उदगीर चे शिक्षण महर्षी बापुराव राठोड वर 420 चा गून्हा दाखल! उदगीर:- उदगीर येथील शिक्षण महर्षी म्हणून वावरणारे, गुनाई शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रमुख तथा पूर्व जिल्हा परिषद सदस्य बापुराव शंकरराव राठोड यांच्यावर गुरनं 249/23 क 420,465,467,468,471 भादवि ने गुन्हा दाखल झाल्याने राजकिय शेत्रात तथा शिक्षण शेत्रात भूकंप झाल्याचे चित्र दिसत आहे फिर्यादी बाळासाहेब नारायण राठोड वय 39वर्षे धंदा शिक्षक रा कौळखेड ता उदगीर यानी उदगीर शहर पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून बापूराव शंकरराव राठोड रा कौळखेड ता उदगीर या आरोपीने दि.06/11/2017 ते अदयापर्यंत सर्वे नं.220 न.प.न.2-2-2049 मधिल 60 आर क्षेत्र हे फिर्यादीचे व नमुद आरोपीचे दोघात सामाईक असुन त्याची वाटणी झाली नसताना देखील आरोपीने पुर्ण 60 आर क्षेत्रावर मालकी हक्क दाखवुन व नगर परिषदेचा खोटाबनावट 8-अ जोडुन तो खरा आहे असे भासवुन त्याआधारे लिव्ह अॅन्ड लायसन्स करारपत्राची सह दुय्यम निबंधक कार्यालय उदगीर येथे दस्त नोदंणी करुन घेवुन त्याआधारे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातुर यांच्याकडुन गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक आश्रमशाळा बोरतळा पाटी उदगीर व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या ईमारतीचे भाडे मुल्याकंन करुन घेवुन त्याचा लाभ घेवुन त्यांनी सामाईक क्षेत्रामध्ये फिर्यादीचा हिस्सा असताना देखील फिर्यादीस त्यापासुन वंचित ठेवुन फिर्यादीची व शासनाची आर्थिक फसवणुक केली आहे .वगैरे मजकुर फिर्याद वरून मा पो नि सो यांचे आदेशाने गुन्हा दाखल करून पुढील तपास स पो नि श्री कुदळे यांचे कडे देण्यात आला असल्याने एकच भूकंप झाल्याचे चित्र दिसत आहे
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image