फार्म हाऊस वर दरोडा, 4 लाख 50 हजाराचे दागिने लुटले :- बनशेळकी डैम वरील जलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूची घटना

फार्म हाऊस वर दरोडा, 4 लाख 50 हजाराचे दागिने लुटले


:- बनशेळकी डैम वरील जलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूची घटना


उदगीर :- उदगीर शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या बनशेळकी डैम वरील जलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूस राहणारे सुभाष नेत्रगावकर (78)यांच्या फार्म हाऊस वर गुरुवारी सायंकाळी 7 च्या सुमारास अज्ञात 2 बुरखा धारी चोरटय़ांनी चाकूचा धाक दाखवून 9 तोळे सोन्याचे दागिने लूटल्याने शहरात परत एकदा दहशत निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे


या बाबत ग्रामीण पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की उदगीर शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या बनशेळकी डैम वरील जलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूस सुभाष नेत्रगावकर (78) हे आपल्या पत्नी सोबत येथील फार्म हाऊस वर राहतात, गुरुवार 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात च्या सुमारास दोन अज्ञात चोरटय़ांनी बुरखा घालून फार्म हाऊस मधील घरात प्रवेश केला अणि सुभाष यांच्या गळ्याशी चाकू लाऊन पत्नी च्या अंगावरील 4 तोळ्यांचे गंठण ज्याची किंमत दोन लाख व हातातील 5 तोळ्याच्या पाटल्या कीमत दोन लाख पन्नास हजार रुपये अश्या एकूण 9 तोळे किम्मत 4 लाख 50 हजार रुपयाची लूट करून चोरटे पसार झाले, ग्रामीण पोलीस ठाण्यात सुभाष नेत्रगावकर यांच्या फिर्यादी वरुण गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सिंगनकर हे अधिक तपास करीत आहेत, तर ही घटना समजताच अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव हे उदगीर येथे तळ ठोकून आहेत, आज शुक्रवार सकाळी 9-30 वाजता लातूर येथुन श्वानपथक दाखल झाले असून ते चोरटय़ांच्या मागावर आहेत, दोन दिवसात दोन घटना घडल्याने शहर व परिसरात घबराटीचे वातावरणात निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image