राजश्री शाहू निवासी मूकबधिर विद्याल उदगीर येथील प्रकार" कर्मचारी उपाशी संस्थाचालक तुपाशी" उदगीर:-धरणग्रस्त व्यायाम शैक्षणिक ग्रंथालय व सेवाभावी मंडळ शेंद द्वारा संचलित राजश्री शाहू निवासी मूकबधिर विद्यालय जळकोट रोड उदगीर या शाळेतील कर्मचारी 2014 पासून वेतन न काढल्याने उपासमारी व दिवाळीखोरीची वेळ आलेली आहे ही शाळा समाज कल्याण विभाग लातूर यांच्या अधिनस्त संस्थाचालक हे शासनाचे नियम डावलून कर्मचाऱ्यांचे 2014 पासून वेतन देत नसून त्यांच्यावर अत्याचार करत आहेत संस्थाचालक डॉक्टर संजय दिगंबर मुळे 2014 चे कर्मचारी डावलून नवीन कर्मचारी भरून जुन्या कर्मचारी समाज कल्याण अधिकारी आयुक्तालय पुणे व शासन यांची दिशाभूल करून भरती करत असून शासनाचे परिपोषण आहार अनुदान काढून लाखोचे अनुदान लाटत आहेत जे कर्मचारी शिक्षकांपर्यंत शाळेवर कार्यरत नाहीत त्यांची प्रशासकीय मान्यता अधिकाऱ्यांची दिशाभूल करून बोगस कागदपत्र दाखल करून काढण्याच्या तयारीत असून जे कर्मचारी 2014 पासून कार्यरत आहेत त्यांना डावलून त्यांच्यावर संस्थाचालक उपासमारीची वेळ आणत आहेत संचालक बोगस नवीन कर्मचारी भरती करून दरवर्षी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहेत त्यांच्याकडून लाखोंची रक्कम घेऊन त्यांचे अपरोल व वेतन न काढता दुसऱ्या वर्षी परत नवीन कर्मचारी भरून त्यांच्याकडून मोठी रक्कम घेऊन फसवणूक करत आहे. कर्मचाऱ्यावर नोकरीवरून कमी करण्याची धमकी देत असून कर्मचारी उपाशी आणि संस्थाचालक तुपाशी याच युक्तीचा अनुभव होत आहे. उपोषण करून आणि आत्मदहनाचे लेटर देऊन सुद्धा या गेंड्याच्या कातडीच्या लोकांना काहीही फरक पडत नाही याची कसून चौकशी व्हावी , संस्था चालकावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी पीडित कर्मचाऱ्यांनी केली आहे.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image