प्रसाद राजेश्वर निटूरे यांचे अपघाती निधन 👉उदगीर चे पूर्व नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांचे प्रसाद चिरंजीव होते उदगीर : औसा तालुक्यातील आशिव पाटीजवळ झालेल्या कार अपघातात उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांचा मुलगा प्रसाद चा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर (तुळजापूर लातूर रोड ) वर असलेल्या आशिव पाटी येथे परभणी जिल्ह्यातून भाजीपाल्याची वाहतूक करणारा टेम्पो नादुरुस्त अवस्थेत उभा होता. त्यावेळी सोलापूरहून लातूरकडे प्रसाद निटूरे हे एमएच 24 एएस 1600 या क्रमाकांच्या कारने येत होते. दरम्यान, या कारची टेम्पोला पाठीमागून जोराची धडक बसली. त्यात प्रसाद निटूरे गंभीर जखमी झाले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, त्यांच्यासोबतचे अन्य दोघे किरकोळ जखमी आहेत. महामार्गावरील काहींनी तात्काळ जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रसाद निटूरे यांचे रुग्णालयात येईपर्यंत निधन झाले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी

