*भारत सरकारतर्फे घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेत उदयगिरी अकॅडमीची विद्यार्थिनी श्वेता बिरादार तालुक्यात प्रथम तर 22 विद्यार्थ्याचे घवघवीत यश..!* उदगीर: 8 वी इयत्तेतील मुलांसाठी MPSC, UPSC च्या धर्तीवर केंद्र शासनातर्फे घेण्यात येणारी NMMS EXAM परीक्षेत उदयगिरी अकॅडमीची विद्यार्थिनी कु.श्वेता बिरादार हिने 178 पैकी 141 गुण घेऊन उदगीर तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तसेच एक दोन नव्हे तर इतर तब्बल 22 विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले. त्यात श्वेता बिरादार, धनुरे हर्षदा, पाटील ओमकार, केंद्रे संचिता, आलट अंजली, पांढरे रामेश्वर, पवार विजय, बिरादार रोहिणी, भोसले प्रथमेश, धमणे शिवानंद, धनश्री उत्कर्ष राहुल, पाटील प्रतिक्षा, बिरादार ऋषीकेश, सुर्यवंशी नवनाथ, धनशेट्टी रुद्राणी, समीक्षा आंब्रे, गवते रितेश, भालके अथर्व, मदने मारोती, भोसले प्रज्ञा, वसुधा डावळे. या पात्र विद्यार्थ्यांचा उदयगिरी अकॅडमीतर्फे फेटे बांधुन सत्कार करण्यात आला. पात्र झाल्यापैकी बहुतांश विद्यार्थी भारत सरकारतर्फे मिळणार्‍या रु.60,000 शिष्यवृत्तीस पात्र ठरतात. या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार सौ. श्रद्धा पंडित आंब्रे( सेल्स मॅनेजर, सोलोमन कॉर्पोरेशन, तैवान), उदगीर आयकॉन कु. प्राजक्ता भांगे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी बोलताना विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याचा पाया शालेय जीवनातच घडतो आणि त्यासाठी उत्तम मार्गदर्शकाची गरज असते असे श्रद्धा आंब्रे म्हणाल्या. तर विद्यार्थ्यांनी स्वतः चा सर्वांगीण विकास घडवून आणावा तसेच मोठी स्वप्ने पाहून ती सत्यात आणण्यासाठी प्रचंड मेहनत करावी असे प्राजक्ता भांगे म्हणाल्या. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. खिंडे मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदयगिरी अकॅडमीचे संचालक मार्गदर्शक प्रा. गोपाळकृष्ण घोडके यांनी केले तर प्रा.डॉ.धनंजय पाटील यांनी आभार व्यक्तकेले. प्रा. संतोष पाटील, प्रा. श्रीगण वंगवाड, प्रा. मीना हुरदाळे, प्रा. नंदिनी नीटूरे, प्रा. निवेदिता भंडारे इ. उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदयगिरी अकॅडमीतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image