उदगीर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी माल तारण योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा = सभापती शिवाजीराव हूडे उदगीर= उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यासाठी माल तारण योजनेचा शुभारंभ करत असून या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे सह सर्व संचालक मंडळानी केले आहे उदगीर तालुक्यातील शेतकरी बांधवा साठी कृषि उत्पन्न बाजार समिती, उदगीरच्या वतीने शेतकरी बांधवाना सोयाबीन काढणीच्या हंगामात होणारी भावाची घसरन त्यातून त्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितकडून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उच्च बाजार भाव मिळण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्याकडे असलेला शेतीमाल लगेच बाजारात न विकता तो बाजार समितीच्या गोदामामध्ये ठेवावा या साठी चालु हंगामात शेतमाल तारण कर्ज योजना चालु करण्यात येत असून सदर योजनेचा उदगीर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा , या योजनेत गोडाऊन भाडे राहणार नसून आपले होणारे नुकसान टाळावे असे आवाहन बाजार समितीकडून सभापती शिवाजीराव हुडे, उपसभापती, सर्व संचालक मंडळानी केले आहे, शेतकर्यांनी माल तारण साठी खालील कागदपत्र सोबत ठेवावे असे ही त्यांनी सांगितले आहे 1) या योजनेत शेतमाल (सोयाबीन व तूर ) ठेवल्यास त्वरीत शासनाच्या हमीभावाच्या 75 टक्के ग्रेडींग प्रमाणे 6 टक्के व्याज दराने सहा महीने करीता त्वरीत कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. 2) शेतकरी बंधुनी सोयाबीन व तूर हे स्वच्छ करून वाळवूनच घेवून यावे, ज्यामुळे शेतीमालाची गुणवत्त चांगली राहील. सोयाबीन व तूर शेतीमाल घेवून येताना कलतानी (ज्युट) बारदानामध्येच आणावा जेणे करून मालाची गुणवत्त चांगली राहील. 3) सदर योजनेचा लाभ केवळ 6 महीण्यासाठी आहे. शेतकरी बांधवानी शेतीमाल ठेवण्यासाठी येताना चालु वर्षाचा 7/12 पिकपेऱ्याच्या नोंदीसह, आधारकार्ड व बँक पासबुकच्या छायाकिंत प्रतीसह व १ पासपोर्ट फोटो आणावा असे त्यांनी सांगितले आहे
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image