*उदगीर येथे २९ डिसेंबरपासून राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन* 👉 *राज्यभरातून ८०० स्पर्धक होणार सहभागी* 👉*ना.संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन* *उदगीर :* युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रतिवर्षी केंद्र शासनाच्या वतीने १२ ते १६ जानेवारी या कालावधीत 'राष्ट्रीय युवा महोत्सव' आयोजित करण्यात येतो. राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये राज्याचे प्रातिनिधिक संघ सहभागी करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यावर्षीचा राज्यस्तरीय युवा महोत्सव उदगीर येथे २९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ३० डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता उदगीर शहरातील तालुका क्रीडा संकुल (जिल्हा परिषद मैदान) येथे या महोत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील, असे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी कळविले आहे. केंद्र शासनाच्यावतीने १२ ते १६ जानेवारी, २०२४ या कालावधीत पुणे येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्य शासनाने सन २०२३-२४ या वर्षातील राज्यस्तर युवा महोत्सव आयोजनाची संधी लातूर जिल्ह्यास उपलब्ध करुन दिलेली असून आयोजन समितीच्यावतिने 'राज्यस्तर युवा महोत्सव' २९ ते ३१ डिसेंबर, २०२३ या कालावधीत उदगीर शहरामध्ये आयोजित करण्याचे निश्चित केलेले आहे. या महोत्सवात जवळपास १३ समूह लोकनृत्य, वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक सोलो लोकगीत, कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वकृत्व फोटोग्राफी, महाराष्ट्र राज्यासाठी विज्ञानातून तृणधान्य वाढीसाठी विकास व सामाज्यासाठी विज्ञान या संकल्पनेवर आधारीत असावी. हस्तकला, वस्त्रोद्योग, अग्रो प्रोडक्ट अशा प्रकारामध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे या आठ विभागातून सुमारे ८०० कलाकार सहभागी होतील. महोत्सवातील विविध बाबींच्या परीक्षणासाठी राज्यभरातून तज्ञ कलावंतांना पाचारण करण्यात आलेले आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतिने महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी समिती गठीत केलेली असून समितीच्यावतिने शहर व परिसरातील कला क्षेत्रातील सर्व नामवंत कलाकारांना निमंत्रीत करुन महोत्सवाचे नेटके आयोजन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आयोजन समितीने महोत्सवाचा लोगो, थीम सॉंग. नाविन्यपूर्ण बाबी केलेल्या आहेत. महोत्सवाच्या निमित्ताने उदगीर शहरातील सर्व नागरीकांना २९, ३० व ३१ डिसेंबर या कालावधीत लोककलेची मेजवाणी उपलब्ध होणार असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा व कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजन समितीच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image