उदगीर करानो सावधान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा पहिला मृत्यू उदगीरात! = कोरोनाच्या पहिल्या लाटेचा मृत्यू ही उदगीर झाला होता उदगीर : कोरोनाच्या भयानक संकटानंतर जनजीवन पूर्वपदावर आलेले असतानाच राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच कोरोनाच्या उदगिरात एका ६६ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना समोर करण्यात आलेल्या आरटीपीसीआर चाचणीमध्ये पाच दिवसांत ग्रामीण भागातील दोघांचे आणि शहरातील एकाचा अशा तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे यांनी सांगितले. दरम्यान, आज तारखेत लातूर जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३३ असून ३२ गृहविलगीकरणात आहेत. एकावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे. कोरोनाच्या संकटानंतर नागरिक थोडी उसंत घेत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन शासन व प्रशासनाकडून करण्यात येत आहे. उदगीर शहरातील एका खाजगी रुग्णालयात दि. १४ एप्रिल रोजी हृदयरोग व अन्य आजाराने त्रस्त असलेला एक रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. खाजगी रुग्णालयातील डॉक्टरने त्या रुग्णाची कोरोना तपासणी करण्याकरिता त्याचे नमुने मुंबई येथील थायरोकेअर लॅब मध्ये पाठविले होते. दरम्यान दि. १५ एप्रिल रोजी सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी असलेल्या त्या ६६ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी (दि. १८) त्या मयत रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे यांनी दिली आहे. या घटनेनंतर उदगीर येथील आरोग्य विभाग सतर्क झाला असून त्या मयत रुग्णाच्या कुटुंबीयांची मंगळवारी येथील शासकीय सामान्य रुग्णालयात कोरोना तपासणी करण्यात आली असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे यांनी सांगितले. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी आरटीपीसीआर तपासणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. उदगीर येथील शासकीय सामान्य रुग्णालयातील आरटीपीसीआर तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. पाच दिवसांच्या तपासणीमध्ये तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यात देवर्जन आणि पेठेवाडी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. तर तिसरा रुग्ण हा उदगीर शहरातील आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लातूर जिल्ह्यातील पहिला रुग्ण उदगिरात आढळून आला होता. दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे अनेकांचा बळी गेलेला आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपल्या जवळचे नातलग गमावलेले आहेत. कोरोना संकटाचा काळ हळूहळू मागे लोटला जाऊन जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यातच पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे यांनी केले आहे.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image