तर लातूरचा पुढचा खासदार मीच :- रघुनाथ बनसोडे 👉सर्वपक्षीय नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्याला बिनविरोध निवडून द्यावे : उदगीर : लातूर राखीव लोकसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी मतदार संघाबाहेरचा उमेदवार मतदारांवर न लादता आपण मागच्या तीन दशकांपासून आपण लोकचळवळीच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने आपल्याला सर्वपक्षीय नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन माजी नगरसेवक रघुनाथ बनसोडे यांनी शुक्रवारी लातुरात पत्रकारांशी बोलताना केले. लातूर लोकसभा मतदार संघ आरक्षित झाल्यापासून या मतदार संघाचा विकास ठप्प झाला आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले उमेदवार न देता पैसेवाले, कंत्राटदार उमेदवार मतदारांच्या माथी मारण्याचे काम आतापर्यंत झाले आहे. यापुढील काळात तरी असे प्रकार घडता कामा नये याकरिता आपण येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगून रघुनाथ बनसोडे पुढे म्हणाले की, गोरगरिबांच्या समस्यांची जाण असलेला उमेदवार या मतदार संघासाठी निवडून देणे आवश्यक आहे. या मतदार संघातील अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक कामाच्या शोधासाठी अन्य ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याऐवजी आजचे लोकप्रतिनिधी आपल्याला उमेदवारी मिळवून देणाऱ्या नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करताना दिसतात. बाहेरच्या उमेदवाराला झोपेतून उठवून आणून सामान्य मतदारांवर लादण्याचे काम यापुढील काळात होता कामा नये, अशी सामान्य मतदारांची भावना झालेली आहे. सामान्यांच्या मनातील ही खदखद आपण व्यक्त करत असल्याचे बनसोडे यांनी सांगितले. आपण सामाजिक तसेच प्रसार माध्यमातही कार्यरत आहोत. निवडणुका आल्या की प्रमुख राजकीय पक्षांना पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते दिसत नाहीत. निष्ठावान कार्यकर्त्यांकडे अमाप पैसे नसल्याने नेत्यांकडूनच उमेदवारीबाबत त्यांच्यावर अन्याय का ? असा सवालही बनसोडे यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी आपापसातील मतभेद बाजूला सारून यावेळी उमेदवारी देताना मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करू शकणाऱ्या, सामान्यांच्या प्रश्नांची नाळ ओळखून चालणाऱ्या आपल्यासारख्या तळमळीने सामान्यांसाठी कार्य करू शकणाऱ्या व्यक्तिमत्वाला उमेदवारी देऊन ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्नशील रहावे . पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना आपण पत्रकार बांधवांनाही किती समस्यांना सामोरे जावे लागत आहे, याचा जवळून अभ्यास केला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या या क्षेत्राच्याही ज्या महत्वपूर्ण समस्या आहेत, त्याची सोडवणूकही आपण आपल्याला संधी मिळाल्यास करण्यास कटिबद्ध आहोत. लातूरकरांनी आपल्यावर अलोट प्रेम केले आहे. १९९६ व २००६ च्या नगर परिषद निवडणुकीत मतदारांनी मला एक पैसाही खर्च न करता निवडून दिले होते. सामान्य लोकांसाठी मी अहोरात्र कार्य करणारा कार्यकर्ता आहे. भारतीय संविधानाला अनुसरून काम करणाऱ्या राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन आपल्याला बिनविरोध लोकसभेवर निवडून द्यावे,अशी अपेक्षाही रघुनाथ बनसोडे यांनी व्यक्त केली .
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image