सामुदायिक दसरा महोत्सव समिती ची बैठक राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न :- दसरा महोत्सव श्रधेने आणि उत्साहात साजरा करा संजय बनसोडे उदगीर:- उदगीर येथील सामुदायिक दसरा महोत्सव समिती ची बैठक राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली तर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री शंकरअप्पा मठाचे प्रमूख सुखदेव स्वामी होते उदगीर येथील सामुदायिक दसरा महोत्सवाची बैठक श्री शंकरअप्पा मठा मध्ये या महोत्सव समिती चे अध्यक्ष श्री सुखदेव स्वामी यांच्या अधक्ष्य ते खाली तर पूर्व राज्यमंत्री तथा येथील आमदार श्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली,या बैठकीत मागील दोन वर्षांपासून दसरा कोरोना मुळे शासनाच्या वतीने दिल्या अदेश्या नुसार साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता,या वर्षीचा दसरा महोत्सव हा उत्साहात आणि श्रद्धा पूर्वक साजरा करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले, या वेळेस पूर्व राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दसऱ्या निमित्त दसरा मैदानात सर्व सुविधा नगरपालिकेने कराव्यात अश्या सूचना मुख्याधिकारी याना दिल्या असून,या वर्षीचा दसरा महोत्सव हा मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे महोत्सव समिती ने जाहीर केले असून या बैठकीस अधक्ष सुखदेव स्वामी, कार्याधक्ष उद्धव महाराज हैंबतपुरे,सचिव ओमप्रकाश गर्जे, उपाधक्ष चंद्रकांत वैजापूरे,सहसचिव पांडुरंग आपटे, कोश्याधक्ष अविनाश रायचुरकर, प्रसिध्दी प्रमुख मोतीलाल डोईजोडे,सुभाष धनुरे,नामदेव आपटे,संतोष कुलकर्णी, अड श्रीकांत बडीहवेली, कृष्णकांत बेद्रे,मनोहर पाटील, माधव उगीले, राजकुमार तांदळे, आनंद साबणे,श्रीनिवास सोनी,कैलाश पाटिल, माणिक खडके,अनुप मोरे आदी उपस्थित होते, बैठकीत सर्व पालखी धारकानी सायंकाळी 6 च्या पहले दसरा मैदानात यावे व सर्वाँना सहकार्य करावे असे आवाहन समिती चे अधक्ष श्री सुखदेव स्वामी यांनी केले आहे
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image