उदगीर तालुका माहेश्वरी सभेचे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन उदगीर : उदगीर येथील व्यापारी उमेश गोकुळदास झंवर यांच्या मुलास मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवून खंडणी वसूल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून झंवर कुटुंबास संरक्षण मिळणे व गुन्हातील सर्व आरोपीस अटक करुन कडक शासन करावे या मागणीसाठी उदगीर तालुका माहेश्वरी सभेच्या वतीने तथा सर्व मारवाडी समाजबांधवांच्या वतीने आज, दि. 3 एप्रिल रोजी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देउन मागनी करण्यात आली उदगीर येथील व्यापारी उमेश झंवर यांच्या अल्पवयीन मुलास बंदुकीचा धाक दाखवून अमानूष मारहाण करून त्याच्या कडून 2 लाखाच्या वर शैलेश पाटील, वैभव देशमुख, आदित्य कांबळे, ओमकार खंडागळे या आरोपीने खंडणी वसूल केली या बाबत उमेश झंवर यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन उदगीर मध्ये दि 30/03/2023 रोजी संबंधिता विरुद्ध गुन्हा रजि 198/2023 ने कलम 384,386323, 504,506, 34 भादवी ने गुन्हा दाखल केला असून पोलिस प्रशासनाने एक आरोपी ओमकार यास अटक केले असून बाकी तिन्ही आरोपी फरार आहेत. संबंधित आरोपीकडून झंवर परिवारास धोका असून त्यांना संरक्षन द्यावे व बाकी आरोपीस त्वरीत अटक करून त्यांना कडक शासन करावे असी मागणी या निवेदनात करण्यात आली असून   या निवेदनावर सभे चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी सचिव राजगोपाल मणियार, ईश्र्वरप्रसादबाहेती , विनोदकुमार टवानी, आनंद बजाज, राधेश्याम नावंदर, राजगोपाल राठी, सत्यनारायण सोमाणी, राजकुमार बलदवा, ओमप्रकाश गिल्डा, संपतकुमार लोया, राजकुमार सारडा, गणेश बजाज, उमेश झंवर, युवा मंच प्रांत मंडळ 4 चे उपाध्यक्ष विधीज्ञ. गोविंदा सोनी, मंच अध्यक्ष पवन मुंदडा, कोमल मालपाणी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image