SBI बँकेच्या मॅनेजर ची गाढवावरून धिंड काढणार. प्रदीप पाटील खंडापुरकर उदगीर:- *रुबीना बदबदे या दिव्यांग महीलेची चप्पल बुट बांगडी व्यवसायाची कर्ज प्रकरणाची फाईल नाकारणार्या SBI बँक शाखा डाळींब च्या बँकेवर 23 जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आसुन संबंधित बँक मॅनेजर ची गाढवावरून बसवुन धिंड काढण्यात येणार आसल्याचे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी डाळींब येथे झालेल्या दिव्यांगांच्या मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात जाहीर केले* *खंडापुरकर बाबा आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, दिव्यांगाचे दु:ख खुप मोठे आसते,डाळींब ता. उमरगा जि.उस्मानाबाद येथील रुबीना रसुल बदबदे ही महीला जन्माताच अंपंग आहेत,त्यांना चालता येत नाही,अपंगत्वा मुळे त्यांचा विवाह झाला नाही.त्या आपल्या व्रुध माता पित्यांना छोटेश्या चप्पल बुटाच्या दुकानातुन मिळणार्या उत्पन्ना वर जगवतात* *रुबीना ने दीड वर्षा पुर्वी समाज कल्याण विभाग उस्मानाबाद मार्फत SBI शाखा डाळींब कडे चप्पल,बूट आणी बांगड्यांच्या व्यवसाया साठी कर्जाची मागणी केली होती.रुबीना ने दीड वर्ष बँके कडे चक्करा मारल्या पण त्यांची कर्ज प्रकरणाची फाईल बँकेनी मंजुर केली नाही.उलट बँक मॅनेजर म्हणतात की आमची बँक दिव्यांगा साठी कर्ज देत नाही. या बँक मॅनेजर च्या ताठर भुमीकेच्या निषेधार्थ दिनांक 23 जुलै रोजी SBI बँक शाखा डाळींब वर मोर्चा काढुन बँक मॅनेजर ची गाढवावरून बसवून धिंड काढण्यात येणार आसल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबानी जाहीर केले, आणी बँक मॅनेजर शिवराज घाटगे यांना निवेदन दिले*
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image