उदगीर रोटरीच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर संपन्न उदगीर :- रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्यामार्य कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तीन दिवसीय आरोग्य तपासणी घेण्यात आले. त्यात इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींचे डोळे तपासणी, दंत तपासणी, सीबीसी रक्त तपासणी, इतर जनरल तपासणी करण्यात आले. शिबीर उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबच्या अध्यक्षा मंगला विश्वनाथे होत्या. यावेळी सचिव सरस्वती चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. बाळासाहेब पाटील, सहसचिव डॉ. सुधीर जाधव, धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय पाटील, श्यामार्यच्या मुख्याध्यापिका तृप्ती पंडित(ज्ञाते), रोटरी क्लबचे संतोष फुलारी, व्यंकट कणसे, डॉ. सायराम श्रीगिरे, डॉ. सुलोचना येरोळकर, डॉ. मोहन वाघमारे, रविंद्र हसरगुंडे, डॉ. सुनीता चवळे, विशाल जैन, प्रमोद शेटकार, प्रशांत मांगुळकर, ज्योती चौधरी, गजानन चिद्रेवार, अनिल मुळे, सुयश बिरादार, विजय पारसेवार, डॉ. राजेंद्र घाटे, डॉ. अस्मिता भद्रे, डॉ. नम्रता कोरे, गुरुराज गुरनाळे, विष्णुकांत जाधव, लॅब टेक्निशियन गणेश चिद्रेवार, सचिन पवार, श्यामलाल माध्यमिक विद्यालयाचे शालेय समिती सदस्य सुकणीकर, पर्यवेक्षक प्रवीण भोळे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. बाळासाहेब पाटील यांनी, सध्याच्या काळात आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची खूप काळजी घेतली पाहिजे, कारण आज आपल्या देशात ज्या वेगाने सर्व प्रकारचे प्रदूषण वाढत आहे. त्याच वेगाने आपल्या वातावरणात अनेक प्रकारचे आजारही वाढू लागले आहेत. ज्याचे रक्षण करण्यासाठी आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष दिले पाहिजे आणि संतुलित आहार घेतला पाहिजे असे सांगितले. डॉ. श्रीगिरे यांनी, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने सर्वांनी पाणी उकळून प्यावे असे आवाहन केले. डॉ. मोहन वाघमारे यांनी, निरोगी जीवनासाठी दातांची स्वच्छता आवश्यक असल्याचे सांगितले. मुख्याध्यापिका तृप्ती पंडित यांनी, व्यक्तीच्या खाण्यापिण्यामध्ये स्वच्छता, स्वच्छतेमुळे आरोग्याला पोषक स्थिती निर्माण होते. अस्वच्छतेमधून मलेरिया, गॅस्ट्रो इत्यादीसारखे रोग उद्भवतात. वैयक्तिक व सार्वजनिक पातळीवर व्यक्तीने स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते असे सांगितले. या शिबीरात डॉ. बाळासाहेब पाटील, डॉ. मोहन वाघमारे, डॉ. सुलोचना येरोळकर, डॉ महेश जाधव, डॉ. अस्मिता भद्रे, डॉ. नम्रता कोरे, डॉ. दिपीका भद्रे, डाॅ प्राजक्ता जगताप,डाॅ. शिवकुमार होट्टूलकर ,डॉ. शिवकांत यांनी वैद्यकीय सेवा दिली. शिबीरात एकूण ७०० विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीहरी निडवंचे यांनी केले. आभारप्रदर्शन प्रवीण भोळे यांनी केले.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image