यंदाचा डॉ .ना. य. डोळे स्मृती पुरस्कार सुप्रसिध्द चित्रपट निर्माते नितीन वैद्य यांना जाहिर ! उदगीर : येथील डॉ. ना. य. डोळे फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा 'डॉ. ना. य. डोळे स्मृती पुरस्कार' यावर्षी सुप्रसिध्द चित्रपट, टिव्ही मालिका निर्माते व राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य (मुंबई) यांना जाहीर करण्यात आला आहे . ५ फेब्रुवारी रोजी उदगीर येथे होणाऱ्या शानदार कार्यक्रमात त्यांना आमदार कपील पाटील यांच्या उपस्थीतीत हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. चित्रपट आणि टिव्ही मालिकांच्या माध्यमांतुन परिवर्तनवादी समाज निर्मिती साठी प्रबोधन करणे, या कार्यासाठी वैद्य यांची फाऊंडेशनच्या निवड समितीच्यावतीने निवड करण्यात आली आहे . अशी माहिती फाऊंडेशनचे सचिव अजित शिंदे यांनी शनिवारी उदगीर येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिली. डॉ. ना. य. डोळे हे उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे स्थापने पासून ३५ वर्षे प्राचार्य होते. त्यांनी उदगीर परिसरात शिक्षणासाठी येणाऱ्या हजारो गोरगरीब कष्टकरी विद्यार्थ्यांना वैचारिक वारसा दिला. डॉ. डोळे हे महाराष्ट्रातील प्रमुख समाजवादी कार्यकर्ते विचारवंत आणि राज्यशास्त्र विषयाचे प्रकांड पंडीत म्हणून ओळखले जात. १४ जानेवारी हा त्यांचा जन्म दिवस. डाॅ. ना. य. डोळे फाऊंडेशनच्या वतीने उदगीर येथे दरवर्षी 'डॉ. ना. य. डोळे स्मृती पुरस्कार' देण्यात येतो. मागील दोन वर्ष कोरोना काळामुळे पुरस्कार वितरणात खंड पडला होता. यावर्षी पुरस्काराचे मानकरी नितीन वैद्य हे ठरले आहेत. नितीन वैद्य यांनी स्टार प्रवाह या वाहिनीवरील "डॉ. बाबासाहेब आंबेडकर", आणि सोनी मराठीवरील "क्राती ज्योती" या दोन मालिंकाद्वारे फुले , आंबेडकरी विचार समाजामध्ये मोठ्या प्रमाणात रुजविला. प्रामुख्याने या कार्यासाठी वैद्य यांना यावर्षीचा डॉ. ना. य. डोळे हा पुरस्कार देण्यात येत आहे. नितीन वैद्य यांचा मुळ पिंड चळवळीचा असुन ते बालपणापासून राष्ट्र सेवादलाचे सैनिक आहेत. तसेच ते छात्रभारती या विद्यार्थी संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पुरोगामी, आंबेडकरी, परिवर्तनवादी व लोकशाही समाजवादी विचारांच्या चळवळींना वैचारीक बळ देण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले आहे. ते प्रतिथयश पत्रकार सुध्दा होते. दै. सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, झी न्युज या सारख्या आघाडीच्या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. झी माध्यम समुहाच्या भाषीक वाहिन्यांच्या स्थापनेमध्ये त्यांचा प्रमुख पुढाकार राहिला आहे. त्यांच्याच नेतृत्वात झी समुहाचा विस्तार झाला. आज घडिला ते चित्रपट आणि टिव्ही मालिका निर्माते म्हणून ओळखले जातात. या सोबतच राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी यावर्षीच जबाबादारी स्विकारली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्र सेवादलाचे विश्वस्त होते. या प्रसंगी फाऊंडेशनचे विश्वस्त अजित शिंदे, दिलीप वाघमारे, अंकुश गायकवाड, बापुसाहेब कज्जेवाड , ओम गांजूरे, जशन डोळे, मोतीलाल डोईजोडे , विनायक चाकुरे आदी उपस्थित होते .
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image