*कार्तिकी एकादशीला रेल्वेची 'पंढरीवारी'* *14 नोव्हेंबर ला बिदर पंढरपूर रेल्वेची सोय* उदगीर : अनेक वर्षाची धार्मिक परंपरा असलेली कार्तिकी एकादशीची वारी कोरोनाच्या कारणामुळे गेल्या दोन वर्षापासून खंडित झाली होती. यावर्षी शासनाने या वारीला परवानगी दिल्यामुळे पंढरीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या प्रवासासाठी दक्षिण मध्य रेल्वेने सोय केली असून दि. 14 नोव्हेंबर रोजी बिदर ते पंढरपूर रेल्वे धावणार असल्याची माहिती रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी दिली. पंढरपूर येथील विठुरायाच्या दर्शनासाठी कार्तिकी एकादशीला लाखो भाविक जात असतात. शेकडो वर्षाची परंपरा असलेली ही वारी गेल्या दोन वर्षांपासून खंडित झाली होती. यावर्षी शासनाने या वारीला परवानगी दिल्यामुळे वारकऱ्यामध्ये उत्साह निर्माण झाला होता. गेल्या अनेक दिवसापासून एस. टी. कर्मचाऱ्यांच्या चालू असलेल्या संपामुळे एस. टी. ची सेवा बंद असल्याने पंढरीच्या दर्शनासाठी जायचे कसे? हा प्रश्न वारकऱ्यासमोर उभा होता. कारण कोरोना चा प्रादुर्भाव, त्यातच अतिवृष्टी यामुळे सीमा भागातील वारकरी मोठया अडचणीत सापडला होता. त्यामुळे खाजगी वाहन करून जाणे या वारकरी बांधवांना परवडणारे नव्हते. ही अडचण लक्षात घेऊन उदगीर रेल्वे संघर्ष समितीने केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या माध्यमातून दक्षिण मध्य रेल्वे कडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश मिळाले असून दक्षिण मध्य रेल्वेने खास वारकऱ्यांच्या सोयीसाठी बिदर पंढरपूर ही रेल्वे 14 नोव्हेंबर रोजी धावणार असल्याचे जाहीर केले आहे. ही रेल्वे दि. 14 नोव्हेंबर रोजी बिदर येथून रात्री 10.30 वाजता निघणार असून भालकी, कमलनगर, उदगीर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद मार्गे पंढरपूर ला 15 रोजी सकाळी 7 वाजता पोहोचणार आहे.तर परतीच्या प्रवासासाठी पंढरपूर येथून 15 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता निघून त्याच मार्गाने बिदरला 16 रोजी पहाटे 5 वाजता पोहोचणार आहे. पंढरपूर ला जाणाऱ्या भाविकांसाठी दक्षिण मध्य रेल्वेने ही विशेष सोय केल्यामुळे सीमा भागातील वारकरी बांधवाची सोय झाली असून याचा वारकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करून ही रेल्वे विना आरक्षित असून रेल्वे स्थानकात सामान्य दरातील तिकीट उपलब्ध होणार असल्याची माहिती रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी दिली. ही रेल्वे सुरू केल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्यासह रेल्वे प्रशासनाचे रेल्वे संघर्ष समितीने आभार मानले आहेत.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी

नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
• श्रीनिवास मदनलाल सोनी

तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
• श्रीनिवास मदनलाल सोनी

लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी

पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी

Publisher Information
Contact
Udgirsamachar@gmail.com
9421485971
Udgir samachar office shivaji society udgir
About
Weekly marathi paper published in udgir
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn