नवीन पर्व, विकास कामाची सुरुवात *रस्त्याच्या कामासाठी ४१ कोटी १६ लक्ष रुपयाचा निधी मंजूर* क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर पावसाळी अधिवेशनाच्या तिस-याच दिवशी ना.संजय बनसोडे यांनी विकास अनला निधी खेचुन उदगीर : गेल्या तीन वर्षात ग्रामीण भागातील नागरिकांना केंद्रबिंदू समजून उदगीर - जळकोट मतदार संघाचा विकास करण्याचे ध्येय बाळगुन गेल्या अनेक वर्षापासूनचा या मतदारसंघाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न करून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचे काम महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.संजय बनसोडे हे करत आहेत. उदगीर - जळकोट मतदार संघातील विविध रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातुन ना.संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून तब्बल ४१ कोटी १६ लाख ८६ हजार रुपयाचा निधी मंजूर करुन घेतला असुन लवकरच या विविध रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. यामध्ये इजीमा ४८ ते करलेवाडी ता.उदगीर रस्ता सुधारण्यासाठी ८० लाख रु, रामा २५० पिंपरी पिर तांडा डोंगरशेळकी तांडा ते इजिमा ४८ रस्त्याच्या सुधारणा करण्यासाठी ४ कोटी, राज्य मार्ग (रामा) २४९ ते निडेबन शेल्हाळ रस्त्यासाठी ३ कोटी ५० लक्ष रु, राज्य मार्ग (रामा) २४९. उदगीर शेल्हाळ ते प्रजिमा ३४ रस्त्यासाठी ४ कोटी रु, जळकोट तालुक्यातील चेरा ते रामा २५१ रस्ता सुधारण्यासाठी १ कोटी ८० लक्ष रु, जळकोट तालुक्यातील उमरदरा ते केकतसिंदगी रस्त्यासाठी २ कोटी ४० लक्ष रु, चेरा ते वांजरवाडा रस्त्यसाठी ३० लक्ष रु, इजीमा ४८ ते लाळी बु. येवरी ते शिवखेड रस्त्यासाठी ३ कोटी रु, जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा डोंगरगाव सुल्लाळी मांजरी प्र.जि.मा.२९ सा.क्र.५/५०० डोंगरगाव गावाजवळ लहान पुलाचेक्र. एनबीडी - २०२ बांधकाम करण्यासाठी १६ कोटी १६ लक्ष ८६ हजार रु तर जळकोट तालुक्यातील रावजी तांडा येथील रस्त्याच्या कामासाठी २ कोटी ५० लक्ष रुपये असे उदगीर व जळकोट मतदार संघातील विविध रस्त्यासाठी ४१ कोटी १६ लाख ८६ हजार रुपयाचा निधी मंजूर महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी मंजूर करुन घेतला आहे. पुन्हा एकदा उदगीर मतदार संघात विकास निधी मंजूर केल्याबद्दला ना.बनसोडे यांचे नागरीकांतुन अभिनंदन होत आहे.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image