अट्रोसिटी चा गैरवापर: मा. उच्च न्यायालयाचे ताशेरे. उदगीर: फिर्यादी हा अट्रोसिटी कायद्याच्या तरतुदी चा वारंवार गैरवापर करत असल्याचे निदर्शनास आणून दिले असता, मा. उच्च न्यायालयाचे मा. न्या. आर. एम.जोशी यांनी अट्रोसिटी कायद्याचा उद्देश अन्याया विरोधात होणे अपेक्षित असून सदर कायद्यांतर्गत प्रथम दर्शनी खोट्या, सूडबुद्धीने दाखल केलेल्या तक्रारी मध्ये उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत याचिका कर्त्यांना संरक्षण देणे न्यायोचित आहे असे निरीक्षण नोंदवले. प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादी कन्हैया कांबळे यांनी शांतवीर मुळे, शिवराज मुळे, रोहन मुळे व इतर यांचे विरुद्ध कलम ३(१) r, s अट्रोसिटी कायदा अंतर्गत जातीवाचक शिवीगाळ केले बाबत आरोप करत पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे फिर्याद दिली. मुळे यांनी मा. सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिन केला असता मा. सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. सदर नाराजीने त्यांनी मा. उच्च न्यायालयात ऍड. अजिंक्य रेड्डी यांच्या मार्फत याचिका दाखल केली. फिर्यादी आणि आरोपी यांच्यात दिवाणी वाद प्रलंबीत आहे, तसेच फिर्यादी आणी त्यांचे कुटुंबीय यांनी या पूर्वी देखील समाजातील प्रतिष्ठित व्यति विरोधात आधी दिवाणी वाद दाखल करून नतंर त्याचे रूपांतर जातीवाचक शिवीगाळ तक्रारी मध्ये करून या पूर्वी देखील पोलिस ठाण्यात फिर्यादी दिलेल्या आहेत सदर बाब पाहता प्रथम दर्शनी फिर्यादी आणि त्याचे कुटूंबीय केवळ दिवाणी प्रकरनाचे स्वतः च्या फायद्यासाठी फौजदारी तक्रारी मध्ये रूपांतर करत असल्याचे शक्यता नाकारता येत नाही अश्या आशयाचा युक्तिवाद केला. मा. उच्च न्यायालयाने सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या कार्यपद्धती बाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आरोपी यांना खोट्या गुन्ह्यात गोवल्या जाण्याची दाट शक्यता आहे असे निरीक्षण नोंदवून सर्व आरोपींना कायम अटकपूर्व जमीन दिला. सदर प्रकरणी मुळे कुटुंबातील सदस्य यांचे तर्फे ऍड. अजिंक्य रेड्डी यानी बाजू मांडली त्यांना ऍड. विष्णू कंदे यांनी सहकार्य केले.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image