कृ. उ. बा. समिती सचिवावर अटकेची टांगती तलवार ? उदगीर = येथील प्रसिद्ध व्यापारी तथा कृ. उ. बा. समितीचे माजी सभापती शिवाजीराव हूडे यांनी उदगीर पोलीस ठाण्यात लिखित तक्रार दिली असून कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर चे सचिव व इतरांनी 2019-2020 साली माइया नावाने परवान्याची मागणी केलेली नसताना किंवा नंतर परवाना नूतनीकरण करून मागीतले नसताना माइया बोगस सहया करून माझ्या नावाने मे. एस. एच. हुडे या फर्मची नुतनीकरण माझ्या नावे बेकायदेशीरपणे केलेले आहे. सचिव यांनी माझ्या राजकिय विरोधकाना हाताशी धरून हा बेकायदेशीर प्रकार केलेला आहे. मी सन 2012 ते 2016 मध्ये सदर बाजार समिती मध्ये शेतकारी मतदार संघातून निवडून येउन सभापती म्हणून काम केलेले होतें माइया राजकीय विरोधकांना मि यापुढे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकरी सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढवता येउ नये म्हणुण माइया नावाने सचिवाला हाताशी धरून बेकायदेशीरपणे परवाना काढला , नूतनीकरण केलेले आहे. या बाबत समितीकडे परवाना नुतनीकरणाचे कागदपत्र मागनी करून त्या कागदपत्राची तपासणी केल्यावर मला असे दिसले की सन 19-20 ची नुतनीकरण अर्ज नाही व सन 20-21 चे नुतनीकरण अर्जावर सहीच नाही तसेच सन 21-22 चे नुतनीकरण अर्जच नाही व तसेच सन 22-23 च्या मागनी अर्जावर बोगस सहया करून परवाना नूतनीकरण केल्याचे दिसून आले आहे, सचिवाचे हे कृत्य फसवणुकीचे असून या मुळे मला मार्केट ची निवडणूक लढवता येणार नाही असे कृत्य यांनी केले असून या प्रकरणाची चौकशी करून भारतीय दंड संहितानूसार सचिव व संबंधीत व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करावा व मला न्याय द्यावा अशी तक्रार उदगीर पोलीस ठाण्यात केल्याने आता या तक्रारीवर सचिवावर व अन्य कोणावर कार्यवाही होणार किंवा सचिवासह अन्य वर अटकेची टांगती तलवार असल्याची चर्चा सध्या मार्केट यार्डात चौका चौकात चालू असल्याचे दिसत आहे
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image