*उदगीर येथील सराईत गुन्हेगारांची आणखीन एक टोळी लातूरसह पाच जिल्ह्यातून हद्दपार. 👉पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचा झटका * उदगीर :- लातूर जिल्ह्यातील भाईगिरी व गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जनसामान्यांना त्रास देऊन वेठीस धरणाऱ्या, नागरिकांच्या जीविताला व त्यांच्या मालमत्तेस धोका निर्माण करणाऱ्या असामाजिक तत्त्वांचा बीमोड करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आज पावतो हद्दपारच्या एकूण तीन प्रकरणात 10 सराईत व कुख्यात आरोपी विरुद्ध कार्यवाही करत त्यांना लातूरसह पाच जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. याबाबत थोडक्यात माहिती अशी की, उदगीर शहर व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या व टोळीने राहणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी, सराईत गुन्हेगाराकडून कोणत्याही प्रकारचे गैरकायदेशीर कृत्य घडू नये. याकरिता उदगीर शहर व उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळी मधील गुन्हेगारांना एक वर्षासाठी लातूर, बीड, नांदेड ,परभणी व धाराशिव या पाच जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. सदर गुन्हेगारांच्या टोळीचे अभिलेख पाहता पोलीस ठाणे उदगीर शहर व ग्रामीण येथे 11 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून सदर टोळी विरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे, चोरी करताना दुखापत करणे, हल्ला करणे, अतिक्रमण करणे, धमक्या देणे तसेच बेकायदेशीर जमाव जमविणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने कारवाया करणे, घातक शस्त्राने जबर दुखापत करणे, आजन्म कारावास किंवा अन्य कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेले गुन्हे करणे, तसेच शरीराविरुद्ध, मालाविरुद्ध चे गुन्हे करणे इत्यादी प्रकारचे एकूण 11 गुन्हे पोलीस ठाणे उदगीर शहर व उदगीर ग्रामीण येथे दाखल असून त्यांचेवर अनेक वेळा प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली. परंतु त्यांच्या वर्तनात कोणत्याही प्रकारची सुधारणा न होता ते अधिकच उग्र होत असल्याने सदर टोळी कडून एखादा गंभीर दखलपात्र गुन्हा घडून जनतेच्या मालमत्तेस किंवा धोका इजा होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने टोळीप्रमुख 1) बाबर मोहम्मद सय्यद, वय 28 वर्ष, राहणार पेठदरवाजा, उदगीर. 2) अरबाज अजीमुद्दीन सय्यद, वय 23 वर्ष,राहणार धनगरबावडी जवळ, उदगीर. 3) सुलतान खुर्शीद शेख, वय 26 वर्ष, राहणार बनशेळकी रोड, उदगीर. त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 प्रमाणे कार्यवाही करून दिनांक 05/10/2023 रोजी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी हद्दपारिचे आदेश पारित करून नमूद तारखेपासून सदरच्या सराईत गुन्हेगारांना लातूर, नांदेड, बीड ,परभणी व धाराशिव या पाच जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहेत. तसेच सदरच्या टोळीतील इतर सदस्य नामे 1) मोसिन मतीन शेख, वय 23 वर्ष, राहणार मुसा नगर, उदगीर. 2)एजाज फारूक शेख, वय 23 वर्ष, राहणार मुसा नगर, उदगीर. 3) सोहेल फकीरमिया सय्यद, वय 23 वर्ष, राहणार मुसा नगर, उदगीर. 4) साबेर मंजूर पठाण, वय 26 वर्ष, राहणार पेठ दरवाजा, उदगीर. यांचे विरुद्ध मागील एक/ दोन वर्षात उदगीर शहर व उदगीर ग्रामीण येथे गुन्हा दाखल नसल्याने त्यांची वर्तणूक सुधारण्यासाठी, मानवीय दृष्टिकोनातून एक संधी म्हणून त्यांना वर नमूद पाच जिल्ह्यातून हद्दपार न करता त्यांच्याकडून प्रतिष्ठित जामीनदारासह चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र घेण्यात आले आहे. हद्दपार केलेल्या नमूद गुन्हेगारांना उदगीर शहर पोलिसांनी हद्दपार क्षेत्राचे बाहेर नेऊन सोडण्याची कार्यवाही सुरू केली आहे. सदरचा प्रस्ताव तयार करणे कामी उपविभागीय पोलीस अधिकारी, (उदगीर) दिलीप भागवत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस अंमलदार प्रदीप स्वामी, पोलीस ठाणे उदगीर शहर चे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, व त्यांच्या नेतृत्वातील टीम मधील पोलीस अमलदार बबन टारपे, गजानन पुल्लेवाड, सतीश पवार, साठे यांनी परिश्रम घेतले आहे. सदर कारवाईच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगार,उपद्रवी लोकांवर जरब बसून सराईत गुन्हेगारांची टोळी जिल्ह्यातून हद्दपार केल्यामुळे इतर गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यां गुन्हेगारांना चांगलाच दणका बसला आहे.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image