*पत्रकारांचे प्रश्न न सोडवणाऱ्या सरकारच्या विरोधात आमचा लढा सुरूच राहील, एस.एम. देशमुख यांचे प्रतिपादन* 👉माहूर येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकारांचा मेळावा उत्साहात *उदगीर:* 'मराठी पत्रकार परिषदेची कोणतीही राजकीय भूमिका नाही. जे सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवतील, आह्मी त्या सरकारच्या सोबत आहे. पण जे सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवणार नाही, आम्ही त्यांच्या विरोधात लढत राहू. मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी आह्मी लढा सुरूच ठेवू,' असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकार मेळावा शनिवारी, (१३ जानेवारी २०२४) नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूरगड येथे उत्साहात पार पडला. यावेळी देशमुख बोलत होते. याप्रसंगी आमदार भीमराव केराम, स्वागताध्यक्ष रामदास सुमठाणकर, माहूर नगर पंचायत नगराध्यक्ष फिरोज दोसानी, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम.देशमुख, नांदेड भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर, जिल्हा परिषद नांदेड माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख ज्योतिबा खराटे, माहूर नगर परिषद माजी नगराध्यक्ष समरजी त्रिपाठी, मराठी पत्रकार परिषद विश्वस्त किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, टीव्ही असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, मराठी पत्रकार परिषद राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, डिझिटल मीडिया राज्याध्यक्ष अनिल वाघमारे, लातूर विभाग विभागीय संघटक प्रकाश कांबळे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ गोवर्धन बियाणी, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पांडागळे, माहूर तालुका मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष सरफराज दोसानी उदगीर चे सचिन शिवशेट्टे, सुरेश पाटील नेत्रगावकर श्रीनिवास सोनी, विश्वनाथ गायकवाड यांच्यासह राज्यभरातून आलेले पदाधिकारी, पत्रकार, मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य उपस्थित होते. देशमुख यांनी पुढे बोलताना सांगितले की, 'सरकार कुठल्याही असले तरी पत्रकारांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन नकारात्मक असाच आहे. सरकारच्या पेन्शन योजनेबाबत नेहमी हे दिसून येते. पत्रकारांना पेन्शन देताना सरकार त्यांच्याकडे बजेट नसल्याचे नेहमीच सांगते. त्यामुळे आता पत्रकारांच्या पेन्शनसाठी सरकारने अर्थसंकल्पातच तरतूद करावी, अशी मागणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. तसेच पत्रकार संरक्षण कायदा झाला, पण तो कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आलेला नाही. कारण या कायद्याचे नोटिफिकेशनच अद्याप निघाले नाही. ही सरकारने एक प्रकारे पत्रकारांची केलेली फसवणूकच आहे. पत्रकार संरक्षण कायद्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयात जाऊ,' असे सांगतानाच देशमुख पुढे म्हणाले,' पत्रकारांनी समाज, सरकार तुमच्यासोबत येईल, ही अपेक्षा ठेवण्यापेक्षा पत्रकारांनीच पत्रकारांसाठी आता काहीतरी करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण पत्रकारावर हल्ला झाला तर पत्रकार वगळता कोणी निवेदन सुद्धा देण्यासाठी पुढे येत नाही. हे आपण वारंवार पाहतो. त्यामुळे आता मराठी पत्रकार परिषद पत्रकारांना मदत करता यावी, यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून एक कोटी रुपयांचा फंड उभारण्यासाठी काम करत आहे. या फंडामधून दरवर्षी किमान २५ पत्रकारांना मदत करता आली तरीही ते खूप मोठे काम होईल.' आमदार भीमराव केराम मेळाव्याला राज्यभरातून आलेल्या पत्रकारांचे स्वागत केले, व ते म्हणाले,' मराठी पत्रकार परिषद राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. लेखणीच्या