तीन राज्यात विजय, उदगीर भाजपच्या वतीने जल्लोष उदगीर : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळल्याबद्दल उदगीर शहर भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष साजरा करण्यात आला. देशातील चार राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यात भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. या विजयाचा जल्लोष करण्यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात बँडबाजा व फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, जि. प. चे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवशंकर धुपे मनोहर भंडे, नंदकुमार नळंदवार, प्रा. पंडित सूर्यवंशी, बस्वराज रोडगे, धर्मपाल नादरगे, बालाजी गवारे, बापूराव यलमटे, गणेश गायकवाड, उदयसिंग ठाकूर, आनंद बुंदे , लखन कांबळे, सावन पस्तपुरे, नामदेव आपटे, आनंद साबणे, वसंत शिरशे, सतीश उस्तुरे, डॉ चंद्रकांत कोठारे,सुजित जीवने , संजय पाटील, अमीर शेख, पप्पू गायकवाड,मोतीलाल डॉइजोडे, सत्यवान बोरोळकर, रामेश्वर पवार, मारुती श्रीनिवार, सुनील गुडमेवार, संजय पांढरे, व्यंकट काकरे, स्वरूप महिंद्रकर, दत्ता केंद्रे, रमेश धावडे, महेश धावारे, अनिकेत गुडमेवार, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शिल्पा इंगळे, रमाबाई वाघमारे, मंदाकिनी जीवने, वर्षाराणी धावारे, रेणुका डुबुकवाड, कृपा सूर्यवंशी, अनिता बिरादार ,स्वाती वट्टमवार, कांताताई सूर्यवंशी , भारती सूर्यवंशी, शिवगंगा बिरादार ,मीनाक्षी भोसले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image