उदगीरातील मालमत्ता भावाढीमुळे सामान्य जनतेच्या घराचे स्वप्न झाले कठीण! 👉 प्रॉपर्टी चे भाव वाढ कोण करत आहेत,दलाल,दोन नंबर पैसेवाले का अन्य कोणी, याचा तपास होणे जरुरी 👉 या भाव वाढीस आयकर विभाग जबाबदार ? 👉 मागील पाच वर्षात किती जणांनी प्रॉपर्टी घेतली,विकली याचा संपूर्ण डाटा शासनाकडे, आयकर विभागाकडे उपलब्ध असतानाही,किती मालमत्ता घेणाऱ्यांची चौकशी आयकर विभागाने किंवा अन्य विभागाने केली याचे ही मोजमाप होणे जरुरी 👉 शहरात कुठला ही प्लॉट घ्यायचे असेल तर उघड उघड बाँड वर नोटरी करून करोडो ची देवाणघेवाण होत असताना किती जणांनी मालमत्ते साठी बाँड घेतला,नोटरी कोणाकडे केली याची ही चौकशी होणे जरुरी 👉 नोट बंदी नंतर दोन नंबर पैश्याची सर्वात जास्त गुंतवणूक उदगीर व शहर परिसरातील मालमत्तेत ? उदगीर:- उदगीर शहरांतील व परिसरातील मालमत्ते च्या किमती मागील पाच वर्षात 25 पट तर काही भागात 50 पट वाढल्याने सामान्य जनतेस आता उदगीर व परिसरात प्लॉट घेऊन घर बांधणे सोपे राहिले नाही उदगीर व परिसरात दोन नंबर पैसेवाल्यानी,दलालांनी मालमत्ते च्या किमती एवढ्या वाढविल्या की सामान्य माणूस आता तरी शहर व परिसरात प्लॉट घेऊन घर बांधूच शकत नसल्याचे चित्र असून या भाव वाढीस खरे तर प्रशासनातील काही अधिकारी, आयकर विभाग जबाबदार असल्याचे चर्चिले जात आहे,मागील पाच वर्षात एक लाखाचा प्लॉट 30,40,50 लाख तर काही भागात करोडो ला विकला जात आहे अणि अशी मालमत्ता घेणारे कमी नाहीत , हे 1रूपया ला घेऊन पुढे 100 करत आहेत, तर शहर व परिसरात काही पलोटिंग खरेदी विक्री करणाऱ्या टोळ्या तयार झाल्या असून बाँड वर मुदतीत करोडो ची मालमत्ता खरेदी चा वेवहार करायचा आणि लाखो ची रजिस्ट्री करून अल्पावधीत अब्जोधिश झाल्याची चर्चा ही रजिस्ट्री कार्यालय परिसरात चर्चिली जात असून , अश्या व्यवहारातून रजिस्ट्री विभागातील काही अधिकारी,दलाल, बाँड विक्रेते ही आज करोडपती झाल्याची चर्चा खुले आंम सुरू असूनही प्रशासनाचा गुप्तमाहिती विभाग, आयकर विभाग गप्प असल्याने हे सगळे चालु असल्याची चर्चा ही जोरात आहे
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image