पत्रकाराच्या रस्ता रोको ने उदगीर ठप्प! उदगीर:- पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ, गुण्डाकडून अमानुष मारहाण करावयास लावणारे आमदार किशोर पाटील यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर पत्रकार सौरक्षन कायद्याने गुन्हा दाखल करावा या साठी उदगीर तालुक्यातील सर्व पत्रकारानी येथील शिवाजी महाराज चौकात भूतो न भविष्यती असे रस्ता रोको केल्याने उदगीर ठप्प झाल्याचे चित्र दिसत होते, या आंदोलनात पत्रकाराची एकी पाहून पत्रकारात फूट पाडणाऱ्याचे धाबे दणाणल्याचे चित्र दिसत होते, जर या आमदारावर कारवाई नाही झाल्यास या पेक्षा ही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे उपस्थित पत्रकारानी सांगितले,या नंतर कार्यवाही चे निवेदन उपजिल्हाधिकारी व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. यावेळी विनायक चाकुरे, रोशन मुल्ला, अर्जुन जाधव, युवराज धोतरे ,राम मोतीपवळ, सचिन शिवशेट्टे, रवींद्र हसरगुंडे, दयानंद बिरादार, डॉ धनाजी कुमठेकर, संतोष जोशी, राजीव किनीकर, श्रीनिवास सोनी, विनोद उगीले, सिद्धार्थ सूर्यवंशी, बिभीशन मद्येवाड, महादेव आनवले, बबन कांबळे, सुनील हावा, बस्वेश्वर डावळे, अशोक कांबळे, बालाजी कवठेकर, राजकुमार नावंदर, ॲड.गोविंद सोनी, महेश मठपती, भगवान सगर, मंगेश सूर्यवंशी, मनोहर लोहारे, अविनाश सूर्यवंशी, संदीप निडवदे, जावेद शेख, संगम पटवारी, जीवन भोसले, दत्तात्रय भोसले, गंगाधर भेंडेगावकर, नितीन एकुर्केकर, श्रीकृष्ण चव्हाण, राम जाधव, विश्वनाथ गायकवाड, संग्राम पवार, ॲड. डॉ. श्रवणकुमार माने, अनिल जाधव, माधव घोणे, अशोक तोंडारे, लक्ष्मण रणदिवे, जय मादळे, अझरुद्दीन शेख, संदीप पाटील, सुधाकर नाईक, बसवराज बिरादार, गणेश मुंडे, ईश्वर सूर्यवंशी, सुरेश पाटील नेत्रगांवकर आदी सह अनेक पत्रकार उपस्थीत होते.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image