माध्यमातून आमच्या सारख्या राजकीय नेत्यांनी केलेली कामे पत्रकार लोकांसमोर आणतात. तसेच वेळप्रसंगी लेखणीतून आम्हाला आमच्या चुका दाखवून देण्याचे कामही पत्रकार करतात. खरंतर एखाद्या राजकीय नेत्याची ओळख ही पत्रकारांच्या लेखणीच्या माध्यमातूनच होत असते,' असे सांगत आमदार केराम यांनी पत्रकारांच्या कामाचा गौरव केला. तसेच परिषदेचे मुख्य विश्वस्त यांच्या संघर्षाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सीएनएन १८ न्यूज च्या ब्युरो चीफ विनया देशपांडे म्हणाल्या की, ' आजच्या काळात डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पण अनेकदा आपल्या गावातील प्रसंगी प्रश्न हे भाषेचा अडथळा असल्याने आपण मर्यादित लोकांपर्यंत पोहोचवतो. मात्र 'एआय' चे दारे उघडल्याने भाषेचा अडसर संपत असून या संधीचा आता ग्रामीण भागातील पत्रकारांनी फायदा घेण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या गावातील, मातीतील प्रश्न जगभरात पोहोचवण्याची ही संधी आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार न करता मोठ्या संधीचा फायदा घ्या,' असे आवाहन देशपांडे यांनी केले. 'ज्या लोकशाहीला स्वतःच्या त्रुटींची जाणीव असते, ती प्रबळ लोकशाही असते. अशा लोकशाहीची जाणीव प्रत्येक पत्रकाराला असणे गरजेचे आहे,' असे सांगतानाच देशपांडे यांनी परदेशामध्ये पत्रकारिते संबंधित आलेल्या अनुभवांची माहिती यावेळी दिली. स्वागताध्यक्ष रामदास सुमठाणकर म्हणाले, 'आज राज्यभरातील पत्रकार येथे आल्याचा आनंद होत आहे. आज मंडपामध्ये बसण्यासाठी जागा नाही, एकही खुर्ची रिकामी नाही, हेच या कार्यक्रमाचे यश आहे. टेक्नॉलॉजी सुधारत असली तरी वर्तमानपत्रातील बातमीची विश्वासार्थता कायम आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या संघटनांचे कौतुक करतो,' असेही ते म्हणाले. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी जिल्हा व तालुका पुरस्कार विजेत्या संघानी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच माहूर तालुका पत्रकार संघ व नांदेड जिल्हा पत्रकार संघाने माहूरगड पत्रकार मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतूक केले. पाबळे यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या वाटचालीची माहिती दिली. परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी सांगितले की,' मराठी पत्रकार परिषदेला ८४ वर्षांची परंपरा आहे. या परंपरेला कुठेही गालबोट न लावता, व कोणासमोर न झुकता पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचे काम मराठी पत्रकार परिषदेने केले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील पत्रकारांची साथ असल्यामुळेच पत्रकारांचे प्रश्न सोडवणे शक्य होत आहे. *'👉या' जिल्ह्याचा करण्यात आला पुरस्कार देउन सन्मान* *रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार यंदा *उत्तर_नगर* आणि *दक्षिण_नगर* जिल्ह्यांना विभागून देण्यात आला* दक्षिण नगर जिल्ह्याचा पुरस्कार जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके यांनी स्वीकारला. तर, उत्तर नगर जिल्ह्याचा पुरस्कार जिल्हाध्यक्ष अमोल वैदय यांनी स्वीकारला. *वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार* 1) मराठवाडा विभाग : *माजलगाव तालुका पत्रकार संघ*, जिल्हा बीड 2) लातूर विभाग : *माहूर तालुका पत्रकार संघ*, जिल्हा नांदेड 3) नाशिक विभाग : *साक्री तालुका मराठी पत्रकार संघ* जिल्हा धुळे 4) पुणे विभाग : *शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ*, जिल्हा पुणे 5) अमरावती विभाग : *तेल्हारा तालुका पत्रकार संघ*, जिल्हा अकोला 6) कोल्हापूर विभाग : *बत्तीस शिराळा तालुका पत्रकार संघ*, जिल्हा सांगली 7) नागपूर विभाग : *आर्वी तालुका पत्रकार संघ* जिल्हा वर्धा 8) कोकण विभाग : *अंबरनाथ तालुका पत्रकार संघ* जिल्हा ठाणे.
