राज्याला क्रीडा क्षेत्रात अग्रेसर बनविण्यासाठी प्रयत्नशील- क्रीडा मंत्री संजय बनसोडे 👉 क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ' मिशन लक्ष्यवेध' योजना; बक्षिसांची रक्कम वाढविली 👉 ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी राज्य क्रीडा दिवस 👉 क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातून क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न उदगीर: -ऑलिम्पिकमध्ये देशाला पाहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा होत आहे. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव आणि स्मरण करून राज्यात विविध खेळाविषयी जनजागृती करण्याचा उद्देश आहे. यासोबतच राज्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात राज्य अग्रेसर बनावे, यासाठी क्रीडा विभागामार्फत प्रयत्न सुरू असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. पहिल्या राज्य क्रीडा दिनानिमित्त सोमवारी उदगीर येथील तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा गौरव आणि मंत्री चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घानप्रसंगी ना. बनसोडे बोलत होते. माजी आमदार गोविंद केंद्रे, व्यंकटराव बेंद्रे, शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार प्राप्त गणपतराव माने, पंडित धुमाळ, सिध्देश्वर पाटील, यांच्यासह खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमी नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य शासनाने खेळाडूंसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. गत तीन वर्षांपासून रखडलेल्या शिवछत्रपती राज्य पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेत्या खेळाडूंना 3 लाख ऐवजी 5 लाख रुपये आणि अन्य पुरस्कार विजेत्यांना 1 लाख ऐवजी 3 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी, खेळाडूंना नवीन तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा आणि गुणवत्ता वाढीसाठी ‘मिशन लक्ष्यवेध’ योजनेंतर्गत प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रक्कमेत भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ना. बनसोडे यांनी सांगितले. 👉*उदगीर येथे होणार खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* उदगीरला खेळाची मोठी आणि खूप जुनी परंपरा असून ही परंपरा जोपासण्यासाठी उदगीर येथे राज्याच्या क्रीडा विभागामार्फत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. नुकताच राज्यस्तरीय युवा महोत्सव शहरात पार पडला. तसेच विविध क्रीडा स्पर्धाही झाल्या. आता लवकरच खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा उदगीरमध्ये आयोजित केली जाणार असल्याचे क्रीडा मंत्री ना. संजय बनसोडे यांनी सांगितले. *👉मंत्री चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन* राज्य क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि उदगीर येथील नामदार संजय बनसोडे क्रीडा मंडळाच्या वतीने उदगीर तालुका क्रीडा संकुल येथे मंत्री चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. 👉*राज्य क्रीडा दिनानिमित्त आयोजित उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद* राज्य क्रीडा दिनानिमित्त रुस्तम ए हिंद, ध्यानचंद पुरस्कार प्राप्त हरिश्चंद्र बिराजदार यांच्या निलंगा तालुक्यातील रामलिंग मुडगड येथील जन्मस्थळावरून उदगीर तालुका क्रीडा संकुल पर्यंत क्रीडा ज्योत आणण्यात आली. उदगीर तालुका क्रीडा संकुल येथे ही ज्योत क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. जिल्हा क्रीडा संकुल येथे 'खेलो इंडिया' अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी यावेळी दाखविलेल्या कुस्ती आणि जिमॅस्टिकच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची दाद मिळविली. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त गणपतराव माने आणि दत्ता गलाले, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आकाश बनसोडे, आंतरराष्ट्रीय बेसबॉल खेळाडू ज्योती पवार, रायफल नेमबाज जागृती चंदनकेरे, थायबॉक्सिंग खेळाडू अबू सुलेमान यांच्यासह अन्य खेळाडूंचा यावेळी सन्मान करण्यात आला.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी

नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
• श्रीनिवास मदनलाल सोनी

तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
• श्रीनिवास मदनलाल सोनी

लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी

पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी

Publisher Information
Contact
Udgirsamachar@gmail.com
9421485971
Udgir samachar office shivaji society udgir
About
Weekly marathi paper published in udgir
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn