जार मधील पाणी फक्त ISI प्रमाणित बाटल्यांमधूनच विकण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश
:-थंड जार पाणी विकण्यास बंदी
:-एका दिवसात पाणी वाल्याचा इतका मोठा व्यवसाय बंद होणार?
:- उदगीर व तालुक्यात जार वाल्यावर कोण व कधी कार्यवाही करते हे पहावे लागेल
उदगीर : पाण्याच्या मोठ्या बाटल्यांमधून विकलं जाणारं पाणी यापुढे आय एस आय शिक्क्यासहच विकलं जावं असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. त्याचबरोबर कोल्ड जारमधून विकल्या जाणाऱ्या पाण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
राज्यात बाटलीबंद पाणी अनधिकृतपणे विकलं जात असल्याचं आणि त्यामुळं लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याचं समोर आल्यानंतर हरित लवादाने हे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर राज्यात अनधिकृतपणे सुरु असलेले अशुद्ध पाण्याचे प्लांट तातडीने कारवाई करून बंद करण्याचे आदेशही प्रदूषण नियंत्रण मंडळ, एफ डी ए आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेत . महाराष्ट्रात अशुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या अनधिकृत प्लान्टची संख्या दहा हजारांच्या घरात आहे. मात्र अशुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या प्लान्टवर कारवाई नक्की कोणी करायची यावरून प्रदूषण नियंत्रण मंडळ, एफ डी ए आणि स्थानिक स्वराज्य संस्था जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळं सामान्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय.
राष्ट्रीय हरीत लवाद अमरावती येथे दाखल प्रकरण क्र.75/2017 नुसार जल प्रदुषण अधिनियम 1974 व वायू प्रदुषण अधिनियम 1981 अन्वये पिण्याचे थंड पाणी कॅन-जार मध्ये विक्रीकरीता निर्माण करणारे उद्योग संदर्भात उपरोक्त याचीका दाखल करण्यात आली होती. यामध्ये पिण्याचे थंड पाणी कॅन, जारमध्ये विक्रीकरीता निर्माण करणारे उद्योग, व्यवसायामुळे पुरवठा होणारे पाणी मनुष्याचे आरोग्यास अपायकारक ठरत आहे. तसेच भुःगर्भातून पाण्याचा उपसा अत्याधिक होत असल्याने बिनापरवानगी सुरु असलेले प्लान्ट तत्काळ सील करण्याचे आणि केलेल्या कारवाईचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरीत लवादाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाना दिले आहे. एका दिवसात प्लांट वाल्याचा इतका मोठा व्यवसाय बंद झाल्यास अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल तर उदगीर मध्ये कधी व कशी अणि कोण कार्यवाही करते हे पहावे लागेल