Popular posts
शंकर माध्यमिक आश्रम शाळेतील प्रभारी मुख्याधिपीका सात हजार रुपयाची लाच घेताना अडकली जाळ्यात उदगीर - बोरताळा पाटी, देगलुर रोड, उदगीर येथील शंकर माध्यमिक आश्रम शाळेतील प्रभारी मुख्याधिपीका यांना सात हजार रुपयाची लाच घेताना लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसाकडुन मिळालेली माहीती आशी की, तक्रारदार यांनी काही खाजगी अडचणीमुळे ईयत्ता ९ वी मध्ये शिक्षण अर्धवट सोडले होते. त्यानंतर तक्रारदार याना पुढील नौकरीसाठी व व्यवसायासाठी १० वी व त्यापुढील शिक्षण घेणे गरजेचे असल्याने, ता. ६ ऑगस्ट रोजी शंकर माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका त्रिविणी शेरे यांना भेटले. त्यावेळी मुख्याध्यापिका शेरे त्रिविणी यांनी १० वी वर्गात प्रवेश देण्यासाठी दहा हजार रूपयाची लाचेची मागणी केलेबाबत तक्रारदार यांची लाचलुचपत प्रतिबंधक लेखी तक्रार दिली. यावरुन सापळा रचुन आरोपी श्रीमती त्रिवेनि बबुराव शेरे, (वय ४१) प्रभारी मुख्याधापिका शंकर माध्यमीक अश्रमशाळा बोरताळा पाटी, देगलुर रोड उदगीर यांनी तक्रारदार यांचेकडून सात हजार रुपये लाचेची रक्कम त्यांचे कार्यालयामध्ये पंच साक्षीदारा समक्ष स्वतः स्वीकारली असता त्यांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडण्यात आले आहे. उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधीत अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूरचे पोलीस उपअधिक्षक संतोष बर्गे पोलिस निरीक्षक जगदीश राऊत, पोलीस कॉस्टेबल किरण गंभीरे, मंगेश कोंडरे, हवलदार श्री.अलुरे, महिला पोलीस कर्मचारी पठाण यांच्या पथकाने सापळा रचुन कार्यवाही करण्यात आली आहे. या घटने वरून एक लक्षात येते की आता शिक्षण विभाग ही लाच घेण्यात मागे नाही
स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही, गुत्तेदारांनी वीज ग्राहकांना विनाकारण त्रास देऊ नये - स्वप्निल जाधव उदगीर = सध्या लातूर जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू झाली आहे. वास्तविक पाहता वीज कायदा 2003 च्या कलम 55 प्रमाणे स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही. असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे विदर्भ प्रदेशाचे अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी सर्व वीज ग्राहकांना कळविले आहे. याची नोंद वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही आवाहन युवा नेते स्वप्निल जाधव यांनी केले आहे. वीज मीटर बदलण्यासाठी येणारे ठेकेदार आहेत. ती एक नोडल एजन्सी आहे. या नोडल एजन्सीला आपण वीज मीटर लावू नका, असे स्पष्ट सांगावे असेही विधीज्ञ दर्यापूरकर यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात कोणत्याही कायद्यानुसार सरकारी कामात अडचण आणणे ही केस आपल्यावर या बाबतीत लागू होऊ शकत नाही. स्मार्ट मीटर लावायला आलेल्या लोकांना हे मीटर लावणे आवश्यक असल्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या आदेशाची, परिपत्रकाची प्रत मागावी. जी ते तुम्हाला देऊ शकत नाहीत. असेही वीज ग्राहक संघटनेने म्हटले आहे. हे मीटर लावणे सर्वांनी ताबडतोब बंद करावे. कारण या मीटरच्या वेगवान फिरल्याने विज बिल भरता भरता आपल्याला अतोनात त्रास होणार आहे. एकदा का जर हे मीटर आपण लावले तर त्याला पुन्हा कोणीही परत काढू शकणार नाही. याची सर्वांनी जाणीव ठेवावी, असेही महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने