्ट्रवादी ला प्रभाग 1,2,3,4,5,6,10,11,12 आणि 13 तर भाजप ला प्रभाग 7,8,9,14,15,16,17,19,20 मिळेल अशी चर्चा आहे,तर 18 मधून 2, 20 मधून 1 ही जागा अन्य देण्यात येईल अशी ही सूत्रांची माहिती असून हा अंदाज आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे , होऊ शकते उदगीर समाचार चा अंदाज खरा ठरतो किंवा खोटा हे लवकरच समजेल