जार मधील पाणी फक्त ISI प्रमाणित बाटल्यांमधूनच विकण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश :-थंड जार पाणी विकण्यास बंदी 

जार मधील पाणी फक्त ISI प्रमाणित बाटल्यांमधूनच विकण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश


:-थंड जार पाणी विकण्यास बंदी


:-एका दिवसात पाणी वाल्याचा इतका मोठा व्यवसाय बंद होणार?


:- उदगीर व तालुक्यात जार वाल्यावर कोण व कधी कार्यवाही करते हे पहावे लागेल 


उदगीर : पाण्याच्या मोठ्या बाटल्यांमधून विकलं जाणारं पाणी यापुढे आय एस आय शिक्क्यासहच विकलं जावं असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. त्याचबरोबर कोल्ड जारमधून विकल्या जाणाऱ्या पाण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.


राज्यात बाटलीबंद पाणी अनधिकृतपणे विकलं जात असल्याचं आणि त्यामुळं लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याचं समोर आल्यानंतर हरित लवादाने हे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर राज्यात अनधिकृतपणे सुरु असलेले अशुद्ध पाण्याचे प्लांट तातडीने कारवाई करून बंद करण्याचे आदेशही प्रदूषण नियंत्रण मंडळ, एफ डी ए आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेत . महाराष्ट्रात अशुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या अनधिकृत प्लान्टची संख्या दहा हजारांच्या घरात आहे. मात्र अशुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या प्लान्टवर कारवाई नक्की कोणी करायची यावरून प्रदूषण नियंत्रण मंडळ, एफ डी ए आणि स्थानिक स्वराज्य संस्था जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळं सामान्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय.


 राष्‍ट्रीय हरीत लवाद अमरावती येथे दाखल प्रकरण क्र.75/2017 नुसार जल प्रदुषण अधिनियम 1974 व वायू प्रदुषण अधिनियम 1981 अन्‍वये पिण्‍याचे थंड पाणी कॅन-जार मध्‍ये विक्रीकरीता निर्माण करणारे उद्योग संदर्भात उपरोक्‍त याचीका दाखल करण्यात आली होती. यामध्ये पिण्‍याचे थंड पाणी कॅन, जारमध्‍ये विक्रीकरीता निर्माण करणारे उद्योग, व्‍यवसायामुळे पुरवठा होणारे पाणी मनुष्‍याचे आरोग्‍यास अपायकारक ठरत आहे. तसेच भुःगर्भातून पाण्‍याचा उपसा अत्याधिक होत असल्याने बिनापरवानगी सुरु असलेले प्‍लान्ट तत्‍काळ सील करण्‍याचे आणि केलेल्‍या कारवाईचा अनुपालन अहवाल सादर करण्‍याचे आदेश राष्‍ट्रीय हरीत लवादाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाना दिले आहे. एका दिवसात प्लांट वाल्याचा इतका मोठा व्यवसाय बंद झाल्यास अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल तर उदगीर मध्ये कधी व कशी अणि कोण कार्यवाही करते हे पहावे लागेल


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image