*उदगीर येथील पर्यावरण मित्र ओमकार जयश्री गांजुरे यांना पर्यावरण रत्न पुरस्कार..* :-उदगीर येथील समाजसेवक ओमकार जयश्री गांजुरे यांना त्यांच्या पर्यावरण क्षेत्रातील भरीव कार्यासाठी कै.त्र्यंबकप्पा माळेवाडे फाऊंडेशन तर्फे या वर्षीचा *पर्यावरण रत्न* या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष गुरुबसप्पा माळेवाडे यांनी दिली *कारवाँ फाऊंडेशन* उदगीर च्या माध्यमातुन उदगीर सारख्या दुष्काळी भागात तरुणाची एक फौज निर्माण करत सीड बॉल निर्मिती करत तालुक्यातील सर्व शाळेत सीड बॉल कार्यशाळा त्यांनी घेतल्या.लाखो सीड बॉल, वृक्षारोपण,रेन वॉटर हार्वेस्टिंग,वाचन कट्टा व पर्यावरण वाचवण्यासाठी सायकलींग चळवळ उभी करत आज पर्यंत तिरुपती,रामेश्वरम्,वाराणसी, स्टॅच्यू ऑफ युनिटी,अष्टविनायक अश्या विविध ठिकाणी उदगीर पासून सायकल प्रवास करत "पेडल टू गो" सायकलिंग समूहाच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती करण्याचा संकल्प त्यांनी पूर्ण केला. उदगीर येथील तरुणांना रक्तदान चळवळीत व्यापक प्रमाणात सहभागी करून हसत हसत रक्तदान करण्याची सवय लावण्याचे कार्य त्यांनी आजपर्यंत केले वाढदिवस साजरे करताना रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त करत तरुणाईला एक अनोख्या पद्धतीने रक्तदान करण्याचा पायंडा या उदगीर शहर व तालुक्यात त्यांनी घालून दिला. सोबतच "प्रयास" या सामाजिक सौख्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थेतही त्यांचे योगदान आहे.या सर्व त्यांच्या निस्वार्थ कार्याचा गौरव म्हणून येत्या 30 मार्च 2023 ला ओम गांजुरे यांचा ओम गार्डन,फंक्शन हॉल,रिंग रोड उदगीर येथे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,माजी मंत्री बछू कडू,माजी राज्यमंत्री संजय बनसोडे,खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत *पर्यावरण रत्न* या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राहुल रमेश आंबेसंगे,विजय निटूरे,अहमद सरवर,आशिष पाटील राजूरकर,ॲड अदिती पाटील,सूरज पोस्ते,सतीश पाटील मानकीकर,मदन पाटील,अमोल घुमाडे,शिवकुमार जाधव,बिपिन पाटील,जय पूदाले,विनोद मिंचे,चवळे सूर्यकांत,महेश तोडकर,गुरुप्रसाद पांढरे,शिवकुमार उप्परबावडे,फय्याज शेख,मोतीलाल डोईजोडे,राजू मानवतकर,राजू चौधरी,चंद्रकांत ममदापुरे,अजित शिंदे आदींनी अभिनंदन केले.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image