म्हटल्याचे स्वप्निल जाधव यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना स्वप्निल जाधव यांनी मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालाचाही हवाला दिला आहे. मध्यप्रदेश हायकोर्टने वीज ग्राहकांना स्पष्ट केले आहे की स्मार्ट मीटर लावणे हे अनिवार्य नाही. थाई स्वरूपातील मिटर घेत असतील तर त्यांच्यासाठी ते अनिवार्य आहे मात्र नियमित ग्राहकांसाठी ते अनिवार्य नाही. संदर्भात विधिज्ञ शरद जोशी यांच्या म्हणण्यानुसार वीज ग्राहकांच्या लेखी परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवणे हे कायद्याने अपराध ठरू शकेल जबरदस्ती करून मीटर जर कोणी बसवत असेल तर तो उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ठरेल अशा पद्धतीच्या महत्त्वपूर्ण न्यायालयीन कारवाई बद्दल सीहोर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निशांत वर्मा यांनी आभार मानले आहेत, स्मार्ट मीटर बसवणे हे खाजगी कंपनीने कंत्राट घेऊन शासनाच्या काही लोकांना हाताशी धरून हे काम चालू केले आहे. भविष्यात हे मीटर रिचार्ज सिस्टीम चे होणार आहेत. त्यामुळे राज्यात त्याचा विरोध सुरू असताना तुमच्या घरी येऊन जबरदस्तीने मीटर बसवण्याचे काम वीज वितरण कंपनी करत असेल तर त्यांना ताबडतोब विरोध करावा. जीनियस या कंपनीचे मीटर ज्यांच्या घरी बसवले आहे, त्यांना आता दुप्पट बिल येऊ लागले आहेत. याकडे महाराष्ट्र विज ग्राहक संघटनेने लक्ष वेधले आहे. भविष्यात आपली लुबडणूक होणार नाही यासाठी जनतेने स्मार्ट मीटरला तीव्र विरोध करावा या संदर्भामध्ये काही स्वयंसेवी संस्था स्वतंत्रपणे अर्जाचा नमुना तयार करत आहेत तशा पद्धतीचा अर्ज ग्राहकाने महावितरणला देऊन त्याची पोचपावती घ्यावी त्यासाठी सर्वांनी सावध राहावे असेही आवाहन जाधव यांनी केले आहे.
Image
उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे:- श्री बस्वराज पाटील नागराळकर अध्यक्ष महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी उदगीर उदगीर:- उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे असून आज ज्या काही संस्था कार्यरत आहेत त्या व्यापाऱ्याच्या सहयोगामुळे असून उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असल्याचे महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर यांनी अडत व्यापारी वेलफेअर असोसिएशन वतीने आयोजित महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभास उत्तर देताना म्हणाले अडत वेलफेअर असोसिएशन वतीने आज रोजी अडत मार्केट मध्ये महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभ आयोजित केला होता,यात सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर,उपाध्यक्ष प्रकाश तोंडारे,सचिव डॉ रामप्रसाद लखोटिया,सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य शिवाजीराव हुडे,अजय दंडवते,आडेप्पा अंजुरे,शिवराज वल्लापुरे ,भाग्यश्री चाकुरकर,बस्वराज पाटील,नाथराव बंडे ,प्रशांत पेन्सलवार,अरविंद पाटील, दिलीप चौधरी,रमाकांत अंकुलगे,भिमाशंकर मुद्दा,मल्लिकार्जुन मानकरी, रामचंद तिरूके,डॉ. श्रीकांत मध्वरे , मन्मथ बिरादार यांचा सत्कार आयोजित केला होता,या वेळेस सत्काराला उत्तर देताना श्री बस्वराज पाटील नागराळकर म्हणाले की महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी ही संस्था व्यापाऱ्यांनी,शेतकारयानी आपल्या कस्टाटुन उभी केली