ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील याना मारहाण, मराठवाड्यात पत्रकार सौरक्षन कायद्याने पहला गुन्हा दाखल,आरोपी अटक 👉 उदगीर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण सोंनकवडे यांचे पत्रकारानी मानले आभार उदगीर= येथील ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेत्रागावकर याना भाजी मंडई रोड वरील मोहन वाईन्स या दुकाना समोर दोन तरुणांनी तेथील भाजी विक्रेत्यास अमानुष मारहाण करत असताना हटकल्याने त्या दोन युवकांनी पत्रकार सुरेश पाटील याना अर्वाच्य शिवीगाळ करत लाता बुक्क्यांनी मारहाण करून तू पत्रकार हायीस नेत्रागाव कसा जातोश तुला खतम करतो म्हणून धमकी दिली असता सुरेश पाटील यांनी त्वरीत पोलिस ठाण्यात येऊन पोलिस निरीक्षक किरण सोंनकवडे याना सांगताच त्यांनी पोलिस कर्मचारी पाठउन दोन्ही आरोपीस त्वरीत अटक केली असून संबंधित दोन्ही आरोपीवर शहर पोलिस ठाण्यात गु.र.0077/2024 भारतीय दंड संहिता 1860 ने कलम 323,504,506,34 सह महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था ( हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक )अधिनियम 2017 कलम 4 ने गुन्हा दाखल केला असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण सोंनकवडे यानी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीस त्वरीत अटक करून त्यांच्यावर पत्रकार सौरक्षन कायद्याने गुन्हा दाखल केल्याने मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव सचिन शिवशेटे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निमंत्रक अर्जुन जाधव, उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्रीनिवास सोनी, पत्रकार भवन कृती समिती निमंत्रक युवराज धोतरे,विनायक चाकुरे,रोशन मुल्ला, निलेश हिप्पळगावकर,अशोक कांबळे,संतोष जोशी,माधव घोने,विश्वनाथ गायकवाड, सुधाकर नाईक,संग्राम पवार, निवृत्ती जवळे सह सर्व पत्रकारानी आभार व्यक्त केले आहे, पत्रकार सौरक्षन कायद्याने गुन्हा दाखल करण्याची मराठवाड्यातिल पहलीच घटना आहे
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image