दि.उदगीर अर्बन को ऑप बँकेंच्या चेअरमनपदी गुरुडे तर व्हा.चेअरमनपदी पेंन्सलवार यांची बिनविरोध निवड.. उदगीर - मा.शिवाजीराव गुरुडे माजी यांच्या नेतृत्वाखालील सहकार विकास पॅनलचे सर्व संचालक बिनविरोध निवडून आले असून उद्योग, उद्योजक,व्यापारी, वाढीस लागावा,शेतीपूरक व्यवसाय उभारले जावेत यासाठी तरूणमंडळींना वेळेत व आवश्यक तेवढे कर्ज उपलब्ध व्हावे हा उद्देश ठेऊन बँकेंची स्थापना झालेली आहे. स्थापनेपासून नावारूपाला आलेल्या दि.उदगीर अर्बन -को -ऑपरेटिव्ह बॅंक ली.उदगीर सहकार क्षेत्रात एक आगळे वेगळे स्थान खातेदार, ठेवीदार, कर्जदार, निर्माण केले आहे बँकेंचे कार्यक्षेत्र उस्मानाबाद ,लातूर, नांदेड , असुन लातूर जिल्हास्तरावर एक तर उदगीर येथे मुख्यालय एक शाखा आहे , नांदेड जिल्ह्यातील लोहा, नायगाव बाजार, देगलूर जिल्हयात शाखा कार्यरत आहेत अद्यावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना सुलभ व जलद सेवा देणारी बॅक म्हणून दि.उदगीर अर्बन को ऑप बँकेंचा लौकीक आहे. शेतकरी आणि मजूरही उद्योजक म्हणून ओळखले जावेत, गरजूंना जलद गतीने कर्ज उपलब्ध करून देणे हा बॅकेचा मुख्य उद्देश आहे. शहरी आणि ग्रामीण विकासात योगदान देत असलेल्या बँक स्थापनेचा उद्देश सफल करण्यासाठी नुतन संचालक मंडळ प्रयत्नशिल आहे दिनांक ०९ मार्च २०२३ रोजी सर्व सभासदांची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते चेअरमन पदी मा. शिवाजीराव गुरुडे साहेब यांची तर व्हा. चेअरमन पदी रूक्मन पेंन्सलवार यांची निवड करण्यात आली. या बैठकीसाठी नूतन संचालक मंडळ मा.सोनवणे नवनाथ, मा.पाटील बालाजी, मा.गुरमे बाळासाहेब,मा. बाहेती कलपेश मा.महाजन उमेश,मा. गुरूडे अनिरुध्द, मा. पाटील भास्कर, मा.धनुरे अंकेश, मा.वाकुडे सुमित, सौ. पवार छाया, पेन्सलवार सरोजा यांची उपस्थिती होती. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक एस. आर. नाईकवाडी साहेब जिल्हा निवडणूक अधिकारी, लातूर व श्री बी. एस. नांदापूरकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. या निवडीबद्दल नूतन संचालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image