असुन,उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असून व्यापाऱ्याच्या योगदानामुळे उदगीर चा विकास झाला ,आमचे ध्येय एकच आदर्श विद्यार्थी घडविणे हेच आमचे स्वप्न आहे असेही ते म्हणाले,आज आम्ही जे आहोत ते व्यापाऱ्यामुळे या वेळेस अडत वेलफेअर असोसिएशन वतीने उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांना लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचा महेश गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल बस्वराज पाटील नागराळकर,शिवाजीराव हूडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य जगदीश बाहेती,रवींद्र कोरे अडत वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष श्रीधर बिरादार,नागेश आंबेगाव,साईनाथ कोरे,उमाकांत पांढरे,मल्लिकार्जुन काळगापूरे, श्याम बिरादार, मनोहर बिरादार,शिवाजी पेठे, शिवशंकर बिरादार,मधुकर पाटील, पी. पी.पाटील,साईनाथ कल्याणे,प्रमोद पाटील, कमलाकर भंडे, शांतवीर मुळे,मारुती कडेवार,दिलीप पाटील,दिगंबर गोटमुकले, सुरेश लांडगे,गौतम पिंपरे,विश्वनाथ यलवंतगे, भरत दंडीमे,अरविंद जिरगे,गंगाधर बिरादार,लक्ष्मणराव मोमले, राम बिरादार, संकेत बिरादार,कोंडीराम काळोजी,भिमाशंकर गठोडे सह अडत व्यापारी,सर्व गुमस्था,हमाल उपस्थित होते
Image
उदगीर नगर पालिका अधिकाऱ्याचा उंटावर बसून शेळ्या राखण्याचा प्रकार ? 👉 गेलेले मुख्याधिकारीच चांगले म्हणण्याची नौबत उदगीरकरावर 👉 मुख्याधिकाऱ्यांना भेटणे म्हणजे नशिबच,जेव्हा जावा तेव्हा साहेब बाहेर ,फोन ही घेत नाहीत 👉 आवक जावक विभाग प्रमुख तर स्वतःला राजा महाराजा समजतो? उदगीर:- स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्याने मागील अनेक वर्षांपासून उदगीर नगर पालिकेवर अधिकारी राज्य असून या अधिकाऱ्यांना शासनाने जनतेचे सेवक म्हणून ठेवले असताना हे अधिकारी उन्मत्त होऊन स्वतःला राजा महाराजा सारखे वागत असल्याचे चित्र सध्या उदगीर नगरपालिकेत पहावयास येत असल्याने सामान्य जनता त्रस्त दिसत आहे,मदमस्त कर्मचाऱ्याची तक्रार मुख्याधिकारी यांच्या कडे करावे म्हटले तर मुख्याधिकारी कोठे राहतात हे त्यांनाच माहिती,जेव्हा केंव्हा जावा मुख्याधिकारी कार्यालयात भेटत नाहीत, जाणाऱ्यांना गेलेलाच अधिकारी चांगला होता म्हणण्याची वेळ आली असून ,येथील आवक जावक ला जो कर्मचारी ठेवला आहे तो इतका उर्मट बोलतो की तो राजा महाराजा लाही मागे टाकत असून प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन जनतेच्या हितासाठी त्वरित अधिकारी बदलावेत अशी मागणी जनता करत आहे
*अवैध सावकारीबाबत तक्रारी दाखल करण्याचे आवाहन* उदगीर : जिल्ह्यातील अवैध सावकरीविरुद्ध प्राप्त तक्रारींवर सावकारांचे निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत कार्यवाही केली जात आहे. वर्षभरात जिल्ह्यातील तालुकास्तरीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे ५५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याबाबत तातडीने कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. अवैध सावकारीविरुद्ध कोणत्याही नागरिकाची तक्रार असल्यास त्यांनी संबंधित तालुकास्तरावर सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे किंवा जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर या कार्यालयाकडे तक्रार सादर करावी. तक्रारींच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक सहकरी संस्था एस.व्ही. बदनाळे यांनी कळविले आहे