गेलेलाच नप मुख्यधिकारी चांगला म्हणण्याची उदगीरकरावर पाळी :- ज्या मुख्याधिकाऱ्याना महात्मा गांधींनी पुण्यतिथी माहीत नाही, प्रजासत्ताक दिनी कधी स्वातंत्र्यदिन कधी असतो हे माहीत नाही अश्याना अधिकारी म्हणून काम मिळते कसे? अशी चर्चा जोरात :- उपजिल्हाधिकारी हे फक्त नोटीसच देतात का ठोस कार्यवाही करतात हे पाहावे लागेल :- बिनडोक मुख्याधिकाऱ्यावर कार्यवाही करा माजी आमदार शिवराज तोंडचिरकर उदगीर:- 30 जानेवारी संपूर्ण जग ज्यांच्याकडे महात्मा म्हणून पहाते त्या महात्मा गांधींजीच्या पुण्यतिथी ची आठवण उदगीर नगर पालिकेचे कर्तव्यदक्ष म्हणून स्वताची पाठ थोपटून घेणारे मुख्याधिकारी सुंदर बोंदर याना नसावी ही किती दुर्दैवाची बाब आहे हे त्याना सांगावे कोण, बोंदर यानी या दिवशी खरे तर महात्मा गांधी गार्डन स्वच्छ करून घेतले पाहिजे, महात्मा गांधींजीच्या पुतळ्याची स्वछता करणे अनिवार्य असताना हे तर सोडाच गांधी गार्डन ला कुलूप लाऊन ठेवलें अश्या बिनडोक मुख्याधिकार्यावर त्वरीत कार्यवाही करावी अशी तक्रार माजी आमदार शिवराज तोंडचिरकर यानी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या नंतर नप चे प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यानी सुंदर बोंदर मुख्यधीकारी नप उदगीर, उलागड्डे कार्यालयीन अधीक्षक तथा उमाकांत गंडारे स्वच्छता निरीक्षक नप उदगीर याना जावक क्र 2024/संकीर्ण काकी/ 30/01/2024 ने कारणे दाखवा नोटीस बजावली असून आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून अपना विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील )1979 मधील तरतुदी नुसार कार्यवाही का करण्यात येऊ नये याचा खुलासा दोन दिवसांत करावे असे निर्देश दिले असून आता उपजिल्हाधिकारी खरेच मुख्याधीकारी याना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करतात किंवा छोट्या कर्मचाऱ्यावर आरोप ठेऊन त्याच्यावर कारवाई करतात हे पाहावे लागेल तसेच महात्मा गांधींच्या नांवाने जोगवा मागणारे मुख्याधिकाऱ्यावर कार्यवाही करा म्हणून रस्त्यावर येतील का , का मूग गिळून गप्प बसतील हेही पाहावे लागेल
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image