शेतकऱ्यांच्या हितासाठी, व्यापार वाढसाठी सर्वानी प्रयत्न करावेत कृ.उ.बा.स.सभापती शिवाजीराव हुडे उदगीर= शेतकऱ्याच्या हितासाठी सोबत शेतकऱ्यांचा माल उदगीर बाजार पेठेत आणण्यासाठी बाजार समितीचे संचालक , सर्व आडते ,खरेदीदार सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे असे मत‌ आडत वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्याला उत्तर देताना बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे म्हणाले आडत वेलफेअर असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी रघकुल मंगल कार्यालयात नुतन संचालक मंडळाचा सत्कार आयोजित करण्यात आला होता,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अडत वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष श्रीधर बिरादार हे होते तर व्यापीठावर सत्कारमुर्ती सभापती शिवाजीराव हुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव मुळे, संचालक तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, नानेश्वर पाटील, विजयकुमार निटुरे, मधुकर एकुर्केकर, संतोष बिरादार, जगदीशप्रसाद बाहेती, गौतम पिंपरे, बालाजी देवकत्ते ,जिवन पाटील, रवींद्र कोरे , बाजार समितीचे सचिव प्रदीप पाटील, असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवशंकर बिरादार, साईनाथ कल्याणे सचिव मनोहर बिरादार हे होते.यावेळी असोसिएशनच्या वतीने बाजार समितीच्या सभापतीसह सर्व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. यावेळी कल्याण पाटील, शिवाजीराव मुळे, नानेश्वर पाटील, मधुकर एकुरेगकर , विजय निटुरे, सदस्य प्रमोद पाटील,ई आपले विचार व्यक्त केले. या सत्कार समारंभास उद्देशून बोलताना शिवाजीराव हुडे म्हणाले की हा सत्कार माझा नसुन शेतकरी ,व्यापारी मतदारांचा व पक्षश्रेष्ठींचा आहे. शेतकऱ्यांचा हितासाठी जो निर्णय घ्यावा लागेल ते मी सर्वांना सोबत घेऊन घेईन, आपण सर्वजण मिळून आपल्या समोर चांगला दृष्टीकोन ठेऊन काम करू यावेळी, अशोक बाहेती,राजेश अबंरखाने, सुदर्शन मुंडे, शिवकुमार गुळंगे,सागर महाजन, माधवराव कल्याणे, बाबुराव पांढरे, मलिकर्जून लंजवाडकर लक्ष्मीकांत चिकटवार, शांतीवीर मुळे, सतीश बिरादार, आप्पासाहेब पाटील, गुरुनाथ बिरादार, बालाजी बिरादार, मलीकार्जून काळगापुरे,यांच्यासह आडत व्यापारी, खरेदीदार, दाळमील असोसिएशन चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशन अध्यक्ष श्रीधर बिरादार, सूत्रसंचालन सहसचिव नागेश आंबेगावे यांनी तर आभार शिवाजी पेठे यांनी मांडले.सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधर बिरादार, उपाध्यक्ष शिवशंकर बिरादार, साईनाथ कल्याणे, सचिव मनोहर बिरादार, सहसचिव नागेश आंबेगावे, कोषाध्यक्ष चंद्रकांत बिरादार, सह कोष्याध्यक्ष भरत दंडीमे, सदस्य सुनील पाटील, उमाकांत पांढरे, दिलीप जाधव, श्याम बिरादार, मारोतीराव कडेवार, शिवाजी पेठे, अरविंद जिरगे, मलीकार्जून रेगुडे, निलेश कालाणी, प्रमोद पाटील, संजय बिरादार, दत्तात्रय जगळपुरे, कमलाकर भंडे, चंद्रकांत बिरादार यानी मोलाचे सहकार्य केले
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image