गनगौर निमित्त महिलांनी काढली भव्य शोभायात्रा उदगीर= येथील माहेश्वरी समाजातिल महिलानी गणगौर निमित्त डैम रोड ते श्री लक्ष्मीनारायण मंदिर पर्यंत गनगौर ची भव्य शोभायात्रा काढली,या शोभा यात्रेत महीला मोठया प्रमाणात उपस्थित होत्या गणगौर व्रत हे राजस्थान सह अन्य राज्यात गुढी पाडव्याच्या काळात साजरे केले जाते. हे व्रत चैत्र शुक्ल तृतीयेला करतात. होळीच्या दुसर्‍या दिवसापासून ज्या नवविवाहिता रोज गणगौर पूजतात त्या चैत्र शुक्ल द्वितियेच्या दिवशी नदी , तलावावर जाऊन आपल्या गणगौरीला पाणी पाजतात. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी त्यांचे विसर्जन केले जाते. या व्रताने पतीची आयु वाढते तर कुमारिकांना चांगला पती मिळतो, यासाठी हे व्रत केले जाते.  याच दिवशी शंकराने पार्वतीला आणि पार्वतीने समस्त स्त्री जातीला सौभाग्य बहाल केले होते. सुवासिनी हे व्रत घेण्यापूर्वी गौरीची स्थापना करतात व त्यांचे पूजन करतात. त्यानंतर गौरीची कथा सांगितली जाते. मग गौरीला लावलेले कुंकू सुवासिनी आपल्या भांगात भरतात. या काळात स्त्रिया केवळ एकदाच जेवण करतात. गणगौर व्रतासंदर्भात एक पौराणिक कथा आहे. एकदा शंकर व पार्वती नारदांसमवेत भ्रमण करत होते. या काळात ते एका गावात पोहोचले. प्रत्यक्ष शिव आणि शक्ती आलेत, हे पाहून गावातल्या स्त्रिया हरखल्या. त्यांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली. त्यासाठी विविध पक्वान्ने बनवायला घेतली. उच्चकुलीन स्त्रियांना स्वागताचा मोठा घाट घातला होता. त्यामुळे त्यांना उशीर झाला. पण खालच्या वर्गातील स्त्रियांनी फक्त हळद आणि अक्षता घेऊन शंकर व पार्वतीची पूजा केली. त्यामुळे खूष झालेल्या पार्वतीने सौभाग्याचा रस त्यांच्यावर शिंपडला. या महिलांना अखंड सौभाग्याचे वरदान मिळाले. त्यानंतर विविध पक्वान्ने घेऊन उच्चकुलीन स्त्रिया गेल्या. पण त्यांना उशीर झाला होता. त्यावेळी शंकराने पार्वतीला विचारले, तू तर तुझ्याकडचा सगळा सौभाग्यरस आधी आलेल्या स्त्रियांवर शिंपडलास आता यांचे काय करणार? त्यावर पार्वतीने आपले बोट कापून त्यातून निघणारे रक्त सौभाग्यरस म्हणून त्या महिलांच्या अंगावर शिंपडले. ज्या महिलांच्या अंगावर जसे थेंब पडले तसे सौभाग्य त्यांना प्राप्त झाले अशी कथा आहे
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image