फटाके फोडणाऱ्या बुलेट सायलेन्स वर पोलिस प्रशासनाने फिरवले रोड रोलर 👉 शहर पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांची धडाकेबाज कार्यवाही उदगीर = शहरामध्ये वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर समस्या असून त्यास भरीत भर म्हणून शहरात मोठ्या प्रमाणावर मॉडिफाइड सायलेन्सर वापरून आवाज काढत मोठ्या प्रमाणावर बुलेट रस्त्यावर होते, वाहतूक नियमन करताना अशा बुलेट धारकावर विशेष मोहिमेअंतर्गत कठोर धडक कारवाई मागील सहा महिन्यात करण्यात येऊन शंभरहून अधिक मॉडिफाइड बुलेट धारकावर दीड लाख रुपये दंड आकारून सदर सदरचे सायलेन्सर जप्त करण्यात येऊन त्यांच्यावर आज रोजी रोड रोलर फिरून सदरचे नष्ट करण्यात आले आहेत सोबत पोलिस प्रशासनाने ध्वनी प्रदूषण करणारे अनधिकृत मॉडिफाईड सायलेन्सर वापरू नयेत त्याचप्रमाणे फॅन्सी नंबर प्लेट दादा, काका, भाऊ अशा वापरणाऱ्या वर आणि विना नंबर वाहन वापरणाऱ्या वर कार्यवाही करण्याचे संकेत दिले असून नागरिकांनी वाहनधारकांनी तात्काळ फॅन्सी नंबर्स स्वतःहून काढून घ्यावेत मोटरसायकलवर आरटीओ मान्यता प्राप्त फॉरमॅटमध्येच नंबर देखील टाकण्यात यावेत अन्यथा अशी वाहने दंडास पात्र ठरतील असे म्हंटले आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर रिक्षांची संख्या असून रिक्षामध्ये अनाधिकृत पद्धतीने साउंड बॉक्स लावून मोठ्या आवाजात गाणे घोंगट केला जात आहे ही बाब निदर्शनास आल्यानंतर धडक कारवाई करून सदर रीक्षा मधील 90% अधिक रिक्षा मधील साउंड बॉक्स काढून टाकण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मध्यभागी वापरण्यात येणारा आरसा देखील काढण्यात आला आहे आणि रिक्षा धारकांना युनिफॉर्म बंधनकारक करण्यात आलेला असून त्यांनी त्याचं पालन करणे आवश्यक आहे अन्यथा अशा रिक्षाचालकावर पोलीस प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर श्री अजय देवरे, उदगीर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिलीप भागवत पोलस निरिक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनात शहर वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार मोती पवळे पोलीस शिपाई अवी फुलारी, पोलीस शिपाई गणेश बामणे, पोलीस शिपाई पाटील, पोलीस नाईक शिवपुजे यांच्या पथकाने केलेली आहे.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image