वृक्ष प्रेमी नी अधिकाऱ्याच्या नावाने शिमगा करत वटवृक्षास वाहिली श्रद्धांजली उदगीर:- उदगीर येथील पंचायत समितीच्या अवरातील विनाकारण तोडलेल्या इतिहासकालीन वट वृक्षास अधिकाऱ्याच्या नावाने शिमगा करत वृक्ष प्रेमी नी श्रद्धांजली वाहिली शुक्रवारी काही वृक्ष प्रेमी उदगीर शहरात होत असलेल्या अवैध वृक्ष तोड बाबत नप मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांची भेट घेतली होती तेंव्हा त्यांनी वृक्ष प्रेमी ना तीन दिवसात तोडलेल्या झाडाबाबत समिती गठण करून कार्यवाही करू असे आश्वासन देत त्यांची बोळवण केली होती, त्या नंतर मंगळवार सकाळीं पंचायत समितीच्या आवारातील जुने वट वृक्ष तोडण्यात आले पण मुख्याधिकारी यानी काय कार्यवाही केली कुठली समिती स्थापन केली हे न समजल्याने वृक्ष प्रेमी नी आज संध्याकाळी 5 वाजता तोडलेल्या इतिहासकालीन वट वृक्षास श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम ठेवला होता त्या प्रमाणे आज तोडलेल्या वट वृक्षास हार घालून वृक्ष प्रेमी नी अधिकाऱ्याच्या नावाने शिमगा करत वट वृक्षास श्रद्धांजली अर्पण केली या वेळेस राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे गुरुजी,गुरूप्रसाद पांढरे, अजित शिंदे, अजित पाटील, अहमद सरवर, संतोष कुलकर्णी, नरेश सोनवणे, बालाजी सुवर्णकार, ओंकार गांजूरे , कपिल शेटकार, महेश तोडकर, महेश होनराव, विशाल स्वामी, अजय कबाडे, सुशील माका, अमित पसारे, अक्षय पसारे, विशाल चव्हान, तेजस अंबेसंगे, शफीक सोफी, विश्वा बिरादार, शिवा उप्परबावडे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थीनी सह अनेक वृक्ष प्रेमी नी मुख्याधिकारी यांच्या भूमिके बाबत नाराजी व्यक्त करत बोंब मारत त्यांचा निषेध ही केला,एक मिनिट स्तब्ध थांबून या वृक्षास श्रद्धांजली अर्पण केली
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image