डेरी बचाव कृती समिती कडून ना. संजय बनसोडे यांचे खच्चिकरण करण्याचा प्रयत्न? :- ज्या ना. संजय बनसोडे यांनी कृती समितीच्या सदस्यांना मुंबई ला बोलाऊन डेरी चालु करण्यासाठीं दुग्ध विकास मंत्र्याची भेट घालून दिली त्यांनाच बाजूला सारून दिल्ली गाठण्याचे कृती समितीचे उद्देश काय? 👉 मंत्री महोदयांनी कृती समितीच्या सदस्यांना दिल्ली जाऊ , जेथे जेथे जावे लागले तेथे मी घेऊन जातो सांगितल्या नंतर ही कृती समिती अशी का वागली याची शहरात उलट सुलट चर्चा उदगीर:- उदगीर येथील शासकिय दूध डेरी शासनाचे सुरू करावी म्हणून उदगीरकराची अनेक दिवसाची मागणी लक्ष्यात घेऊन उदगीर चे आमदार तथा कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील याना भेटून विनंती केली पण ही डेरी शासन कुठल्याही परिस्थितीत चालु करू शकत नसल्याचे सांगितल्याने त्यांनी ही डेरी अमुल ने चालवावी म्हणून प्रयत्न सुरू करताच खाजगी डेरी चालविण्यास विरोध उभा राहिला,हा विरोध दाखवण्या साठी स्वयंघोषित डेरी बचाव कृती समिती(या समितित किती सदस्याना डेरी ची पूर्ण माहिती आहे हे त्यानाच माहित) स्थापन झाली, त्यातिल काही नी याची माहिती मंत्री महोदयाना दिली, मंत्री महोदयानी या कृति समितिशी चर्चे साठी शिवाजी महाविद्यालयात बैठक बोलावली, त्या बैठकीत मंत्र्यांनी कृती समितीच्या सदस्यांनी मुंबई यावे, तेथे काही नाही झाल्यास मी तुमच्या सोबत दिल्ली येऊन प्रयत्न करतो म्हणाले,मी सोबत येऊन दुग्ध विकास मंत्र्याशी भेट घालून देतो म्हणाले त्या प्रमाणे कृती समितीचे काही सदस्य मुंबई गेले, दुग्ध विकास मंत्र्याची भेट घेतली अणि मंत्रालय परिसरातून फेस बुक लाईव्ह करत ही डेरी शासन कुठल्याही परिस्थितीत चालु करू शकत नसल्याचे सांगितले,या नंतर या कृती समितीचे अणि मंत्री महोदयांचे कुठे बिनसले हे समजण्या आधी कृती समितीचे सदस्य खासदाराना घेऊन दिल्ली दरबारी नितीन गडकरी याची भेट घेऊन डेरी बचाव ची मागणी त्यांचाकडे केली असून आता पुढे काय होईल हे पाहावे लागेल पण कार्यक्षम, धडाडीचे, कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या सोबत जाणे अणि पुढील काळात त्यांना डावलने हे कृती समितीस किती परवडेल अशी चर्चा शिवाजी चौकात चालु असल्याचे दिसते
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image